शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

जलयुक्त शिवारच्या कामांची हाेणार चाैकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:20 IST

राज्यातील पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन त्यावर मात करण्यासाठी तत्कालीन राज्य सरकारने डिसेंबर २०१४ मध्ये ‘जलयुक्त शिवार’ अभियानच्या अंमलबजावणीला सुरुवात ...

राज्यातील पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन त्यावर मात करण्यासाठी तत्कालीन राज्य सरकारने डिसेंबर २०१४ मध्ये ‘जलयुक्त शिवार’ अभियानच्या अंमलबजावणीला सुरुवात केली हाेती. या अभियानात अशासकीय संस्था आणि लोकसहभागावर लक्ष केंद्रित करण्यात आले हाेते. अभियान अंतर्गत पावसाचे पाणी गावाच्या शिवारातच अडविणे, भूगर्भातील पाणीपातळीत वाढ करणे, वृक्षलागवडीस प्राधान्य देणे, जलस्रोतातील गाळ लोकसहभागातून काढून पाणीसाठा वाढविणे, अस्तित्वात असलेले व निकामी बंधारे, गावतलाव, पाझरतलाव, सिमेंट बंधारे आदी जलस्रोतांची साठवण क्षमता वाढविणे आदी विविध कामांचा समावेश हाेता. याेजनेतील कामांबाबत महालेखापाल यांनी नाेंदविलेले मुद्दे ध्यानात घेता राज्य शासनाने जलयुक्त शिवारच्या कामांची चाैकशी करण्याचा निर्णय घेतला. या याेजनेतील कामांची संख्या लक्षात घेता नेमक्या काेणत्या कामांची खुली चाैकशी केली जाऊ शकते, याचा शाेध घेण्यासाठी सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव विजयकुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

२१ हजार २९३ गावांत राबवली याेजना

२०१४-१५ या आर्थिक वर्षात भूजल पातळीत दोन मीटरपेक्षा जास्त घट झालेल्या १८८ तालुक्यांतील २,२३४ गावांमध्ये तसेच पाणीटंचाई घाेषित केलेल्या २२ जिल्ह्यांतील १९,०५९ गावांमध्ये हे अभियान राबविण्यात आले हाेते. प्रत्यक्षात स्थळनिरीक्षण करून चाैकशी करण्याचे आव्हान समितीसमाेर आहे.