शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

गाव तेथे एसटी फक्त शहरांसाठीच का धावतेय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:14 IST

कोरोनामुळे बंद असलेली एसटीची प्रवासी सेवा पुन्हा सुरू झाली आहे. हळूहळू प्रवासी संख्याही वाढत आहे. त्यानुसार बसेसच्या फेऱ्या वाढविण्याचे ...

कोरोनामुळे बंद असलेली एसटीची प्रवासी सेवा पुन्हा सुरू झाली आहे. हळूहळू प्रवासी संख्याही वाढत आहे. त्यानुसार बसेसच्या फेऱ्या वाढविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत आगार क्रमांक २ मधून ३० बसेस सोडण्यात येत आहेत. यामध्ये सर्वाधिक लांब पल्ल्याच्या फेऱ्या आहेत. जवळपास ३० टक्के बसेस अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. शाळा बंद व प्रवासी नसल्याने ग्रामीण भागातील बसेसच्या फेऱ्या अद्याप बंद आहेत. त्यामुळे खासगी प्रवासी वाहतूक वाढली आहे. मुख्य मार्गावरील गाव सोडता इतर गावांमध्ये खासगी बसेस, टमटम रिक्षा, काळी पिवळी या वाहनांचा आधार घेतला जात आहे.

आगारातील एकूण बसेस - ५२

कोरोनाआधी दररोज सोडण्यात येणाऱ्या बसेस - ५२

सध्या सुरू असलेल्या फेऱ्या - ८०

खेडेगावांत जाण्यासाठी ‘ऑटो’चा आधार

ज्या गावांमध्ये बसेस नाहीत किंवा कमी आहेत अशा ठिकाणीही ऑटो, काळीपिवळी, खासगी बसेस सुरू झाल्या आहेत. प्रवासीही या वाहनांनी प्रवास करत आहेत. सिसा, जऊळका या आडरस्त्यावरील गावांमध्ये खासगी वाहनांद्वारे प्रवासी वाहतूक होत आहे. ही वाहनेही गच्च भरून जात आहेत.

११ हजार कि.मी.चा प्रवास, पण फक्त शहरांचाच!

जिल्ह्यातील मुख्य मार्गावरील गावांना बसेसना थांबा देण्यात आला आहे; परंतु ग्रामीण भागात मुक्कामी राहणाऱ्या बसेस सुरू झाल्या नाहीत. केवळ शहरामध्ये जाणाऱ्या या बसेस दररोज ११ हजार किमीची प्रवास करीत आहेत. या माध्यमातून दररोज २ लाख ७५ हजार रुपयांच्या जवळपास उत्पन्न प्राप्त होत आहे.

खेडेगावांवरच अन्याय का?

कोरोनाकाळाआधी गावात बसफेरी व्यवस्थित सुरू होती; परंतु कोरोनाकाळापासून बसफेरी बंद आहे. शहरात जाण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. एखाद्या वेळेस हे वाहनही मिळत नाही.

- श्रीकृष्ण इंगळे, पारस

जिल्ह्याच्या ठिकाणाहून एसटी बसद्वारे दळणवळणासाठी सोयीस्कर प्रवास होता; परंतु कोरोनामुळे बसफेऱ्या बंद आहेत. त्यामुळे खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. हे सामान्य नागरिकाला आता परवडत नाही. आधीप्रमाणे बस येणे सुरू करून प्रशासनाने सहकार्य करावे.

- राजेश हरणे, वणी रंभापूर

या गावांना बस कधी सुरू होणार?

शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांची शहरात ये-जा बंद आहे. खेड्यापाड्यातील प्रवासी संख्याही कमी आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बसेस बंद आहेत. यामध्ये पातूर नंदापूर, पारस, खेट्री, जऊळका, धामणासह मोठ्या प्रमाणात गावांमध्ये बसेस बंद आहेत. त्यामुळे या बसेस कधी सुरू होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.