शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कोवळ्या पिकावर वन्य प्राण्यांचा ताव; शेतकऱ्यांची रात्रभर जागल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:14 IST

रिॲलिटी चेक रवी दामोदर अकोला: शेतकऱ्यांवरील संकटांची मालिका संपत नसल्याचे चित्र आहे. एकीकडे कोरोना विषाणू, तर दुसरीकडे अस्मानी संकट ...

रिॲलिटी चेक

रवी दामोदर

अकोला: शेतकऱ्यांवरील संकटांची मालिका संपत नसल्याचे चित्र आहे. एकीकडे कोरोना विषाणू, तर दुसरीकडे अस्मानी संकट यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. शेतकरी दुहेरी संकटात असतानाच शेतकऱ्यांसमोर आणखी एक संकट उभे ठाकले आहे. जूनच्या प्रारंभी पावसाने चांगली सुरुवात केल्याने जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली होती. सध्या शेतकऱ्यांनी पेरलेली पिके शेतात डोलू लागली आहेत. या कोवळ्या पिकांवर वन्य प्राणी ताव मारत असून, पीक फस्त करीत असल्याचे चित्र आहे. पिके पावसाअभावी व वन्य प्राण्यांपासून वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रभर जागल करावी लागत असल्याचे चित्र आहे.

गत आठवडाभरापासून पावसाने दडी मारल्याने डोलणाऱ्या पिकांनी पावसाअभावी माना टाकल्या आहेत. पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. अशातच जिल्ह्यात ठिकठिकाणी वन्य प्राण्यांनी आपला मोर्चा आता कोवळ्या पिकांकडे वळविला असून, शेतकरी आता तिहेरी संकटात सापडल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. पुढील आठवडाभरात दमदार पावसाने हजेरी न लावल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची टांगती तलवार आहे. (फोटो)

------------------------------------

पाऊसही रुसला!

येत्या आठवडाभरात पाऊस न झाल्यास उगवलेली पिके जळून जाण्याचा धोका वाढला आहे. त्याचबरोबर दुबार पेरणीची वेळ आली, तर शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. सध्या जी पिके शेतात उगवली आहेत त्या पिकांना पाण्याची गरज आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे, ते शेतकरी स्प्रिंक्लरद्वारे पाणी देत आहेत. जर पाऊस लांबला, तर दुबार पेरणीशिवाय पर्याय नाही.

----------------------------

रात्रीस खेळ चाले!

दिवसा बहुतांश शेतकरी शेतात असल्याने वन्य प्राणी शेतात येत नाही. परंतु रात्रीच्या सुमारास हरीण, रानडुकरांचे कळपचे कळप उगवलेल्या पिकांवर ताव मारीत आहेत. त्यामुळे शेतकरी स्वत:चा जी धोक्यात टाकून रात्रीच्या सुमारास जागल करून पिकांचे रक्षण करीत असल्याचे चित्र आहे.

---------------------

दररोज ढग येतात दाटून!

मृग नक्षत्रात सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने काही शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पेरणी करून उगवलेली पिके आता पावसाच्या प्रतीक्षेत असताना पाऊस मात्र गायब झाला आहे. दररोज आकाशात ढग दाटून येतात. सकाळी पाऊस येईल, असे वातावरण निर्माण होते, तर सायंकाळच्या सुमारास आलेले ढग न बरसताच निघून जातात.

-------------------------------------

जून महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने सोयाबीन पिकाची पेरणी केली. पावसाने दडी मारल्याने सिंचनाद्वारे पीक वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशातच वन्य प्राणी रात्रीच्या सुमारास उगवलेले पीक फस्त करीत असल्याने रात्रभर जागल करून पिकांचे रक्षण करावे लागते. सध्या पावसाची प्रतीक्षा आहे.

- ऋषिकेश घोगरे, शेतकरी.