शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

रामनगर-खापरखेडा येथील महिलांची पाणीटंचाई निवारणार्थ बीडीओ कार्यालयात धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:20 IST

तालुक्यातील अतिशय दुर्गम भागातील शेकापूर ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या रामनगर-खापरखेडा येथील महिलांनी चार दिवसांपूर्वीच पिण्याच्या पाण्यासाठी पातूर पंचायत समितीच्या आवारात ...

तालुक्यातील अतिशय दुर्गम भागातील शेकापूर ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या रामनगर-खापरखेडा येथील महिलांनी चार दिवसांपूर्वीच पिण्याच्या पाण्यासाठी पातूर पंचायत समितीच्या आवारात पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्याला घेराव घालून आंदोलन केले होते. मात्र त्यानंतरही प्यायचे पाणी मिळाले नाही. आंदोलन केले म्हणून शेजारील शेतकऱ्यांनी शेतातील पाणी देण्यासही नकार दिला. पुन्हा सोमवारी गजानन महाराज वानखेडे आणि ज्योती दाभाडे यांच्या नेतृत्वात उषा राठोड, विकास सदाशिव राठोड, यशोदा हरिभाऊ आडे, इंदू बाळू पवार, अमिता काशीराम राठोड आदी महिलांच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी ओ.टी. गाठेकर यांच्या दालनात पाण्याची समस्या मांडली. महिलांनी रामनगर-खापरखेडा येथील नागरिकांना पाणी द्या, त्याशिवाय आम्ही येथून हलणार नाही, असा पवित्रा घेतला. शिर्ला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुनील फाटकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अर्जुन टप्पे आणि देवानंद गहिले यांनी समजूत घातली. तासभर कलहानंतर आलेगाव-नवेगाव ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणी देण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता मिलिंद जाधव यांना निर्देश दिले.

फोटो :