शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पांढरं सोनं भिजलं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 01:28 IST

अकोला : विदर्भात दोन दिवसांपासून पाऊस सुरू  असल्याने हाती आलेलं पांढरं (कापूस) सोनं भिजलं असून, यामुळे  वेचणीला आलेल्या कापसाचे सर्वाधिक नुकसान पश्‍चिम वर्‍हाडात झाले.

ठळक मुद्देपावसामुळे नुकसान, शेतकरी हवालदिल

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विदर्भात दोन दिवसांपासून पाऊस सुरू  असल्याने हाती आलेलं पांढरं (कापूस) सोनं भिजलं असून, यामुळे  वेचणीला आलेल्या कापसाचे सर्वाधिक नुकसान पश्‍चिम वर्‍हाडात झाले.पश्‍चिम विदर्भात गतवर्षीच्या तुलनेत कापसाचे क्षेत्र यावर्षी वाढले असून, ९२ टक्के क्षेत्रावर कपाशीची पेरणी करण्यात आली आहे. गतवर्षी ८ लाख ६१ हजार ३00 हेक्टर म्हणजे ७९ टक्केच पेरणी झाली होती. यावर्षी ९ लाख ९६ हजार १७ हेक्टर म्हणजेच ९२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यात सर्वाधिक यवतमाळ जिल्हय़ात ४ लाख ७0 हजार ३१५ हेक्टरवर म्हणजेच १0४ टक्के , अमरावती जिल्हय़ात २ लाख ७ हजार ४५७ हेक्टर, बुलडाणा १ लाख ७५ हजार 0५ हेक्टर, अकोला १ लाख १२ हजार ३१९ हेक्टर, तर वाशिम जिल्हय़ात ३0 हजार ९२१ हेक्टरवर   पेरणी झाली आहे. यावर्षी मान्सूनचा पाऊस उशिरा आल्याने पेरण्या उशिरा झाल्या आहेत. त्यानंतर पावसाचा खंड पडला पण, असे असतानाही कपाशीचे पीक जोरदार आले आहे. दसर्‍याला विदर्भात ‘सीतादही’ म्हणजेच कापसाच्या शेतात पूजा करू न वेचणी केली जाते. यावर्षी मान्सूनपूर्व कापूस वेचणीला आला आहे. खरीप हंगामातील ज्या शेतकर्‍यांनी जूनमध्ये पेरणी केली, तेथेही कापूस वेचणीला आला आहे. पण गत दोन दिवसांपासून पाऊस सुरू  असल्याने हाती आलेल्या या पांढर्‍या सोन्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. मूग, उडीद, सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे. यासर्व पिकांची कसर कापूस पीक भरू न काढेल, अशी अपेक्षा होती; पण आज आलेला पाऊस तोंडचा घास हिरावून घेत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

शेतकर्‍यांनी कापूस वेचून घ्यावा, ओट्यावर टाकून ताडपत्रीने झाकून घ्यावे, झाडं मोठी असतील तसेच पर्‍हाटीच्या फांद्या जमिनीवर लोळत असतील, तर त्यासाठीची उपाययोजना करू न झाडांना उंच बांधण्याची सोय करावी, शेतात पाणी साचले असल्यास चर काढून पाणी बाहेर काढावे. - डॉ. व्ही.एम.भाले,कूलगुरू,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.