शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

..तर नुकसानभरपाई म्हणून पीकविमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम रक्कम

By रवी दामोदर | Updated: September 2, 2023 14:01 IST

पावसाचा खंड; ५२ महसूल मंडळांत सर्व्हे सुरू

अकोला : जिल्ह्यात पावसाचा खंड पडल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. तीन ते चार आठवडा पावसाचा खंड तसेच सरासरी उत्पादनाच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असल्यास पीकविमा नुकसानभरपाईपोटी २५ टक्के अग्रीम रक्कम मिळण्याची योजनेत तरतूद आहे. जिल्ह्यातही पावसाने दडी मारली असून, पावसाची ३८ टक्के तूट आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ५२ महसूल मंडळांमध्ये पिकांच्या सर्वेक्षणास कृषी व महसूल विभागाकडून सुरुवात करण्यात आली आहे. यासंदर्भात दि. ५ सप्टेंबरपर्यंत नुकसानाचा अहवाल शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे. त्यामुळे नुकसानभरपाईपोटी २५ टक्के अग्रीम रक्कम मिळण्याच्या आशा पीकविमाधारक शेतकऱ्यांना आहेत.

   जिल्ह्यात खरीप हंगामातील पिके बहरलेली असताना पावसाने दडी मारल्याने पिकांना मोठा फटका बसणार आहे. सोयाबीनचे पीक फुलधारणा अवस्थेत असून, नितांत गरज असताना पावसाचा खंड आहे. परिणामी, उत्पादनात प्रचंड घट निर्माण होण्याची शक्यता आहे. पीकविमा योजनेतील तरतुदीनुसार, ३ ते ४ आठवड्यांचा पावसाचा खंड तसेच चालू वर्षीच्या अपेक्षित उत्पादनात गत सात वर्षांतील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असल्यास येणाऱ्या पीकविमा नुकसानभरपाईच्या २५ टक्के मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम देण्याची कृषी आयुक्तांनी तरतूद केली आहे. सध्या जिल्ह्यातही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पावसाचा ताण बसलेल्या महसूल मंडळात सर्व्हेला सुरुवात करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे देणार अहवालजिल्ह्यात सुरुवातील २० महसूल मंडळांत सर्व्हेला सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यातच पावसाचा खंड असून, आखणी ३२ अशा ५२ महसूल मंडळांत पीक नुकसान सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. यासंदर्भात समितीद्वारा शासन निर्देशानुसार दि. ५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

पावसाने दडी मारल्यामुळे झालेल्या संभाव्य नुकसानाच्या सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. महसूल मंडळनिहाय सर्व्हे सुरू असून, दि. ५ सप्टेंबरपर्यंत सर्वेक्षण, पंचनामा करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिली आहे. यंत्रणेकडील नुकसानाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे.- शंकर किरवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला.