शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

पांढऱ्या मातीचा बुरूज जीर्ण; दहा कुटुंबांचे जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:22 IST

नासीर शेख खेट्री : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेले पातूर तालुक्यातील वाहळा बु. येथे पांढऱ्या मातीचा बुरूज (गढी) गेल्या काही ...

नासीर शेख

खेट्री : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेले पातूर तालुक्यातील वाहळा बु. येथे पांढऱ्या मातीचा बुरूज (गढी) गेल्या काही महिन्यांपासून जीर्ण झाल्याने कोसळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बुरूज परिसरात राहणाऱ्या दहा ते पंधरा कुटुंबांचा जीव धोक्यात आहे. याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे.

अकोला-बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वाहळा बु. येथे पांढऱ्या मातीच्या चार बुरूज (गढी) होत्या. त्यापैकी गेल्या काही वर्षांपूर्वी तीन बुरूज (गढी) कोसळल्या होत्या. त्यामध्ये मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अनेक जनावरांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या एक बुरूज कायम आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून जीर्ण अवस्थेत आहे. बुरुजाच्या जवळ जवळपास १० ते १५ घरे आहे; परंतु १० घरे अगदी बुरूजच्या जवळ असल्याने बुरूज कोसळल्यास दहा कुटुंबांतील सदस्यांची जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. बुरूज काढण्याबाबत ग्रामस्थांनी संबंधिताकडे वारंवार तक्रारी केल्या; परंतु संबंधितांकडून तक्रारीकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. बुरूज कोसळून जीवितहानी झाल्यानंतर प्रशासनाला जाग येईल का, असा प्रश्न व संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थ उपस्थित करीत आहे. त्यामुळे संबंधित वरिष्ठांनी त्वरित दखल घेऊन मातीचा बुरूज (गढी) काढण्यात यावे अन्यथा मोठी घटना होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

----------------------------

बुरूज (गढी) जीर्ण झाल्याबाबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र देऊन वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन पुढील भूमिका घेऊन बुरूज काढण्याची कारवाई करण्यात येईल.

-एन. एस. इंगळे, सचिव, वाहळा बु.

--------------------

गेल्या काही दिवसांपूर्वी निराधार कुटुंबाला मदत पोहोचविण्यासाठी वाहळा बु. येथे गेलो असता, ग्रामस्थांनी बुरूज (गढी) ची पाहणी करण्याची विनंती केली; परंतु सदर प्रकार महसूल संबंधित नाही, तरीही संबंधित सचिवांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करून सदर विषय निदर्शनास आणून दिला आहे.

- सय्यद ऐहसानोद्दीन, नायब तहसीलदार, पातूर

--------------------

गावात चार बुरूज (गढी) होत्या. काही वर्षांपूर्वी तीन कोसळल्या होत्या. त्यामध्ये जनावरांचे प्राण गेले होते. त्यातून एक बुरूज (गढी) कायम आहे; परंतु जीर्ण झाल्याने कधीही कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधितांनी वेळीच दखल घेणे गरजेचे आहे.

-संतोष पाटील, ग्रामस्थ, वाहळा बु.