शहरं
Join us  
Trending Stories
1
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
2
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
3
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
5
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
6
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
7
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
8
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
9
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
10
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
11
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
12
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
13
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
14
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
15
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
16
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
17
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
18
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
19
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
20
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी

मजुरांच्या हाताला मिळेना काम!

By admin | Updated: April 6, 2016 01:48 IST

अकोला जिल्ह्यात रोहयो कामांवर केवळ ३२५७ मजूर.

अकोला: दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतीची कामे ठप्प असल्याने, मजुरांच्या हाताला काम मिळेनासे झाले आहे. त्यामुळे कामाच्या शोधात गावागावांतील मजुरांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. एकीकडे मजुरांच्या हाताला काम नाही, तर दुसरीकडे जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामांवर केवळ ३ हजार २५७ मजूर असल्याची स्थिती आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, नापिकीच्या स्थितीत जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला असून, आर्थिक संकटात संसाराचा गाडा कसा चालवायचा, असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर निर्माण झाला. या पृष्ठभूमीवर खरीप पिकांची ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेली जिल्ह्यातील लागवडीयोग्य सर्व ९९७ गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली आहेत. दुष्काळ जाहीर झाला; मात्र दुष्काळग्रस्त गावांना द्यावयाच्या सवलती आणि शेतकर्‍यांना मदत अद्यापही शासनामार्फत जाहीर करण्यात आली नाही. दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यातील कोरडवाहू भागात कोणतीही पिके नाहीत तसेच पाणीटंचाईच्या परिस्थितीत बागायती क्षेत्रातही पिकांची स्थिती चांगली नाही. त्यानुषंगाने जिल्हाभरात शेतीची कामे ठप्प असल्याने, शेतमजुरांच्या हातालाही काम नाही. काम नसल्याने मजुरांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हाताला काम मिळविण्यासाठी गावागावांतील मजुरांकडून कामाचा शोध घेतला जात आहे तसेच मिळेल ते काम करण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. काही मजूर कुटुंबातील तरुणांना कामासाठी शहरात जावे लागत आहे. दुष्काळी परिस्थितीत एकीकडे मजुरांच्या हाताला काम मिळनासे झाले आहे, तर दुसरीकडे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायत व विविध यंत्रणांमार्फत जिल्ह्यातील अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यांमध्ये सध्या ४३८ कामे सुरू असून, रोहयोच्या या कामांवर सरासरी ३ हजार २५७ मजूर काम करीत असल्याची स्थिती आहे. जिल्ह्यातील इतर मजुरांना मात्र कामासाठी भटकंती करावी लागत आहे.