शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

अकरावीसाठी विद्यार्थ्यांचा ओढा ग्रामीण भागात कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:14 IST

शहरात अकरावी प्रवेश देणारी कनिष्ठ महाविद्यालये- ५४ एकूण जागा- ८९५५ गेल्या वर्षी किती अर्ज आले- ४७२५ किती जणांनी प्रवेश ...

शहरात अकरावी प्रवेश देणारी कनिष्ठ महाविद्यालये- ५४

एकूण जागा- ८९५५

गेल्या वर्षी किती अर्ज आले- ४७२५

किती जणांनी प्रवेश घेतला- ४४२६

किती जागा रिक्त राहिल्या- ४५२९

अकरावीसाठी गावांत प्रवेश का?

विद्यार्थी अकरावीला सहजतेने प्रवेश घेतात. बारावीचे वर्ष महत्त्वाचे असल्यामुळे वैद्यकीय व अभियांत्रिकीची तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून खासगी शिकवणी वर्गांमध्ये प्रवेश घेतात. त्यामुळे येथील तासिकांना उपस्थित राहता यावे यासाठी विद्यार्थी अकरावीसाठी गावांतील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतात. तासिकांना जाण्याची गरज नाही. केवळ प्रात्यक्षिकला कॉलेजमध्ये गेले तर भागते. याउलट शहरी कॉलेजमध्ये ७५ टक्के उपस्थिती, प्रात्यक्षिकांना हजेरी लावावी लागते. त्यामुळे गावांमधील कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थी पसंती देतात.

म्हणून घेतला गावांत प्रवेश

बारावीचे वर्ष महत्त्वाचे असल्याने, नीट, सीईटीची तयारी करावी लागते. शिकवणी वर्ग, अभ्यासासाठी वेळ मिळावा यासाठी ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यावा लागतो. शहरातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतल्यास काही प्रमाणात का होईना, हजेरी द्यावी लागते.

-श्रेयश गदाधर, विद्यार्थी

गावांतील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला. दररोज जाण्याची गरज नाही. केवळ प्रात्यक्षिकांना बोलाविले जाते. शिकवणी, अभ्यासाला पुरेसा वेळ मिळतो. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे ग्रामीण भागातील महाविद्यालय प्रवेशाच्या दृष्टीने सुरक्षित आहेत.

-गौरव कवडकार, विद्यार्थी

अकरावीसाठी ग्रामीण भागात प्रवेश घेण्याचे प्रमाण एवढे मोठे नाही. कोरोनामुळे बाहेरगाव, परजिल्ह्यातील विद्यार्थी येत नसल्यामुळे शहरातील महाविद्यालयांमधील जागा रिक्त राहत आहेत. त्यासाठी शिक्षण विभागाने अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबवावी.

-प्रा. विवेक डवरे, संस्थाचालक

कोरोनामुळे शिक्षणावर मोठा परिणाम झाला आहे. यापूर्वी परजिल्ह्यासोबतच परगावचे विद्यार्थी शहरात शिक्षणासाठी यायचे. परंतु, कोरोनामुळे विद्यार्थी त्यांच्या गावी, परिसरातच प्रवेश घेत आहेत. तसेच ग्रामीण भागातही विद्यार्थी प्रवेश घेतात. त्यामुळे शहरातील महाविद्यालयांमधील जागा रिक्त राहतात.

-पुष्पा गुलवाडे, संस्थाचालक