शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजावरच अन्याय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:19 IST

सध्याच्या राजकारणात मोजका मराठा समाज आहे. जे पाच-दहा टक्के मराठा समाज राजकारणात सक्रिय आहे, ती मोठी घराणी आहेत. त्यावरून ...

सध्याच्या राजकारणात मोजका मराठा समाज आहे. जे पाच-दहा टक्के मराठा समाज राजकारणात सक्रिय आहे, ती मोठी घराणी आहेत. त्यावरून संपूर्ण मराठा समाजाच्या परिस्थितीची जाणीव होत नाही. सध्या बहुतांश मराठा समाज हा हलाकीच्या परिस्थितीत जीवन जगत आहे. देशात आज अनेक राज्यात अवांतर ५० टक्के पेक्षा अधिक आरक्षण आहे. मग एकट्या मराठा समाजावरच देशभरात अन्याय करण्याचे काय कारण आहे? या अन्यायाविराेधात लवकरच आक्रमक भूमिका सरकारला बघायला मिळेल.

डाॅ. अभय पाटील, मराठी क्रांती माेर्चा समन्वयक

....................................

५८ क्रांती माेर्चे, कायदेशीर लढाई, अनेक तरुणांचे बलिदान, मागासवर्गीय आयाेगाने नाेंदविलेले निरक्षण याबाबत बाजू मांडण्यात सरकारला अपयश आलेले आहे. अनेक राज्यांनी ५० टक्केपेक्षा अधिक आरक्षण मर्यादा ओलांडली आहे, त्यामुळे मराठा आरक्षणासाठीच काेलदांडा का? आणखी किती आक्रमक हाेणे अपेक्षित आहे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे म्हणजे शेतकरी कष्टकरी व लढवय्या समाजावर केलेल्या अन्याय आहे.

अशाेक पटाेकार, जिल्हा अध्यक्ष मराठा सेवा संघ अकाेला

...................................

समाजाचा अपेक्षाभंग झाला इतर राज्यात ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली असतांना ते रद्द न करता महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजाला वेगळा न्याय का? हा मुद्धा पटवून देण्यात राज्य शासन तसेच केंद्र शासन कमी पडले, त्यास दोन्ही शासन जबाबदार आहेत, त्यामुळे पुनर्याचिका दाखल करा किंवा अजून काय ती कायद्यात दुरुस्ती करता येईल ते करा, आता ही दोन्ही शासनाची संयुक्त जबाबदारी आहे. ५८ मोर्चे आणि ४२ तरुणांचं बलिदान हे वाया जाता कामा नये. यासाठी समाज आता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.

- विनायकराव पवार, उपाध्यक्ष, अखिल भारतीय मराठा महासंघ.

............................................

मराठा समाजाला आरक्षणाच्या नावावर झुलवत ठेऊन त्यांच्यासोबत आरक्षण तर नाहीच नुस्ता खोडसाळपणा होत आला आहे.

जी गोष्ट टिकणारी नाही संवैधानिक किंवा कायदेशीर नाही ते आरक्षण लागू करून सर्वच पक्षाच्या राज्यकर्त्या मंडळींनी मराठा समाजाला खेळवत ठेवले आहे.

मुळात मराठा समाजाला ओबीसी कोठ्यातून सर्वत्र टिकणारे कायदेशीर आरक्षण देणे राज्यकर्त्यांची जबाबदारी होती.

अविनाश पाटील नाकट

............................................

मराठा आरक्षणच्या प्रकरणात केंद्र व राज्य सरकार दाेन्हीही अपुरे पडले. मराठा समाज आरक्षणाची मागणी अतिशय संयुक्तिक आहे या निकालामुळे समाजमन अस्वस्थ असून लवकरच आक्रमक भूमिका घेण्याबाबत निर्णय घेतल्या जाईल.

कृष्णा अंधारे, जिल्हाध्यक्ष अ.भा.मराठा महासंघ अकाेला तसेच राज्य समन्वयक मराठा क्रांती माेर्चा

......................................

सर्वोच न्यायालयाचा हा निकाल गरीब मराठ्यांसाठी अतिशय दुर्दैवी आहे. श्रीमंत मराठ्यांच्या तुलनेत आपण सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहोत ही जाणीव जोपर्यंत गरीब मराठ्यांमध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत त्याला आरक्षण मिळणार नाही. गरीब मराठ्यांनी आता स्वतःची वेगळी राजकीय ओळख निर्माण करावी.

डॉ. धैर्यवर्धन पुंडकर

प्रदेश उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र

.....................

राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत न्यायालयात बाजू मांडण्यात अपयशी ठरले आहे. सरकारकडून जाे समन्वय हाेणे अपेक्षित हाेते ताेही झालेला नाही. आगामी काळात चुका दुरूस्त करून मराठा समाजाच्या अतिशय जिव्हाळ्याच्या या प्रश्नावर सरकारने याेग्य भूमिका घ्यावी. भाजपाच्या वतीने आरक्षणची लढाई अधिक तीव्र केली जाईल.

डाॅ. रणजित पाटील, माजी मंत्री

.....................................

भाजप सरकारने उच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवले होते. बत्तीस टक्के समाज मागास ठरतो त्यावेळी असाधारण परिस्थिती म्हणून पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडावी लागते, हे भाजप सरकारने उच्च न्यायालयाला यशस्वीरित्या पटवून दिले. परंतु, नेमका हाच असाधारण परिस्थितीचा मुद्दा महाविकास आघाडी सरकार सर्वोच्च न्यायालयासमोर प्रभावीपणे मांडू शकले नाही आणि मराठा समाजाने आरक्षण गमावले.

रणधीर सावरकर आमदार जिल्हाध्यक्ष भाजप

.......................................

मराठा आरक्षणाचा सर्वोच्च न्यायालयात बचाव करण्यात राज्यातील सत्ताधारी आघाडी सरकारला पूर्ण अपयश आले असून आघाडी सरकारमुळे मराठा समाजाने शिक्षण व नोकरीतील आरक्षण गमावले आहे. यामुळे मराठा तरुण तरुणींच्या आयुष्यात अंधार निर्माण झाला असून मराठा समाज महाविकास आघाडी सरकारला माफ करणार नाही.

गाेर्वधन शर्मा आमदार

...............................

गेल्या वर्षी आधी सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षणाला स्थगिती आली व आता तर हे आरक्षण रद्दच झाले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत महाविकास आघाडी सरकार गंभीर नव्हते. मराठा आरक्षण न्यायालयात टिकविण्यासाठी समन्वय नव्हता.

प्रकाश भारसाकळे आमदार

.................................

मराठा आरक्षणाची बाजू मांडताना देवेंद्र फडणवीस यांनी समाजाची दिशाभूल केली. आज परत ते दिशाभूल करताहेत. सरकार पाडण्यासाठी जिवाच्या आकांताने दिल्ली स्वारी करणाऱ्या फडणवीस साहेबांनी इतकीच प्रामाणिक मेहनत आरक्षणासाठी घेतली असती, केंद्र सरकारला चुकीचे ब्रिफिंग केले नसते तर आज मराठा समाजावर अन्याय झाला नसता

अमाेल मिटकरी, आमदार

..................................