शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आर्सेनिक औषधावर नियंत्रण कोणाचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 09:59 IST

हे औषध कोणी बनवावे, कोणी विकावे, यावर सध्या तरी कोणाचेच नियंत्रण नाही.

ठळक मुद्दे ‘आर्सेनिक अल्बम-३०’ हे औषध रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरते. प्रसाद वाटावा असे या औषधीचे वितरण होत आहे.

- राजेश शेगोकार  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोनामुळे दुर्लक्षित असलेल्या अनेक गोष्टींना एकदमच झळाळी प्राप्त होऊन त्यांची मागणी वाढली आहे. त्यामध्ये सॅनिटायझर, मास्क यांच्या जोडीला होमिओपॅथी औषधांचाही समावेश आहे. एरव्ही साबुदाण्याच्या गोळ्या म्हणून ज्या पॅथीला हिणवले जात असे त्याच होमिओपॅथीच्या ‘आर्सेनिक अल्बम-३०’ या औषधाला सध्या प्रचंड मागणी आहे; मात्र हे औषध कोणी बनवावे, कोणी विकावे, यावर सध्या तरी कोणाचेच नियंत्रण नाही. त्यामुळे प्रसाद वाटावा असे या औषधीचे वितरण होत आहे.केंद्रीय आयुष मंत्रालयाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये होमिओपॅथीचा समावेश करून ‘आर्सेनिक अल्बम-३०’ हे औषध रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरते, असे स्पष्ट केल्यामुळे हे औषध चर्चेत आले. आयुष मंत्रालयाची सूचना नागरिकांसह आरोग्य व स्थानिक जिल्हा प्रशासनानेही सुरुवातीच्या काळात फारशी गांभीर्याने घेतली नाही, त्यामुळे केवळ होमिओ फार्मसी आणि डॉक्टरांपर्यंतच या औषधाचे वितरण होत होते. कोरोनाचा प्रसार जसजसा वाढला तसतशी औषधांची गरज भासू लागली. भीतीपोटी, काळजीपोटी सर्वच पॅथींच्या प्रतिबंधात्मक औषधांचा वापर होऊ लागला. त्या औषधांमध्ये ‘आर्सेनिक अल्बम-३०’ हे सर्वात प्रभावी ठरल्याचा दावा करण्यात आल्याने या औषधाची मागणी वाढली आहे.कार्यकर्ते, ग्रामसेवक, शिक्षकांनीही बनविले औषध

‘आर्सेनिक अल्बम-३०’ हे औषध तयार करण्यसाठी लागणारे ....लिक्वीड थेट वितरकाकडून खरेदी करून कोणीही हे औषध तयार केल्याचे समोर आले आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेत्यांचे समर्थक, ग्रामसेवक, शिक्षक व बेरोजगार तरुणांनीही हे औषध बनवून वितरित केले आहे. औषध देणारा व घेणारा कोणीही औषधीबाबत खातरजमा करण्याचा प्रयत्नही केलेले दिसत नाही.

९० टक्क्यांनी वाढली मागणीकोरोना संक्रमणाच्या काळात ‘आर्सेनिक अल्बम-३०’ या औषधाची विक्री तब्बल ९० टक्क्यांनी वाढली आहे. ज्या डॉक्टरांकडून ३० एमएल आर्सेनिकची मागणी केली जात होती, ते आता लीटरमध्ये औषध नेत आहेत.प्रमाण चुकले तर परिणाम चुकतोएका बॉटलमध्ये साधारणपणे ४८ गोळ्या असतात. या गोळ्यांवर किती एमएल औषध टाकायचे, याचे प्रमाण ठरले आहे. हे प्रमाण चुकले तर औषधाचा योग्य परिणाम होत नाही तसेच औषध बनविणाराच जर कोरोना संक्रमित असेल तर तयार झालेले औषध हे कोरोनाचे संक्रमण अधिक वाढविणारे ठरू शकते.

कोरोना संक्रमणाच्या काळात ‘आर्सेनिक अल्बम-३०’ हे औषध प्रतिबंधात्मक उपायांसाठी उपयुक्त ठरते, असे आयुष मंत्रालयानेच स्पष्ट केल्यामुळे लोकांचा कल होमिओपॅथीकडे वाढलाच आहे; मात्र तज्ज्ञ व्यक्तीकडूनच औषधे घेतली पाहिजेत. कोणीही औषध तयार केले आणि त्याचा योग्य परिणाम झाला नाही तर होमिओपॅथी बदनाम होईल. त्यामुळे अशा वितरणावर नियंत्रण आलेच पाहिजे.-डॉ. संदीप चव्हाण,महाराष्ट्र होमिओपॅथीकडॉक्टर्स संघर्ष समिती सदस्य.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या