शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

सरकार कोणाचंही असो; गरिबांचं भलं करा; अकोला -मूर्तिजापूर बसमधील मतदार प्रवाशांचा कौल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 12:38 IST

अकोला : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत कोणाचेही सरकार सत्तेत येऊ द्या; पण सत्तेवर येणाऱ्या सरकारने गरिबांचं भलं केलं पाहिजे, असा कौल अकोला ते मूर्तिजापूर एसटी बसमधील मतदार प्रवाशांनी सोमवारी ‘लोकमत’शी गप्पा मारताना दिला.

अकोला : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत कोणाचेही सरकार सत्तेत येऊ द्या; पण सत्तेवर येणाऱ्या सरकारने गरिबांचं भलं केलं पाहिजे, असा कौल अकोला ते मूर्तिजापूर एसटी बसमधील मतदार प्रवाशांनी सोमवारी ‘लोकमत’शी गप्पा मारताना दिला.१ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला आगारातून एमच १४ बीटी-४८२६ क्रमांकाची अकोला ते मूर्तिजापूर बस निघाली. या बसमध्ये बसलेले ३९ प्रवाशांनी लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार असल्याचे सांगीतले. अकोला ते मूर्तिजापूर ४५ किलोमीटरच्या प्रवासादरम्यान बसमधील प्रवाशांच्या अपेक्षांचा सुरू कमी अधीक प्रमाणात सारखाच होता. सध्या महागाई , बेरोजगारी वाढली असून, शेतीपूरक व्यवसायाचा अभाव आहे. भ्रष्टाचार वाढला असून, पैशाशिवाय कोणतेही काम होत नाही. त्यामुळे निवडून दिलेले सरकार पारदर्शक असले पाहिजे. शेतकरी, शेतमजुरांसह सर्वसामान्यांचे हित साधणारे सरकार सत्तेत आले पाहिजे, असे मत अकोल्यातील बंडू भिरड यांनी व्यक्त केले. निवडणुकीत जनतेने निवडून दिलेल्या सरकारने गोरगरिबांच्या हिताचे काम केले पाहिजे, असे सुकळी येथील निशा काठोळे यांनी सांगितले. निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचे जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष होते. अपेक्षेच्या तुलनेत अकोल्याचा विकास होणे बाकी आहे. त्यामुळे विकासाला गती देणारे आणि सर्वसामान्यांची कामे करणारे सरकार सत्तेत असले पाहिजे, असे मत ईश्वर दुधांडे यांनी व्यक्त केले. तर सर्वसामान्यांची कामे करणारा आणि समस्यांची जाण असणारा लोकप्रतिनिधी निवडून देण्याची आवश्यकता संतोष लोखंडे यांनी व्यक्त केली. जिल्ह्यातील रस्ते, पिण्याचे पाणी, बेरोजगारी इत्यादी प्रमुख समस्या असून, समस्यांची जाण असणारा आणि त्यासंदर्भात उपाययोजनांसाठी धडपडणारा लोकप्रतिनिधी निवडून दिला पाहिजे, असे मूर्तिजापूरच्या सोनाली तेलंग यांनी सांगितले. देशात चांगले सरकार, काम करणारे असावे, त्यासाठी प्रत्येकाने मतदान करण्याची गरज असल्याचे मत मूर्तिजापूर येथील नितीन कुंडले यांनी व्यक्त केले.जिल्ह्यातील अशा आहेत समस्या !जिल्ह्यात पिण्याचे पाणी, सिंचनाचा अनुशेष, शेतीपूरक व्यवसाय, रोजगार निर्मितीसाठी औद्योगिकीकरणाचा अभाव इत्यादी प्रमुख समस्या असून, यासंदर्भात निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडून उपाययोजना होणे अपेक्षित असल्याचे मूर्तिजापूर येथील नितीन कुंडले यांनी सांगितले.

 

टॅग्स :Akolaअकोलाakola-pcअकोलाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक