शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

पांढऱ्या मातीचा बुरूज जीर्ण; दहा कुटुंबांचे जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:22 IST

नासीर शेख खेट्री : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेले पातूर तालुक्यातील वाहळा बु. येथे पांढऱ्या मातीचा बुरूज (गढी) गेल्या काही ...

नासीर शेख

खेट्री : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेले पातूर तालुक्यातील वाहळा बु. येथे पांढऱ्या मातीचा बुरूज (गढी) गेल्या काही महिन्यांपासून जीर्ण झाल्याने कोसळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बुरूज परिसरात राहणाऱ्या दहा ते पंधरा कुटुंबांचा जीव धोक्यात आहे. याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे.

अकोला-बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वाहळा बु. येथे पांढऱ्या मातीच्या चार बुरूज (गढी) होत्या. त्यापैकी गेल्या काही वर्षांपूर्वी तीन बुरूज (गढी) कोसळल्या होत्या. त्यामध्ये मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अनेक जनावरांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या एक बुरूज कायम आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून जीर्ण अवस्थेत आहे. बुरुजाच्या जवळ जवळपास १० ते १५ घरे आहे; परंतु १० घरे अगदी बुरूजच्या जवळ असल्याने बुरूज कोसळल्यास दहा कुटुंबांतील सदस्यांची जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. बुरूज काढण्याबाबत ग्रामस्थांनी संबंधिताकडे वारंवार तक्रारी केल्या; परंतु संबंधितांकडून तक्रारीकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. बुरूज कोसळून जीवितहानी झाल्यानंतर प्रशासनाला जाग येईल का, असा प्रश्न व संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थ उपस्थित करीत आहे. त्यामुळे संबंधित वरिष्ठांनी त्वरित दखल घेऊन मातीचा बुरूज (गढी) काढण्यात यावे अन्यथा मोठी घटना होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

----------------------------

बुरूज (गढी) जीर्ण झाल्याबाबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र देऊन वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन पुढील भूमिका घेऊन बुरूज काढण्याची कारवाई करण्यात येईल.

-एन. एस. इंगळे, सचिव, वाहळा बु.

--------------------

गेल्या काही दिवसांपूर्वी निराधार कुटुंबाला मदत पोहोचविण्यासाठी वाहळा बु. येथे गेलो असता, ग्रामस्थांनी बुरूज (गढी) ची पाहणी करण्याची विनंती केली; परंतु सदर प्रकार महसूल संबंधित नाही, तरीही संबंधित सचिवांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करून सदर विषय निदर्शनास आणून दिला आहे.

- सय्यद ऐहसानोद्दीन, नायब तहसीलदार, पातूर

--------------------

गावात चार बुरूज (गढी) होत्या. काही वर्षांपूर्वी तीन कोसळल्या होत्या. त्यामध्ये जनावरांचे प्राण गेले होते. त्यातून एक बुरूज (गढी) कायम आहे; परंतु जीर्ण झाल्याने कधीही कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधितांनी वेळीच दखल घेणे गरजेचे आहे.

-संतोष पाटील, ग्रामस्थ, वाहळा बु.