शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

आर्सेनिक औषधावर नियंत्रण कोणाचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 09:59 IST

हे औषध कोणी बनवावे, कोणी विकावे, यावर सध्या तरी कोणाचेच नियंत्रण नाही.

ठळक मुद्दे ‘आर्सेनिक अल्बम-३०’ हे औषध रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरते. प्रसाद वाटावा असे या औषधीचे वितरण होत आहे.

- राजेश शेगोकार  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोनामुळे दुर्लक्षित असलेल्या अनेक गोष्टींना एकदमच झळाळी प्राप्त होऊन त्यांची मागणी वाढली आहे. त्यामध्ये सॅनिटायझर, मास्क यांच्या जोडीला होमिओपॅथी औषधांचाही समावेश आहे. एरव्ही साबुदाण्याच्या गोळ्या म्हणून ज्या पॅथीला हिणवले जात असे त्याच होमिओपॅथीच्या ‘आर्सेनिक अल्बम-३०’ या औषधाला सध्या प्रचंड मागणी आहे; मात्र हे औषध कोणी बनवावे, कोणी विकावे, यावर सध्या तरी कोणाचेच नियंत्रण नाही. त्यामुळे प्रसाद वाटावा असे या औषधीचे वितरण होत आहे.केंद्रीय आयुष मंत्रालयाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये होमिओपॅथीचा समावेश करून ‘आर्सेनिक अल्बम-३०’ हे औषध रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरते, असे स्पष्ट केल्यामुळे हे औषध चर्चेत आले. आयुष मंत्रालयाची सूचना नागरिकांसह आरोग्य व स्थानिक जिल्हा प्रशासनानेही सुरुवातीच्या काळात फारशी गांभीर्याने घेतली नाही, त्यामुळे केवळ होमिओ फार्मसी आणि डॉक्टरांपर्यंतच या औषधाचे वितरण होत होते. कोरोनाचा प्रसार जसजसा वाढला तसतशी औषधांची गरज भासू लागली. भीतीपोटी, काळजीपोटी सर्वच पॅथींच्या प्रतिबंधात्मक औषधांचा वापर होऊ लागला. त्या औषधांमध्ये ‘आर्सेनिक अल्बम-३०’ हे सर्वात प्रभावी ठरल्याचा दावा करण्यात आल्याने या औषधाची मागणी वाढली आहे.कार्यकर्ते, ग्रामसेवक, शिक्षकांनीही बनविले औषध

‘आर्सेनिक अल्बम-३०’ हे औषध तयार करण्यसाठी लागणारे ....लिक्वीड थेट वितरकाकडून खरेदी करून कोणीही हे औषध तयार केल्याचे समोर आले आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेत्यांचे समर्थक, ग्रामसेवक, शिक्षक व बेरोजगार तरुणांनीही हे औषध बनवून वितरित केले आहे. औषध देणारा व घेणारा कोणीही औषधीबाबत खातरजमा करण्याचा प्रयत्नही केलेले दिसत नाही.

९० टक्क्यांनी वाढली मागणीकोरोना संक्रमणाच्या काळात ‘आर्सेनिक अल्बम-३०’ या औषधाची विक्री तब्बल ९० टक्क्यांनी वाढली आहे. ज्या डॉक्टरांकडून ३० एमएल आर्सेनिकची मागणी केली जात होती, ते आता लीटरमध्ये औषध नेत आहेत.प्रमाण चुकले तर परिणाम चुकतोएका बॉटलमध्ये साधारणपणे ४८ गोळ्या असतात. या गोळ्यांवर किती एमएल औषध टाकायचे, याचे प्रमाण ठरले आहे. हे प्रमाण चुकले तर औषधाचा योग्य परिणाम होत नाही तसेच औषध बनविणाराच जर कोरोना संक्रमित असेल तर तयार झालेले औषध हे कोरोनाचे संक्रमण अधिक वाढविणारे ठरू शकते.

कोरोना संक्रमणाच्या काळात ‘आर्सेनिक अल्बम-३०’ हे औषध प्रतिबंधात्मक उपायांसाठी उपयुक्त ठरते, असे आयुष मंत्रालयानेच स्पष्ट केल्यामुळे लोकांचा कल होमिओपॅथीकडे वाढलाच आहे; मात्र तज्ज्ञ व्यक्तीकडूनच औषधे घेतली पाहिजेत. कोणीही औषध तयार केले आणि त्याचा योग्य परिणाम झाला नाही तर होमिओपॅथी बदनाम होईल. त्यामुळे अशा वितरणावर नियंत्रण आलेच पाहिजे.-डॉ. संदीप चव्हाण,महाराष्ट्र होमिओपॅथीकडॉक्टर्स संघर्ष समिती सदस्य.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या