शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

अकोला-दिग्रस राज्य मार्गाचे काम अर्धवट

By admin | Updated: June 8, 2014 00:10 IST

अकोला ते बार्शीटाकळीदरम्यानच्या १७ किलोमीटरपैकी केवळ तीन किलोमीटर अंतर उरले असताना हे काम रखडले आहे.

लोहगड : गत पाच वर्षांपासून अतिशय वाईट अवस्था झालेल्या अकोला ते दिग्रस या राज्य मार्गाचे काम गत काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले; परंतु अकोला ते बार्शीटाकळीदरम्यानच्या १७ किलोमीटरपैकी केवळ तीन किलोमीटर अंतर उरले असताना हे काम रखडले आहे. अकोला-दिग्रस राज्य मार्ग क्रमांक ६ ची अवस्था ५ ते ६ वर्षांपासून अतिशय दयनीय झाली आहे. या मार्गाची दुरुस्ती काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आली; परंतु अकोला ते बार्शीटाकळीदरम्यान असलेल्या १७ किलोमीटर अंतराच्या मार्गाचे काम केवळ ३ किलोमीटर अंतर उरले असताना बंद करण्यात आले. हे काम अद्यापही अर्धवटच असल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्याचे ठिकाण असलेले बार्शीटाकळी शहर जिल्हा मुख्यालयापासून सर्वात जवळ असल्यामुळे या मार्गावर वाहनाची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या मार्गावरून ट्रक, ट्रॅक्टर, मिनी बस, एस.टी. बस, लक्झरी बस, जीप आणि दुचाकींसह विविध वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. बार्शीटाकळी ते अकोला हे अंतर केवळ १७ किलोमीटरच आहे. त्यातील ३ किलोमीटर अंतराचे काम रखडून ठेवण्यामागचा उद्देश किंवा कारण काय, हेसुद्धा कळायला मार्ग नाही. सदर मार्गावरील आळंदा फाटादरम्यान २ किलोमीटरचे व कान्हेरी सरपजवळ १ कि लोमीटर अंतराचे काम पूर्ण करण्यात आले नाही. या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असल्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. खड्डे चुक वून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात दोन वाहनांची धडक होऊन मोठा अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे हे खड्डे बुजवून मार्गाची चांगली दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यातच पावसाळा तोंडावर आला असताना पाऊस पडण्यापूर्वी हे काम करणे आवश्यक आहे. पावसाला सुरुवात झाल्यानंतर डांबरीकरणाचे काम निकृष्ट होऊन पुन्हा मार्गाची अवस्था जैसे थे होईल, म्हणून संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील जनतेकडून क रण्यात येत आहे. (वार्ताहर)