शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीसाठी महिलांचा ग्रामपंचायतवर मोर्चा

By admin | Updated: May 1, 2017 20:27 IST

चोहोट्टा बाजार- सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्यानंतर ‘आता परिसरातच दारूचे दुकाने नको’ या मागणीसाठी चोहोट्टा बाजार येथील महिलांनी ग्रामपंचायतवर सोमवारी मोर्चा काढला.

चोहोट्टा बाजार ग्रामसभेत महिलांची प्रचंड गर्दीचोहोट्टा बाजार : राज्य महामार्गापासून ५०० मीटरच्या आत दारू दुकांनाना सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्यानंतर ‘आता परिसरातच दारूचे दुकाने नको’ या मागणीसाठी चोहोट्टा बाजार येथील महिलांनी ग्रामपंचायतवर सोमवारी मोर्चा काढला. स्वयंस्फूर्तीने निघालेल्या या मोर्चाने महाराष्ट्रदिनी आयोजित चोहोट्टा बाजार ग्रामपंचायतची ग्रामसभा अनेक मुद्यांवर गाजली. सभेच्या अध्यक्ष सरपंच नीता दिलीप वडाळ, उपसरपंच ऊर्मिल मालवे, ग्रामविकास अधिकारी भुजिंगराव शिवरकार व सहकारी सदस्यांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे समाधान केले. दारूच्या व्यसनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अनेक युवकही दारूच्या आहारी जात आहेत. त्यामुळे त्यांच्या घरात नेहमीच अशांतता पसरते, अशा अनेक बाबींनी त्रस्त झालेल्या महिलांनी सोमवारी ग्रामसभेत दारूचे दुकान आपल्या परिसरात कुठेच नको, या मागणीसाठी काढलेल्या मोर्चामध्ये आपल्या व्यथा व्यक्त केल्या. चोहोट्टा ग्रामपंचायतच्या हद्दीत दारू दुकान उभारणीस तीव्र विरोध करून ग्रामसभेत तसा ठराव मंजूर करून घेतला. यावेळी दारूबंदी विरोधात संतप्त प्रतिक्रिया देत महिलांनी घोषणाबाजी केली. या मोर्चामध्ये गावातील शेकडो तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग पहायला मिळाला. सकाळपासूनच या मोहिमेच्या यशस्वितेसाठी तरुणांनी स्वाक्षरी अभियान राबविले आणि दुकानांना आपला विरोध दर्शविला. तर तीव्र आंदोलनाची तयारी आपल्या गावाच्या हद्दीत कुठेही दारूचे दुकान उभे राहू नये, ही आमची रास्त मागणी आहे आणि या महत्त्वपूर्ण विषयाचा ठराव आज ग्रामसभेत मंजूर करावा, अशी मागणी मोर्चात आलेल्या महिलांनी रेटून धरली. तसेच गरज भासल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला.

ग्रामपंचायतचा ऐतिहासिक ठराव मोर्चेकरांच्या दारूबंदीच्या व जिल्हा परिषदच्या जागेवर ग्रामपंचायतच्या देखरेखेखाली व्यापारी संकुल बांधण्याचा ठराव या ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. ग्रामपंचायतच्या या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा करताच उपस्थित मोर्चेकरांनी ग्रामपंचायतचे आभार मानले. आता मनमानी पद्धतीने अतिक्रमण करणाऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले जाणार आहे.