शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

कार्यकर्त्यांची घुसमट; उमेदवारांचा दबाव वाढला

By admin | Updated: October 3, 2014 01:34 IST

राजकीय सहकारी असलेल्या उमेदवारांनी यावेळच्या निवडणुकीत परस्परांविरुद्ध दंड थोपटले आहेत.

अकोला : कधीकाळी एकमेकांचे राजकीय सहकारी असलेल्या उमेदवारांनी यावेळच्या विधानसभा निवडणुकीत परस्परांविरुद्ध दंड थोपटले आहेत. आजपर्यंत ज्या लोकप्रतिनिधींनी समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला, नेमका त्यांच्याच विरोधात प्रचार करण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली आहे. राजकीय समीकरणांमुळे कार्यकर्त्यांची प्रचंड घुसमट होत आहे. त्यात भरीस भर उमेदवारांचा दबाव वाढल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम असून, अनेकांनी प्रचारापासून चार हात लांब राहणे पसंत के ल्याचे चित्र तूर्तास पाहावयास मिळत आहे.गत २५ वर्षांपासून शिवसेना-भाजपची युती व १५ वर्षे जुनी कॉँग्रसे-राष्ट्रवादी कॉँग्रेसची आघाडी विधानसभा निवडणुकीत तुटली. यापूर्वी आघाडी- युतीतील पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते समन्वयाने निवडणुकीत प्रचार करायचे. या समीकरणांचा दोन्ही पक्षातील उमेदवारांना फायदाच झाला. मात्र जागा वाटपाच्या मुद्यावरून युती व आघाडी तुटली. राजकीय सारिपाटावरील या विचित्र घडामोडींमुळे कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ झाले. ही अस्वस्थता अद्यापही कायम असून ह्यकोणता झेंडा घेऊ हातीह्णअशी म्हणण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली आहे. १ ऑक्टोबर रोजी निवडणुकीतून काही इच्छुकांनी नामांकन अर्ज (उमेदवारी) मागे घेतल्याने लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे; परंतु कार्यकर्त्यांची घुसमट लक्षात न घेता किंवा दोन शब्द प्रेमाचे सोडून उमेदवारांनी दबाव तंत्राचा वापर सुरू केला आहे.