शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

‘कल्पना’ नसताना सरणावरही कोसळले आभाळ!

By admin | Updated: August 7, 2015 01:20 IST

दलित कुटूंबावर नियतीचा घाला; धो-धो पावसांत करावे लागले पोटच्या गोळ्यावर अंत्यसंस्कार

 शरद देशमुख / कार्ली (जि. वाशिम) : कार्ली येथील पाटील कुटूंबियांत पुर्वीपासूनच अठराविश्व दारिद्रय. अशातच अवघ्या १८ व्या वर्षी पोटच्या पोरीला (कल्पना) कर्करोगाने ग्रासले. गाठीशी असलेली पै अन् पै तिच्या उपचारावर खर्च करुनही शेवटी नियतीने तिला यमसदनी धाडलेच. इथपर्यंतच हा खेळ थांबला नाही; तर उघड्या स्मशानात तिच्यावर अंत्यसंस्कार करताना सरणावर चक्क आभाळ कोसळले. धो-धो पावसात सरण पेटविण्याकरिता नियतीपुढे हतबल झालेल्या कुटूंबाची धावपळ पाहून उपस्थितांनाही गहिवरुन आले. दलित कुटूंबात जन्माला आलेल्या कल्पना मधुकर पाटील या अभाग्या मुलीच्या नशिबी आलेली ही फरपट वाढलेल्या सामाजिक समस्या उजागर करणारी ठरली आहे. कर्करोगाने मृत्यूमुखी पडलेल्या कल्पना पाटीलवर ५ आॅगस्टला अंत्यसंस्कार करण्यात आले. यादिवशी परिसरात जोराचा पाऊस सुरु होता. सरणावर तिच्या मृतदेहाभोवती रचण्याकरिता सुकी लाकडं मिळाली नाहीत. त्यामुळे ओलीच लाकडं रचून रॉकेलच्या आधारे अग्नि देण्यात आला. मात्र, वरुन कोसळणाऱ्या पावसाच्या पाण्याने सरणावरची आग वारंवार विझत होती. या दुहेरी संकटाने मरणानंतरही कल्पनासोबत नियतीने मांडलेला खेळ पाहून अंत्यसंस्काराला आलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यातून आपसूकच अश्रू ओघळले. तथापि, जीवनातील त्रिकालाबाधित सत्य असणारा मृत्यू अन् त्यानंतर करावा लागणारा अंत्यविधी तरी किमान सुसह्य व्हायला हवा, अशी प्रत्येकाचीच मनिषा असते. मात्र, कार्लीच नव्हे; तर जिल्ह्यातील इतरही अनेक गावांमध्ये टिनशेडअभावी उघड्यावरच अंत्यसंस्कार उरकावे लागत आहेत. याप्रती गावपुढाऱ्यांनी सामाजिक जाणीवेतून पुढाकार घेत स्मशानभूमी सुधार मोहिम हाती घ्यावी, अशी मागणी यानिमित्ताने सर्वच स्तरातून जोर धरत आहे.