शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

पांढऱ्या मातीचा बुरूज जीर्ण; दहा कुटुंबांचे जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:22 IST

नासीर शेख खेट्री : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेले पातूर तालुक्यातील वाहळा बु. येथे पांढऱ्या मातीचा बुरूज (गढी) गेल्या काही ...

नासीर शेख

खेट्री : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेले पातूर तालुक्यातील वाहळा बु. येथे पांढऱ्या मातीचा बुरूज (गढी) गेल्या काही महिन्यांपासून जीर्ण झाल्याने कोसळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बुरूज परिसरात राहणाऱ्या दहा ते पंधरा कुटुंबांचा जीव धोक्यात आहे. याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे.

अकोला-बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वाहळा बु. येथे पांढऱ्या मातीच्या चार बुरूज (गढी) होत्या. त्यापैकी गेल्या काही वर्षांपूर्वी तीन बुरूज (गढी) कोसळल्या होत्या. त्यामध्ये मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अनेक जनावरांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या एक बुरूज कायम आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून जीर्ण अवस्थेत आहे. बुरुजाच्या जवळ जवळपास १० ते १५ घरे आहे; परंतु १० घरे अगदी बुरूजच्या जवळ असल्याने बुरूज कोसळल्यास दहा कुटुंबांतील सदस्यांची जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. बुरूज काढण्याबाबत ग्रामस्थांनी संबंधिताकडे वारंवार तक्रारी केल्या; परंतु संबंधितांकडून तक्रारीकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. बुरूज कोसळून जीवितहानी झाल्यानंतर प्रशासनाला जाग येईल का, असा प्रश्न व संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थ उपस्थित करीत आहे. त्यामुळे संबंधित वरिष्ठांनी त्वरित दखल घेऊन मातीचा बुरूज (गढी) काढण्यात यावे अन्यथा मोठी घटना होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

----------------------------

बुरूज (गढी) जीर्ण झाल्याबाबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र देऊन वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन पुढील भूमिका घेऊन बुरूज काढण्याची कारवाई करण्यात येईल.

-एन. एस. इंगळे, सचिव, वाहळा बु.

--------------------

गेल्या काही दिवसांपूर्वी निराधार कुटुंबाला मदत पोहोचविण्यासाठी वाहळा बु. येथे गेलो असता, ग्रामस्थांनी बुरूज (गढी) ची पाहणी करण्याची विनंती केली; परंतु सदर प्रकार महसूल संबंधित नाही, तरीही संबंधित सचिवांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करून सदर विषय निदर्शनास आणून दिला आहे.

- सय्यद ऐहसानोद्दीन, नायब तहसीलदार, पातूर

--------------------

गावात चार बुरूज (गढी) होत्या. काही वर्षांपूर्वी तीन कोसळल्या होत्या. त्यामध्ये जनावरांचे प्राण गेले होते. त्यातून एक बुरूज (गढी) कायम आहे; परंतु जीर्ण झाल्याने कधीही कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधितांनी वेळीच दखल घेणे गरजेचे आहे.

-संतोष पाटील, ग्रामस्थ, वाहळा बु.