लोहगड : गत पाच वर्षांपासून अतिशय वाईट अवस्था झालेल्या अकोला ते दिग्रस या राज्य मार्गाचे काम गत काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले; परंतु अकोला ते बार्शीटाकळीदरम्यानच्या १७ किलोमीटरपैकी केवळ तीन किलोमीटर अंतर उरले असताना हे काम रखडले आहे. अकोला-दिग्रस राज्य मार्ग क्रमांक ६ ची अवस्था ५ ते ६ वर्षांपासून अतिशय दयनीय झाली आहे. या मार्गाची दुरुस्ती काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आली; परंतु अकोला ते बार्शीटाकळीदरम्यान असलेल्या १७ किलोमीटर अंतराच्या मार्गाचे काम केवळ ३ किलोमीटर अंतर उरले असताना बंद करण्यात आले. हे काम अद्यापही अर्धवटच असल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्याचे ठिकाण असलेले बार्शीटाकळी शहर जिल्हा मुख्यालयापासून सर्वात जवळ असल्यामुळे या मार्गावर वाहनाची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या मार्गावरून ट्रक, ट्रॅक्टर, मिनी बस, एस.टी. बस, लक्झरी बस, जीप आणि दुचाकींसह विविध वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. बार्शीटाकळी ते अकोला हे अंतर केवळ १७ किलोमीटरच आहे. त्यातील ३ किलोमीटर अंतराचे काम रखडून ठेवण्यामागचा उद्देश किंवा कारण काय, हेसुद्धा कळायला मार्ग नाही. सदर मार्गावरील आळंदा फाटादरम्यान २ किलोमीटरचे व कान्हेरी सरपजवळ १ कि लोमीटर अंतराचे काम पूर्ण करण्यात आले नाही. या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असल्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. खड्डे चुक वून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात दोन वाहनांची धडक होऊन मोठा अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे हे खड्डे बुजवून मार्गाची चांगली दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यातच पावसाळा तोंडावर आला असताना पाऊस पडण्यापूर्वी हे काम करणे आवश्यक आहे. पावसाला सुरुवात झाल्यानंतर डांबरीकरणाचे काम निकृष्ट होऊन पुन्हा मार्गाची अवस्था जैसे थे होईल, म्हणून संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील जनतेकडून क रण्यात येत आहे. (वार्ताहर)
अकोला-दिग्रस राज्य मार्गाचे काम अर्धवट
By admin | Updated: June 8, 2014 00:10 IST