शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
3
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
4
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
5
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
6
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
7
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
8
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
9
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
10
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
11
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
12
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
13
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
14
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
15
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
16
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
17
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
18
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
19
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
20
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...

वंचित बहुजन आघाडीचा टक्का वाढणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 21:21 IST

बहुजन वंचित आघाडी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात महत्त्वाची आहे.

- राजरत्न सिरसाट,अकोला: राज्यात तिसरा पर्याय निर्माण करणारे भारिप बहुजन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड़  प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात ४८ जागी उमेदवार उभे करू न महाआघाडी, महायुतीसमोर आव्हान उभे केले. प्रथमच नवीन प्रयोग करीत त्यांनी बलुतेदार, अलुतेदार, वंचितांना प्रतिनिधित्व दिले. हा प्रयोग यशस्वी किती होतो, हे निवडणुकांचा निकाल लागल्याावरच समोर येईल; पण आता तरी राज्यात त्यांनी चुरस निर्माण केली. त्यांच्या सभांना स्वयंस्फूर्तीने मिळणारा प्रतिसाद दखलपात्र नव्हे, तर विचार करायला लावणारा आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत त्यांचा मतदानाचा टक्का वाढणारच असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.त्यामुळे निवडणुकीत वचिंत बहुजन आघाडीच्या कामगीरीकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.   १९८४ मध्ये अकोल्यात पाऊल ठेवल्यानंतर आंबेडकरांनी मागे वळून बघितले नाही. भारतीय रिपब्लिकन पक्षाची चळवळ त्यांनी सुरू  केली. बहुजन समाजाला एकत्र करण्यासाठी त्यांनी त्यानंतर भारतीय रिपब्लिकन पक्ष-बहुजन महासंघ (भारिप-बमसं) नामकरण केले. याच काळात अकोला पॅटर्न उदयास आला. अकोला जिल्हा परिषद, पंचायत समित्या तसेच ग्रामपंचायत काबीज करीत त्यांनी विधानसभेत पाच आमदार निवडून आणले. बाळासाहेब आंबेडकरही अकोल्यातून दोनदा लोकसभेवर निवडून गेले. अकोल्यात त्यांनी केलेले ‘सोशल इंजिनिअरिंग’ पश्चिम विदर्भात रुजू लागले. हा प्रयोग चळवळीला राज्यात व्यापक स्वरू प प्राप्त करू न देण्यासाठी आंबेडकरांना ३५ वर्षे खर्ची घालावी लागली. मागील वर्षी त्यांनी बहुजन वंचित आघाडी निर्माण करू न चळवळीला नवीन धार निर्माण केली. पंढरपूरला धनगर समाजाच्या मेळाव्यात निर्धार क रीत राज्यातील वंचितांना सोबत घेऊन त्यांनी वादळ निर्माण केले. त्यांच्या सभांना होणारी गर्दी, मुंबईतील शिवाजी पार्कची सभा ही लक्षवेधी ठरली. वंचितांचा वाढता सहभाग बघता, त्यांनाही प्रतिनिधित्व मिळावे म्हणून त्यांनी कोणत्याही पक्षासोबत युती न करता ४८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आणि त्या समाजामध्ये चैतन्य निर्माण के ले. त्यांच्या या भूमिकेवर मात्र टीका करणाºयांची यादी वाढत गेली; पण आंबेडकर त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. वंचितांना त्यांच्या अधिकाराची जाणीव व्हावी, असा त्यांचा उद्देश आहे.     राज्यातील ४८ मतदारसंघांतील उमेदवार व उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्यांच्यासोबत स्वयंस्फूर्तीने जाणाºया कार्यकर्त्यांची गर्दी बघितल्यास यावेळी बहुजन वंचित आघाडीचा मतदानाचा टक्का वाढेल, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुका आहेत. विधानसभा निवडणूक  खºया अर्थाने त्यांचे लक्ष्य आहे. त्यानुषंगाने त्यांचे नियोजन असल्यास वंचित बहुजन आघाडीतील वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेतून हे लक्षात येते. विधानसभा निवडणुकीची ही त्यांची लिटमस टेस्ट असल्याचे वरिष्ठ कार्यकर्ते बोलतात. त्याच अनुषंगाने ही बांधणी आहे. राज्यात बॅ. असुदुद्दीन ओवैसी यांच्या एक-दोन सभा वगळता अ‍ॅड़  बाळासाहेब आंबेडकरांकडेच प्रचाराची धुरा आहे. ओवैसींच्या ‘एमआयएम’सोबतची युती ही मुस्लीम मतांची मोट बांधण्याचा हा त्यांचा प्रयोग आहे. हाच प्रयोग विधानसभेतही राहणार असल्याने विधानसभेत तर नक्कीच वेगळे करू न दाखवू, असे वंचित बहुजन आघाडीला वाटते.

टॅग्स :AkolaअकोलाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी