शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

मुलींवर अत्याचाराच्या घटना महिला आमदारांकडून बेदखल

By admin | Updated: April 10, 2017 00:48 IST

अकोट, नवोदयमध्ये मुलींवर अत्याचार: विधिमंडळाच्या महिला समितीचा अहवाल सादर

सदानंद सिरसाट - अकोलाशासकीय आश्रमशाळांसह वसतिगृहांतील मुलींवर झालेल्या अत्याचाराची चौकशी करण्यासाठी गठित विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील महिला सदस्यांच्या समितीच्या अहवालात अकोल्यातील जवाहर नवोदय विद्यालय आणि अकोटच्या आश्रमशाळेतील घटनेची दखलच घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. समितीचा अहवाल ६ एप्रिल रोजी दोन्ही सभागृहात सादर झाला आहे. शासकीय आश्रमशाळांसह वसतिगृहांतील मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची सखोल चौकशी करण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या एकूण १३ महिला सदस्यांची समिती २३ डिसेंबर २०१५ रोजी गठित करण्यात आली. अकोट येथील वसतिगृहात आॅक्टोबर २०१५ मध्ये अत्याचाराची घटना उघडकीस आली होती. त्यावेळी सभागृहात राज्यातील मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांचा पाढा विधान परिषद सदस्या विद्या चव्हाण यांनी वाचला. त्यामध्ये अकोला येथील जवाहर नवोदय विद्यालयात काळजीवाहकाने मुलींवर केलेला अत्याचार आणि अकोट येथील शासकीय निवासी वसतिगृहामध्ये १५ ते १६ वर्षाच्या मुलींवर अत्याचाराचीही माहिती विद्या चव्हाण यांनी सभागृहात दिली. विशेष म्हणजे, अकोट येथे वसतिगृह अधीक्षिका सुरेखा राऊत यांचा पती आणि मुलगा आणि त्याच्या मित्रांनी सहा मुलींवर अत्याचार केले. त्या मुली लहान आहेत, मागासवर्गीय, आदिवासी, दलित आहेत, त्यामुळे संबंधितांवर कडक कारवाई केली पाहिजे, अशी जोरदार मागणी विद्या चव्हाण यांनी केली होती. त्यावर आदिवासी विकास मंत्री यांनी घटनांची गंभीर दखल घेतली आहे. संबंधितांवर कारवाई झाली नसल्यास निश्चितपणे करण्यात येईल, असे सांगितले होते. विधिमंडळ समितीच्या महिला सदस्यात्यासाठी नियुक्त समितीमध्ये महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर, आमदार विद्या चव्हाण, अमिता चव्हाण, निर्मला गावित, सीमा हिरे, दीपिका चव्हाण, संगीता ठोंबरे, तृप्ती सावंत, मनीषा चौधरी, सुमनताई पाटील, डॉ. नीलम गोऱ्हे, शोभा फडणवीस, दीप्ती चवधरी यांचा समावेश होता. साक्ष घेण्यासाठीही अकोला जिल्ह्याची निवडविशेष म्हणजे, समिती गठित झाल्यानंतर जवाहर नवोदय विद्यालय, अकोट येथील शासकीय निवासी वसतिगृह प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांची साक्ष घेण्याचेही समितीच्या २ फेब्रुवारी २०१६ रोजीच्या बैठकीत ठरले होते. ती साक्षही झालेली नाही. अधीक्षिकेचा पती, मुलगा, मित्रही सुटलेअधीक्षिका राऊत यांचा स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव तर स्वीकारलाच, शिवाय तक्रार करण्यास कोणीही पालक पुढे आला नाही, या सबबीखाली फौजदारी कारवाईही झाली नाही. त्यामुळे अत्याचार झालेल्या सहा मुलींनी न्यायाची अपेक्षा कोणाकडून करावी, हा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला आहे. निलंबनही नाही, स्वेच्छानिवृत्तीही नाही, तर गुपचूप बदलीविशेष म्हणजे, शासकीय मुलींच्या वसतिगृह अधीक्षिका सुरेखा राऊत यांच्या पतीने, मुलगा आणि त्याच्या मित्रांनी अत्याचार केल्याची घटना उघड झाली. प्रशासनाने दखल घेत कारवाईची तयारी केली. त्यानुसार बडतर्फीसाठी प्रथम निलंबित करणे आवश्यक होते; मात्र त्यावेळी राऊत यांनी स्वेच्छानिवृत्तीची तयारी दर्शविली. तशी प्रशासनाने सुटही दिली; मात्र त्यानंतर घडले ते वेगळेच. राऊत यांनी स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज मागे घेतला. त्याऐवजी महसूल विभागाबाहेर बदलीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. आता सुरेखा राऊत बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे वसतिगृह अधीक्षिका म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे. नवोदय विद्यालय आणि अकोट येथील शासकीय निवासी शाळेतील अत्याचारांच्या घटना घडल्यानंतर त्याची चौकशी करण्यासाठी विधिमंडळाची समिती अकोल्यात आलेली नाही. त्यापैकी नवोदय विद्यालयातील दोघांवर दाखल फौजदारी प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, तर अकोट प्रकरणात तक्रारी नसल्याने पुढे काही झाले नाही. - डॉ. आशा मिरगे, तत्कालीन सदस्य, राज्य महिला आयोग.