शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

सरकार कोणाचंही असो; गरिबांचं भलं करा; अकोला -मूर्तिजापूर बसमधील मतदार प्रवाशांचा कौल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 12:38 IST

अकोला : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत कोणाचेही सरकार सत्तेत येऊ द्या; पण सत्तेवर येणाऱ्या सरकारने गरिबांचं भलं केलं पाहिजे, असा कौल अकोला ते मूर्तिजापूर एसटी बसमधील मतदार प्रवाशांनी सोमवारी ‘लोकमत’शी गप्पा मारताना दिला.

अकोला : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत कोणाचेही सरकार सत्तेत येऊ द्या; पण सत्तेवर येणाऱ्या सरकारने गरिबांचं भलं केलं पाहिजे, असा कौल अकोला ते मूर्तिजापूर एसटी बसमधील मतदार प्रवाशांनी सोमवारी ‘लोकमत’शी गप्पा मारताना दिला.१ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला आगारातून एमच १४ बीटी-४८२६ क्रमांकाची अकोला ते मूर्तिजापूर बस निघाली. या बसमध्ये बसलेले ३९ प्रवाशांनी लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार असल्याचे सांगीतले. अकोला ते मूर्तिजापूर ४५ किलोमीटरच्या प्रवासादरम्यान बसमधील प्रवाशांच्या अपेक्षांचा सुरू कमी अधीक प्रमाणात सारखाच होता. सध्या महागाई , बेरोजगारी वाढली असून, शेतीपूरक व्यवसायाचा अभाव आहे. भ्रष्टाचार वाढला असून, पैशाशिवाय कोणतेही काम होत नाही. त्यामुळे निवडून दिलेले सरकार पारदर्शक असले पाहिजे. शेतकरी, शेतमजुरांसह सर्वसामान्यांचे हित साधणारे सरकार सत्तेत आले पाहिजे, असे मत अकोल्यातील बंडू भिरड यांनी व्यक्त केले. निवडणुकीत जनतेने निवडून दिलेल्या सरकारने गोरगरिबांच्या हिताचे काम केले पाहिजे, असे सुकळी येथील निशा काठोळे यांनी सांगितले. निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचे जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष होते. अपेक्षेच्या तुलनेत अकोल्याचा विकास होणे बाकी आहे. त्यामुळे विकासाला गती देणारे आणि सर्वसामान्यांची कामे करणारे सरकार सत्तेत असले पाहिजे, असे मत ईश्वर दुधांडे यांनी व्यक्त केले. तर सर्वसामान्यांची कामे करणारा आणि समस्यांची जाण असणारा लोकप्रतिनिधी निवडून देण्याची आवश्यकता संतोष लोखंडे यांनी व्यक्त केली. जिल्ह्यातील रस्ते, पिण्याचे पाणी, बेरोजगारी इत्यादी प्रमुख समस्या असून, समस्यांची जाण असणारा आणि त्यासंदर्भात उपाययोजनांसाठी धडपडणारा लोकप्रतिनिधी निवडून दिला पाहिजे, असे मूर्तिजापूरच्या सोनाली तेलंग यांनी सांगितले. देशात चांगले सरकार, काम करणारे असावे, त्यासाठी प्रत्येकाने मतदान करण्याची गरज असल्याचे मत मूर्तिजापूर येथील नितीन कुंडले यांनी व्यक्त केले.जिल्ह्यातील अशा आहेत समस्या !जिल्ह्यात पिण्याचे पाणी, सिंचनाचा अनुशेष, शेतीपूरक व्यवसाय, रोजगार निर्मितीसाठी औद्योगिकीकरणाचा अभाव इत्यादी प्रमुख समस्या असून, यासंदर्भात निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडून उपाययोजना होणे अपेक्षित असल्याचे मूर्तिजापूर येथील नितीन कुंडले यांनी सांगितले.

 

टॅग्स :Akolaअकोलाakola-pcअकोलाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक