शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

बुलडाणा जिल्ह्यात वादळी पाऊस

By admin | Updated: June 6, 2016 02:27 IST

झाडे उन्मळून पडल्याने बोथा-खामगाव मार्ग दीड तास बंद.

बुलडाणा : रविवारी सायंकाळी झालेल्या वादळी वार्‍यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. या वादळाने ठिकठिकाणी घरावरची टिन पत्रे उडाली, तर झाडे उन्मळून पडल्याने बुलडाणा-बोथा-खामगाव मार्ग तब्बल दीड तास बंद होता. अचानक आलेल्या या वादळाने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. अमडापूर, उन्द्री परिसरात जोरदार वादळाने शाळेवरील टिनपत्रे उडाली, तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याची घटना घडली. चिखली परिसरात तुरळक पाऊस झाला. बुलडाणा, धाड, चांडोळ, सागवन, कोलवड या भागात विजेच्या कडकडाटांसह पावसाने हजेरी लावली. देऊळघाट येथे वादळी वार्‍याने झोपडपट्टी भागातील घरावरील टिनपत्रे उडाल्याने नुकसान झाले. तसेच पाडळी, दत्तपूर, उमाळा येथेसुद्धा झाडे उन्मळून पडली. बुलडाणा परिसरात दुपारी चारच्या सुमारास अचानक वादळी वार्‍याला सुरुवात झाली. तब्बल अर्धा तास पाऊस झाल्याने रविवारच्या आठवडी बाजारात व्या पारी व नागरिकांची एकच धांदल उडाली. विशेष म्हणजे विजांचा कडकडाट झाल्याने बाजार गुंडाळावा लागला. उन्द्री येथे दुपारी चार वाजता वादळी वार्‍यासह दमदार पाऊस झाला. या वादळाने शिवाजी हायस्कूल व गुरूकृपा मराठी शाळेवरचे टिनपत्रे उडाली, तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. उन्द्री येथे आठवडी बाजार असल्यामुळे या वादळी पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. मोताळा तालुक्यात धा.बढे, मोताळा परिसरातही जोरदार पाऊस झाला. रविवार, ५ जूनच्या दुपारी चार वाजेदरम्यान आकाशात ढग दाटून आले आणि वादळी वार्‍यासह पावसाला सुरुवात झाली. मान्सूनपूर्व पावसाची ही पहिलीच हजेरी असल्यामुळे दुपारपर्यंत असलेल्या उन्हाची दाहक ता कमी होऊन हवेत गारवा निर्माण झाला होता.