शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

गाव तेथे एसटी फक्त शहरांसाठीच का धावतेय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:14 IST

कोरोनामुळे बंद असलेली एसटीची प्रवासी सेवा पुन्हा सुरू झाली आहे. हळूहळू प्रवासी संख्याही वाढत आहे. त्यानुसार बसेसच्या फेऱ्या वाढविण्याचे ...

कोरोनामुळे बंद असलेली एसटीची प्रवासी सेवा पुन्हा सुरू झाली आहे. हळूहळू प्रवासी संख्याही वाढत आहे. त्यानुसार बसेसच्या फेऱ्या वाढविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत आगार क्रमांक २ मधून ३० बसेस सोडण्यात येत आहेत. यामध्ये सर्वाधिक लांब पल्ल्याच्या फेऱ्या आहेत. जवळपास ३० टक्के बसेस अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. शाळा बंद व प्रवासी नसल्याने ग्रामीण भागातील बसेसच्या फेऱ्या अद्याप बंद आहेत. त्यामुळे खासगी प्रवासी वाहतूक वाढली आहे. मुख्य मार्गावरील गाव सोडता इतर गावांमध्ये खासगी बसेस, टमटम रिक्षा, काळी पिवळी या वाहनांचा आधार घेतला जात आहे.

आगारातील एकूण बसेस - ५२

कोरोनाआधी दररोज सोडण्यात येणाऱ्या बसेस - ५२

सध्या सुरू असलेल्या फेऱ्या - ८०

खेडेगावांत जाण्यासाठी ‘ऑटो’चा आधार

ज्या गावांमध्ये बसेस नाहीत किंवा कमी आहेत अशा ठिकाणीही ऑटो, काळीपिवळी, खासगी बसेस सुरू झाल्या आहेत. प्रवासीही या वाहनांनी प्रवास करत आहेत. सिसा, जऊळका या आडरस्त्यावरील गावांमध्ये खासगी वाहनांद्वारे प्रवासी वाहतूक होत आहे. ही वाहनेही गच्च भरून जात आहेत.

११ हजार कि.मी.चा प्रवास, पण फक्त शहरांचाच!

जिल्ह्यातील मुख्य मार्गावरील गावांना बसेसना थांबा देण्यात आला आहे; परंतु ग्रामीण भागात मुक्कामी राहणाऱ्या बसेस सुरू झाल्या नाहीत. केवळ शहरामध्ये जाणाऱ्या या बसेस दररोज ११ हजार किमीची प्रवास करीत आहेत. या माध्यमातून दररोज २ लाख ७५ हजार रुपयांच्या जवळपास उत्पन्न प्राप्त होत आहे.

खेडेगावांवरच अन्याय का?

कोरोनाकाळाआधी गावात बसफेरी व्यवस्थित सुरू होती; परंतु कोरोनाकाळापासून बसफेरी बंद आहे. शहरात जाण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. एखाद्या वेळेस हे वाहनही मिळत नाही.

- श्रीकृष्ण इंगळे, पारस

जिल्ह्याच्या ठिकाणाहून एसटी बसद्वारे दळणवळणासाठी सोयीस्कर प्रवास होता; परंतु कोरोनामुळे बसफेऱ्या बंद आहेत. त्यामुळे खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. हे सामान्य नागरिकाला आता परवडत नाही. आधीप्रमाणे बस येणे सुरू करून प्रशासनाने सहकार्य करावे.

- राजेश हरणे, वणी रंभापूर

या गावांना बस कधी सुरू होणार?

शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांची शहरात ये-जा बंद आहे. खेड्यापाड्यातील प्रवासी संख्याही कमी आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बसेस बंद आहेत. यामध्ये पातूर नंदापूर, पारस, खेट्री, जऊळका, धामणासह मोठ्या प्रमाणात गावांमध्ये बसेस बंद आहेत. त्यामुळे या बसेस कधी सुरू होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.