शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
2
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
3
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
4
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
5
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
6
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
7
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
8
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
9
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
10
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
11
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
12
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
13
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
14
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
15
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
16
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
17
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
18
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
19
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
20
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?

महान धरणापासून उन्नई बंधाऱ्यापर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण होइना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:18 IST

अकोला : जिल्ह्यात खारपानपट्ट्यातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ खेड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी महान धरणातून काटेपूर्णा नदीपात्राद्वारे पाणी सोडले जाते. ...

अकोला : जिल्ह्यात खारपानपट्ट्यातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ खेड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी महान धरणातून काटेपूर्णा नदीपात्राद्वारे पाणी सोडले जाते. त्यामुळे होणारी पाण्याची प्रचंड नासाडी थांबविण्यासाठी महान येथील काटेपूर्णा धरणापासून खांबोराजवळील उन्नई बंधाऱ्यापर्यंत २३ किलोमीटर जलवाहिनी टाकण्याचे काम तीन वर्षे उलटूनही अद्याप पूर्ण झाले नाही. त्यामुळे पाणीपुरवठा करण्यासाठी धरणातून काटेपूर्णा नदीपात्राद्वारे उन्नई बंधाऱ्यात पाणी सोडावे लागत असल्याने पाण्याची नासाडी सुरूच आहे. त्यानुषंगाने जलवाहिनीद्वारे पाणी सोडण्याचे काम पूर्ण होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जिल्ह्यातील अकोला तालुक्यातल्या खारपानपट्ट्यातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ खेड्यांना महान येथील काटेपूर्णा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यासाठी महान धरणातून काटेपूर्णा धरणातून काटेपूर्णा नदीपात्राद्वारे सोडण्यात येणारे पाणी खांबोरा जवळील उन्नई बंधाऱ्यात साठविण्यात येते आणि बंधाऱ्यातून योजनेंतर्गत गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. ६४ खेड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी महान येथील काटेपूर्णा धरणातून काटेपूर्णा नदीपात्रात पाणी सोडावे लागत असल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. त्यामुळे पाण्याची होणारी नासाडी रोखण्याकरिता महान येथील काटेपूर्णा धरणातून खांबोराजवळील उन्नई बंधाऱ्यापर्यंत जलवाहिनीद्वारे पाणी सोडण्याकरिता महान येथील काटेपूर्णा धरणापासून उन्नई बंधाऱ्यापर्यंत काटेपूर्णा नदीच्या काठाने २३ किलोमीटर जलवाहिनी टाकण्याच्या योजनेला शासनामार्फत २०१८ मध्ये मंजुरी देण्यात आली. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले. तीन वर्षे उलटून गेली. मात्र, अद्यापही जलवाहिनी टाकण्याचे कामपूर्ण झाले नाही. त्यामुळे ६४ खेड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी धरणातून काटेपूर्णा नदीपात्राद्वारे उन्नई बंधाऱ्यापर्यंत पाणी सोडावे लागत असल्याने पाण्याची होणारी नासाडी सुरूच आहे. त्यानुषंगाने धरणातून उन्नई बंधाऱ्यात जलवाहिनीद्वारे पाणी सोडण्याचे काम पूर्ण होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

१९.५० कोटी रुपयांची योजना

केव्हा होणार पूर्ण?

महान येथील काटेपूर्णा धरणातून खांबोराजवळील उन्नई बंधाऱ्यात जलवाहिनीद्वारे पाणी सोडण्याची योजना तीन वर्षांपूर्वी शासनामार्फत मंजूर करण्यात आली. त्यासाठी १९ कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. मात्र, जलवाहिनी टाकण्याचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने, ही योजना पूर्ण होणार तरी केव्हा, असा प्रश्न निर्माण होत आहे.

नदीपात्राद्वारे पाणी सोडल्याने

अशी होते पाण्याची नासाडी !

खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ खेड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी महान येथील काटेपूर्णा धरणातून काटेपूर्णा नदीपात्राद्वारे उन्नई बंधाऱ्यात पाणी सोडले जाते. नदीपात्रातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यापैकी निम्मे पाणी जमिनीत मुरते तसेच अनेक ठिकाणी नदीकाठी मोटारपंप लाऊन पाण्याचा उपसा केला जातो. त्यामुळे नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होते.

महान येथील काटेपूर्णा धरणातून उन्नई बंधाऱ्यात जलवाहिनीद्वारे पाणी सोडण्यासाठी जलवाहिनी टाकण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. धरणाच्या ठिकणी जलवाहिनी जोडणीचे काम होणे बाकी आहे. तसेच जलवाहिनीद्वारे बंधाऱ्यात पाणी सोडण्याची चाचणी घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. धरणाच्या ठिकाणी जलवाहिनीची जोडणी व चाचणी घेण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत.

-विवेक सोळंके,

अधीक्षक अभियंता, अकोला मंडळ, मजीप्रा.