शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

उन्हाळी सोयाबीन हातून घेतल्याने आता शेतकऱ्यांना खरीपाची आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2022 17:58 IST

Agriculture News : यावर्षी ६८ हजार ८०० हेक्टर शेतीचे खरीप नियोजन असणार आहे.

-संजय उमकलोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : गतवर्षी तालुक्यात भरपूर प्रमाणात पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने उत्पादनात कमालीची घट झाली होती. ती घट भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी १४३ हेक्टरवर उन्हाळी सोयाबीन पेरणीचा प्रयोग केला. वाढत्या तापमाने ते सोयाबीन सुध्दा होरपळून गेले. यामुळे तालुक्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असल्याने पेरणी पूर्व मशागतीची कामे खोळंबली आहेत. बहुतांश शेती कोरडवाहू म्हणजे खरिपावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. मुबलक प्रमाणात पाऊस असल्याशिवाय येथील शेतकरी पेरणी करण्यासाठी धजावत नाही.         पिक कर्जावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात कर्जाची रक्कम बॅंकेने वाढवून न दिल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. कर्जाची रक्कम वाढवून मिळेल या आशेने जिल्हा बॅंकेचे पिक कर्जाची परतफेड शेतकऱ्यांनी केली पुन्हा कर्ज घेण्यासाठी अर्जही केला. पण बॅंकेने ती रक्कम वाढवून न देता पुन्हा तेवढेच कर्ज शेतकऱ्यांना देऊ त्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कोरडवाहू शेतीतील कपाशीच्या पिकाचा हंगाम संपण्याआधीच उलंगवाडी झाली आहे. तालुका कृषी विभागाच्या नियोजनानुसार यावर्षी ६८ हजार ८०० हेक्टर शेतीचे खरीप नियोजन असणार आहे. त्यामध्ये सोयाबीन ४५ हजार हेक्टर, कपाशी ९ हजार हेक्टर, तुर ११ हजार हेक्टर, मुग २ हजार ५०० हेक्टर, उडीद १ हजार ३०० हेक्टरवर पेरा असणार आहे. खरीप हंगामात कापूस हेक्टरी १०. ११ क्विंटल, तूर ३२.२० क्विंटल, सोयाबीन १४.०५ क्विंटल, मूग १० क्विंटल  उडीद ८ क्विंटल अशा प्रकारे उत्पन्न अपेक्षित असून यासाठी ४५ हजार क्विंटल घरगुती बियाणे उपलब्ध असल्याचे म्हटले आहे. यासाठी गतवर्षीच्या ७० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीकरण्यात आली होती. 

असे असेल शेतकऱ्यासाठी नियोजन 

  •   घरचे सोयाबीन बियाणे म्हणून वापर करण्यासाठी सर्व गावांमध्ये बीज उगवण व बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक
  • घेण्यात येत आहेत.
  •   सर्व गावांमध्ये गटांच्या माध्यमातून बांधावर खते व बियाणे पुरवठा करण्याकरिता नियोजन करणे सुरू
  • आहे.
  •    माती परीक्षण अहवालानुसार अन्नद्रव्याचे व्यवस्थपन नियोजन केले आहे.
  •  किड व रोग नियंत्रण करिता बीजप्रक्रिया मोहीम स्वरुपात करण्याचे नियोजन केले आहे.
  •  शेणखत, गांडूळखत, हिरवळीचे खत वापर नियोजन केले आहे.
  •  पिकाची फेरपालट करण्याचे नियोजन केले आहे.
  •  आंतरपिक/ मिश्रीपिक पद्धतीचा अवलंब करण्याचे नियोजन केले आहे.
  •   पिकाच्या वाढीच्या आवश्यकते नुसार खताचा वापर करण्याचे नियोजन केले आहे.
  •  सूक्ष्म मूलद्रव्याचा वापर शेणखातासोबत करण्याचे नियोजन केले आहे.

 ठिबक सिंचन द्वारे रासायानिक खतांचा वापर करण्याचे नियोजन केले आहे. असा आहे खत साठ

खत   -   लागणारे मेट्रिक टन -  आवंटन साठा युरिया -       ३५०० - ३५४४डीएपी -       २३०० - २३००एमओपी -      ७०२ -   ७०२एसएसपी -   २५०० - २५३३संयुक्त खते -  ४०००- ३९०४ 

अंदाजानुसार पाऊस वेळेवर असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे वेळीच आटोपून घ्यावीत.पेरणीसाठी लागणाऱ्या  बियाणांची उगवणक्षमता व बीज प्रकिया करूनच पेरणी करावी.. पेरणीकरिता १० वर्षाच्या आतील वाणाचा वापर करावा. पेरणीयोग्य पाऊस झाल्यावर पेरणी करावी. शेतकऱ्यांनी निविष्टा लवकर करून पेरणी वेळेवर करण्याचा प्रयत्न करावा.-अमृता काळे, तालुका कृषी अधिकारी, मूर्तिजापूर