शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांवर पिवळे पट्टे कधी? मनपाची निविदा रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 13:45 IST

अकोला : शहरात मुख्य रस्त्यांवर पिवळे पट्टे नसतानासुद्धा रस्त्यांलगतची वाहने ताब्यात घेणाºया टोइंग पथकाच्या कारवाईला अकोलेकर वैतागले आहेत. टोइंग पथक दिसताच दुकानात साहित्य खरेदी करणाºया वाहनधारकांना ऐनवेळेवर धावपळ करावी लागते. ही बाब पाहता मुख्य रस्त्यांवर पिवळे पट्टे तसेच वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी ‘झेब्रा क्रॉसिंग’ पट्टे आखण्यासाठी महापालिका प्रशासनाने निविदा प्रक्रिया ...

अकोला : शहरात मुख्य रस्त्यांवर पिवळे पट्टे नसतानासुद्धा रस्त्यांलगतची वाहने ताब्यात घेणाºया टोइंग पथकाच्या कारवाईला अकोलेकर वैतागले आहेत. टोइंग पथक दिसताच दुकानात साहित्य खरेदी करणाºया वाहनधारकांना ऐनवेळेवर धावपळ करावी लागते. ही बाब पाहता मुख्य रस्त्यांवर पिवळे पट्टे तसेच वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी ‘झेब्रा क्रॉसिंग’ पट्टे आखण्यासाठी महापालिका प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबवली होती. वाहनधारकांना होणारा त्रास पाहता या निविदेचे घोडे अडले कोठे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.शहराच्या कानाकोपºयात महापालिकेच्या मालकीच्या जागा आहेत. मुख्य रस्त्यालगतच्या जागा वाहनधारकांच्या सुविधेसाठी पार्किंग म्हणून राखीव ठेवण्यात आल्या. सदर जागा वाहनतळासाठी आरक्षित असल्या, तरी संबंधित जागा भाडेतत्त्वावर घेणाºया कंत्राटदारांनी लघू व्यावसायिकांना अवैधपणे उपलब्ध करून दिल्या आहेत. परिणामी, शहरात बाजारपेठेत येणाºया नागरिकांना त्यांची दुचाकी किंवा चारचाकी वाहने रस्त्यालगत उभी करण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे चित्र आहे. मुख्य रस्त्यांवर पिवळे पट्टे नसल्यामुळे वाहने उभी करण्यासंदर्भात नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती असतानाच वाहतूक शाखेच्या टोइंग पथकामुळे समस्या निकाली न निघता त्यात अधिकच भर पडल्याचे दिसून येते. टोइंग पथकाच्या कारवाईविरोधात नागरिकांच्या तीव्र भावना आहेत. महापालिका तसेच वाहतूक शाखेने आधी पिवळे पट्टे आखावेत, त्यानंतर कारवाई करावी, असा नागरिकांचा सूर आहे. या सर्व बाबी लक्षात घेता मुख्य रस्त्यांवर पिवळे पट्टे तसेच ‘झेब्रा क्रॉसिंग’ पट्टे आखण्यासाठी मनपा प्रशासनाने निविदा प्रकाशित केली होती. चार कंपन्यांनी निविदा अर्ज सादर केले होते. कमी दराने सादर केलेली निविदा प्रशासनाने मंजूर केली असली, तरी अद्यापपर्यंतही कंत्राटदाराला कार्यादेश दिले नसल्याची माहिती आहे.पार्किंगच्या जागेवर नियंत्रण कोणाचे? दुचाकी, चारचाकी वाहनधारकांच्या सुविधेसाठी त्यांना वाहनतळ (पार्किंग) उपलब्ध करून, देण्याची जबाबदारी मनपा प्रशासनाची आहे. प्रशासनाने पार्किंगच्या नावाखाली भाडेतत्त्वावर दिलेल्या जागेवर लघू व्यावसायिकांनी कब्जा केल्याचे चित्र आहे. त्यामुळे मनपाच्या जागेवर नेमके नियंत्रण कोणाचे, असा प्रश्न उपस्थित होतो. महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी सदर जागेचे करारनामे रद्द करून नव्याने प्रक्रिया राबविण्याची नितांत गरज आहे. यासंदर्भात आयुक्त काय भूमिका घेतात, याकडे वैतागलेल्या वाहनधारकांचे लक्ष लागले आहे.