शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

माणसाला माणूस बनविण्याचे काम ग्रंथ करतात - विठ्ठल वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2016 01:40 IST

अकोला जिल्हा ग्रंथोत्सवाला थाटात प्रारंभ.

अकोला : आजच्या गढूळ वातावरण मन गढूळ बनविण्याचे काम अनेक गोष्टी करीत आहेत. अशा परिस्थितीत माणसाला त्याच्या मनातील वाईट विचार धुवून काढायचे असतील तर त्याने ग्रंथाकडे वळले पाहिजे. माणसाला माणूस बनविण्याचे काम ग्रंथ करतात असे मत लोककवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी सोमवारी येथे व्यक्त केले. जिल्हा प्रशासन व जिल्हा ग्रंथालयाच्यावतीने आयोजित ग्रंथोत्सवाचे उद्घाटन प्रमिलाताई ओक हॉल येथे डॉ. विठ्ठल वाघ यांच्या हस्ते झाले यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर उज्वला देशमुख होत्या. यावेळी मंचावर आमदार गोवर्धन शर्मा, ज्येष्ठ पत्रकार प्रा. मधू जाधव, प्रभात किडस्चे संचालक डॉ .गजानन नारे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सोपान सातभाई, रंगकर्मी अशोक ढेरे, पत्रकार डॉ. किरण वाघमारे, प्राचार्य डॉ. एस.आर. बाहेती, प्रमिलाताई ओक वाचनालयाचे सचिव मनमोहन तापडिया, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्यामराव वाहुरवाघ आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलतांना डॉ.विठ्ठल वाघ यांनी जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोण ग्रंथ देत असल्याचे सांगितले. आपल्या डोळ्यात अंजन घालण्याची कुवत साहित्यात आहे असे सांगतांना विठ्ठल वाघ यांनी कवितेने डोळे दिले कवितेने दृष्टी दिली, कवितेने नवी नवी सृष्टी दिली ही कविता म्हणून दाखविली. लेखक हा कलाकृतीत आपला जीव ओतत असतो. आपण आपल्या कोषातून बाहेर पडून साहित्यकृतीशी एकजीव झालो तर आपल्याला त्याचा आनंद घेता येईल. आज चित्रपट, विविध वाहिण्यांमधून कळत-नकळत घाणेरडे संस्कार आपल्या पाल्यावंर पडत आहेत. अशा परिस्थितीत ग्रंथाची संगत केली तर निश्‍चितच आपल्या मनातील वाईट विकार धुवून निघाल्या शिवाय राहणार असे आशावाद वाघ यांनी व्यक्त केला. शेवटी त्यांनी आपली शेतकर्‍यांच्या जीवनाचे चित्रण करणारी ह्यपेचह्ण ही कविता सादर केली. महापौर उज्वला देशमुख यांनी घरातूनच संस्काराचे बीजारोपण होणे आवश्यक असल्याचे सांगितले. ग्रंथ हे मनाला सुसंस्कारीत करण्याचे काम करीत असतात त्यामुळे प्रत्येकाने ग्रंथांची कास धरावी असे आवाहन उज्वला देशमुख यांनी केले. प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी सोपान सातभाई यांनी केले. आभार श्यामराव वाहुरवाघ यांनी मानले. ग्रंथदिंडीने आणली रंगतग्रंथोत्सवाचा आरंभ ग्रंथदिंडीने झाला. खुले नाट्यगृह, गांधी चौक, सिटी कोतवाली, तिलक मार्ग, जुना कापड बाजार, सराफा बाजार, दाना बाजार, जैन मंदीर, गांधी चौक, महापालिका मार्गे प्रमिलाताई ओक हॉल येथे दिंडी पोहोचली. दिंडीत भजनी मंडळ व कलापथकाने सहभाग घेतला व ग्रंथांचे महत्त्व विदित केले.