शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
5
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
6
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
7
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
8
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
9
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
10
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
11
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
12
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
13
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
14
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
15
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
16
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
17
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
18
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
19
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
20
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख

मुलींवर अत्याचाराच्या घटना महिला आमदारांकडून बेदखल

By admin | Updated: April 10, 2017 00:48 IST

अकोट, नवोदयमध्ये मुलींवर अत्याचार: विधिमंडळाच्या महिला समितीचा अहवाल सादर

सदानंद सिरसाट - अकोलाशासकीय आश्रमशाळांसह वसतिगृहांतील मुलींवर झालेल्या अत्याचाराची चौकशी करण्यासाठी गठित विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील महिला सदस्यांच्या समितीच्या अहवालात अकोल्यातील जवाहर नवोदय विद्यालय आणि अकोटच्या आश्रमशाळेतील घटनेची दखलच घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. समितीचा अहवाल ६ एप्रिल रोजी दोन्ही सभागृहात सादर झाला आहे. शासकीय आश्रमशाळांसह वसतिगृहांतील मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची सखोल चौकशी करण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या एकूण १३ महिला सदस्यांची समिती २३ डिसेंबर २०१५ रोजी गठित करण्यात आली. अकोट येथील वसतिगृहात आॅक्टोबर २०१५ मध्ये अत्याचाराची घटना उघडकीस आली होती. त्यावेळी सभागृहात राज्यातील मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांचा पाढा विधान परिषद सदस्या विद्या चव्हाण यांनी वाचला. त्यामध्ये अकोला येथील जवाहर नवोदय विद्यालयात काळजीवाहकाने मुलींवर केलेला अत्याचार आणि अकोट येथील शासकीय निवासी वसतिगृहामध्ये १५ ते १६ वर्षाच्या मुलींवर अत्याचाराचीही माहिती विद्या चव्हाण यांनी सभागृहात दिली. विशेष म्हणजे, अकोट येथे वसतिगृह अधीक्षिका सुरेखा राऊत यांचा पती आणि मुलगा आणि त्याच्या मित्रांनी सहा मुलींवर अत्याचार केले. त्या मुली लहान आहेत, मागासवर्गीय, आदिवासी, दलित आहेत, त्यामुळे संबंधितांवर कडक कारवाई केली पाहिजे, अशी जोरदार मागणी विद्या चव्हाण यांनी केली होती. त्यावर आदिवासी विकास मंत्री यांनी घटनांची गंभीर दखल घेतली आहे. संबंधितांवर कारवाई झाली नसल्यास निश्चितपणे करण्यात येईल, असे सांगितले होते. विधिमंडळ समितीच्या महिला सदस्यात्यासाठी नियुक्त समितीमध्ये महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर, आमदार विद्या चव्हाण, अमिता चव्हाण, निर्मला गावित, सीमा हिरे, दीपिका चव्हाण, संगीता ठोंबरे, तृप्ती सावंत, मनीषा चौधरी, सुमनताई पाटील, डॉ. नीलम गोऱ्हे, शोभा फडणवीस, दीप्ती चवधरी यांचा समावेश होता. साक्ष घेण्यासाठीही अकोला जिल्ह्याची निवडविशेष म्हणजे, समिती गठित झाल्यानंतर जवाहर नवोदय विद्यालय, अकोट येथील शासकीय निवासी वसतिगृह प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांची साक्ष घेण्याचेही समितीच्या २ फेब्रुवारी २०१६ रोजीच्या बैठकीत ठरले होते. ती साक्षही झालेली नाही. अधीक्षिकेचा पती, मुलगा, मित्रही सुटलेअधीक्षिका राऊत यांचा स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव तर स्वीकारलाच, शिवाय तक्रार करण्यास कोणीही पालक पुढे आला नाही, या सबबीखाली फौजदारी कारवाईही झाली नाही. त्यामुळे अत्याचार झालेल्या सहा मुलींनी न्यायाची अपेक्षा कोणाकडून करावी, हा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला आहे. निलंबनही नाही, स्वेच्छानिवृत्तीही नाही, तर गुपचूप बदलीविशेष म्हणजे, शासकीय मुलींच्या वसतिगृह अधीक्षिका सुरेखा राऊत यांच्या पतीने, मुलगा आणि त्याच्या मित्रांनी अत्याचार केल्याची घटना उघड झाली. प्रशासनाने दखल घेत कारवाईची तयारी केली. त्यानुसार बडतर्फीसाठी प्रथम निलंबित करणे आवश्यक होते; मात्र त्यावेळी राऊत यांनी स्वेच्छानिवृत्तीची तयारी दर्शविली. तशी प्रशासनाने सुटही दिली; मात्र त्यानंतर घडले ते वेगळेच. राऊत यांनी स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज मागे घेतला. त्याऐवजी महसूल विभागाबाहेर बदलीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. आता सुरेखा राऊत बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे वसतिगृह अधीक्षिका म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे. नवोदय विद्यालय आणि अकोट येथील शासकीय निवासी शाळेतील अत्याचारांच्या घटना घडल्यानंतर त्याची चौकशी करण्यासाठी विधिमंडळाची समिती अकोल्यात आलेली नाही. त्यापैकी नवोदय विद्यालयातील दोघांवर दाखल फौजदारी प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, तर अकोट प्रकरणात तक्रारी नसल्याने पुढे काही झाले नाही. - डॉ. आशा मिरगे, तत्कालीन सदस्य, राज्य महिला आयोग.