शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
4
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
5
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
6
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
7
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
8
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
9
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
10
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
11
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
12
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
13
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
14
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
15
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
16
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
17
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
18
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
19
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
20
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू

केंद्रीय गृहमंत्री माेघम बाेलुन काेणाला वाचवतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:19 IST

अकाेला : वाझे व परमबीर प्रकरणामुळे राजकारण, प्रशासन व पाेलीस यांच्यामधील गुन्हेगारी प्रवृत्ती व या प्रवृत्तीची टाेळी मानसिकता समाेर ...

अकाेला : वाझे व परमबीर प्रकरणामुळे राजकारण, प्रशासन व पाेलीस यांच्यामधील गुन्हेगारी प्रवृत्ती व या प्रवृत्तीची टाेळी मानसिकता समाेर आली आहेे. हे समाजासाठी घातक आहे. त्यामुळे या प्रकरणात अडचणीत आल्यामुळेच राष्टवादीच्या नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री यांची भेट तर घेतली नाही? अमित शहा यांनी माेघम न बाेलता स्पष्ट बाेलावे, माेघम बाेलून ते काेणाला वाचवतात? असा प्रश्न ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.

वाझे व परमबीर प्रकरणात १०० काेटींमध्ये काेणाचा हिसा हाेता, महाविकास आघाडीमधील प्रत्येक घटक पक्षाला किती वाटा दिला जात हाेता, हे समाेर येणे गरजेचे आहे. या प्रकारामुळे महाराष्ट्रात भविष्यात काय अराजकता वाढून ठेवली आहे, हे समाेर येते. आज ही टाेळी बारवाल्यायापर्यंत पाेहचली, उद्या ती सामान्यांच्या घरापर्यंत पाेहचायला वेळ लागणार नाही? त्यामुळे या प्रकरणातील सत्य समाेर आले पाहिजे. देशाचे गृहमंत्री शरद पवारांच्या भेटीवर साऱ्याच गाेष्टी सार्वजनिक करायच्या नाहीत असे म्हणतात. त्यामुळे या १०० काेटीमध्ये भाजपाचाही वाटा आहे का, अशी शंका आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. जर वाटा नसेल तर भाजपाने या भेटीमागील सत्य बाहेर सांगितले पाहिजे असे आव्हान त्यांनी दिले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष डाॅ धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हा अध्यक्ष प्रदीप वानखडे आदी उपस्थित हाेते.

बाॅक्स

चाैकशी समितीची गरज नाही... मुख्यमंत्र्यांनीच भूमिका घ्यावी

१०० काेटींच्या वसुली प्रकरणात चाैकशी समिती नेमण्याचे कारणच नाही? या प्रकरणात परमबीरसिंग यांनी केलेले दावे, रश्मी शुक्ला यांचे फाेन टॅपिंग प्रकरण यामधील सत्य मुख्यमंत्र्यांना माहीत आहेच. त्यांनी या प्रकरणात ठाेस भूमिका घेऊन स्वत:ची प्रतिमा जपावी, अन्यथा मुख्यमंत्री कार्यालयाचाही यामध्ये सहभाग हाेता हे स्पष्ट हाेईल, असा आराेपही ॲड. आंबेडकर यांनी केला.

बाॅक्स....

न्यायालयाने परमबीरसिंग यांची याचिका स्वीकारावी

परमबीरसिंग हे स्वत:हून न्यायालयासमाेर आले हाेते. न्यायालयाने सिंग यांनी केलेल्या चुका व गैरवर्तन प्रतिज्ञापत्रावर घेतले असते तर या प्रकरणातील सत्य अधिक जलदगतीने समाेर आले असते. त्यामुळे न्यायालयाने परमबीरसिंग यांची याचिका स्वीकारण्याची विनंतीही ॲड. आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली.

बाॅक्स...

पंढरपूरची उमेदवारी माेटे यांना घाेषित

पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून वीरप्पा मधुकर मोटे यांच्या नावाची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात पत्रकार परिषदेत केली.