शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

‘जलयुक्त शिवार’ कामांचे आराखडे रखडले!

By admin | Updated: March 8, 2016 02:21 IST

अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांतील ५१९ गावांमध्ये कामे केव्हा सुरू होणार?

संतोष येलकर/अकोला जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांमध्ये यावर्षी ५१९ गावांची निवड करण्यात आली; मात्र निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये करावयाच्या कामांचे जिल्हास्तरीय आराखडे मंजूर करण्याची प्रक्रिया अद्याप रखडली आहे. त्यामुळे निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये ह्यजलयुक्त शिवारह्णची कामे केव्हा सुरू होणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.राज्यात वारंवार उद्भवणार्‍या टंचाईच्या स्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून राज्य शासनामार्फत गतवर्षीपासून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत गतवर्षी प्रत्येक जिल्ह्यात निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये जलयुक्त शिवारची कामे करण्यात आली. त्यापैकी काही गावांमधील कामे पूर्ण होणे अद्याप बाकी आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत दुसर्‍या टप्प्यात यावर्षी गावांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये अमरावती विभागातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यांतील ५१९ गावे आहेत. निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये शिवारफेरी काढून आणि ग्रामसभांची मंजुरी घेऊन जलयुक्त शिवारची कामे करावयाची आहेत. त्यानुषंगाने निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये शिवारफेर्‍या काढण्यात आल्या; परंतु निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये करावयाच्या जलयुक्त शिवारच्या कामांचे जिल्हा कृती आराखडे अद्याप पूर्ण करण्यात आले नाहीत. आराखडे तयार नसल्याने कामांच्या जिल्हा आराखड्यांना जिल्हास्तरीय समितीकडून मान्यता देण्याची प्रक्रिया रखडली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी जलयुक्त शिवारची कामे करावयाची आहेत; मात्र कामांच्या जिल्हा आराखड्यांना मंजुरी मिळणे अद्याप बाकी असल्याच्या स्थितीत निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये ह्यजलयुक्त शिवारह्णची कामे केव्हा सुरू होणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.

'शिवारफेरी' काढण्याचे काम पूर्ण!जलयुक्त शिवार अभियानांतर्गत यावर्षी निवड करण्यात आलेल्या अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांतील ५१९ गावांमध्ये ग्रामस्थ-शेतकर्‍यांची शिवारफेरी काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले. शिवारफेरीमध्ये गावातील पाण्याची गरज आणि त्यासाठी करावयाची ह्यजलयुक्त शिवारह्णची कामे; यासंदर्भात नियोजन करण्यात आले. प्रत्यक्षात कामे सुरू होणे अद्याप बाकी आहे.

'जलयुक्त शिवार' कामांसाठी निवडलेली जिल्हानिहाय गावेजिल्हा      गावेअकोला    १२५बुलडाणा   २४0वाशिम     १५४...................एकूण       ५१९