शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

उन्हाळी सोयाबीन हातून घेतल्याने आता शेतकऱ्यांना खरीपाची आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2022 17:58 IST

Agriculture News : यावर्षी ६८ हजार ८०० हेक्टर शेतीचे खरीप नियोजन असणार आहे.

-संजय उमकलोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : गतवर्षी तालुक्यात भरपूर प्रमाणात पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने उत्पादनात कमालीची घट झाली होती. ती घट भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी १४३ हेक्टरवर उन्हाळी सोयाबीन पेरणीचा प्रयोग केला. वाढत्या तापमाने ते सोयाबीन सुध्दा होरपळून गेले. यामुळे तालुक्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असल्याने पेरणी पूर्व मशागतीची कामे खोळंबली आहेत. बहुतांश शेती कोरडवाहू म्हणजे खरिपावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. मुबलक प्रमाणात पाऊस असल्याशिवाय येथील शेतकरी पेरणी करण्यासाठी धजावत नाही.         पिक कर्जावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात कर्जाची रक्कम बॅंकेने वाढवून न दिल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. कर्जाची रक्कम वाढवून मिळेल या आशेने जिल्हा बॅंकेचे पिक कर्जाची परतफेड शेतकऱ्यांनी केली पुन्हा कर्ज घेण्यासाठी अर्जही केला. पण बॅंकेने ती रक्कम वाढवून न देता पुन्हा तेवढेच कर्ज शेतकऱ्यांना देऊ त्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कोरडवाहू शेतीतील कपाशीच्या पिकाचा हंगाम संपण्याआधीच उलंगवाडी झाली आहे. तालुका कृषी विभागाच्या नियोजनानुसार यावर्षी ६८ हजार ८०० हेक्टर शेतीचे खरीप नियोजन असणार आहे. त्यामध्ये सोयाबीन ४५ हजार हेक्टर, कपाशी ९ हजार हेक्टर, तुर ११ हजार हेक्टर, मुग २ हजार ५०० हेक्टर, उडीद १ हजार ३०० हेक्टरवर पेरा असणार आहे. खरीप हंगामात कापूस हेक्टरी १०. ११ क्विंटल, तूर ३२.२० क्विंटल, सोयाबीन १४.०५ क्विंटल, मूग १० क्विंटल  उडीद ८ क्विंटल अशा प्रकारे उत्पन्न अपेक्षित असून यासाठी ४५ हजार क्विंटल घरगुती बियाणे उपलब्ध असल्याचे म्हटले आहे. यासाठी गतवर्षीच्या ७० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीकरण्यात आली होती. 

असे असेल शेतकऱ्यासाठी नियोजन 

  •   घरचे सोयाबीन बियाणे म्हणून वापर करण्यासाठी सर्व गावांमध्ये बीज उगवण व बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक
  • घेण्यात येत आहेत.
  •   सर्व गावांमध्ये गटांच्या माध्यमातून बांधावर खते व बियाणे पुरवठा करण्याकरिता नियोजन करणे सुरू
  • आहे.
  •    माती परीक्षण अहवालानुसार अन्नद्रव्याचे व्यवस्थपन नियोजन केले आहे.
  •  किड व रोग नियंत्रण करिता बीजप्रक्रिया मोहीम स्वरुपात करण्याचे नियोजन केले आहे.
  •  शेणखत, गांडूळखत, हिरवळीचे खत वापर नियोजन केले आहे.
  •  पिकाची फेरपालट करण्याचे नियोजन केले आहे.
  •  आंतरपिक/ मिश्रीपिक पद्धतीचा अवलंब करण्याचे नियोजन केले आहे.
  •   पिकाच्या वाढीच्या आवश्यकते नुसार खताचा वापर करण्याचे नियोजन केले आहे.
  •  सूक्ष्म मूलद्रव्याचा वापर शेणखातासोबत करण्याचे नियोजन केले आहे.

 ठिबक सिंचन द्वारे रासायानिक खतांचा वापर करण्याचे नियोजन केले आहे. असा आहे खत साठ

खत   -   लागणारे मेट्रिक टन -  आवंटन साठा युरिया -       ३५०० - ३५४४डीएपी -       २३०० - २३००एमओपी -      ७०२ -   ७०२एसएसपी -   २५०० - २५३३संयुक्त खते -  ४०००- ३९०४ 

अंदाजानुसार पाऊस वेळेवर असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे वेळीच आटोपून घ्यावीत.पेरणीसाठी लागणाऱ्या  बियाणांची उगवणक्षमता व बीज प्रकिया करूनच पेरणी करावी.. पेरणीकरिता १० वर्षाच्या आतील वाणाचा वापर करावा. पेरणीयोग्य पाऊस झाल्यावर पेरणी करावी. शेतकऱ्यांनी निविष्टा लवकर करून पेरणी वेळेवर करण्याचा प्रयत्न करावा.-अमृता काळे, तालुका कृषी अधिकारी, मूर्तिजापूर