शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

वारी भैरवगड शिवारातील शेतकऱ्यांना संत्रा पीक विम्याचा लाभ केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:19 IST

सौंदळा : येथून जवळच असलेल्या वारी भैरवगड शिवारातील संत्रा उत्पादक शेतकरी दरवर्षी संत्रा पिकाचा पीक विमा काढतात. मात्र, नैसर्गिक ...

सौंदळा : येथून जवळच असलेल्या वारी भैरवगड शिवारातील संत्रा उत्पादक शेतकरी दरवर्षी संत्रा पिकाचा पीक विमा काढतात. मात्र, नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा पिकाचे नुकसान होते. पीक विमा काढूनही लाभ मिळालाच नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी वारी भैरवगड शिवारातील शेतकऱ्यांना संत्रा पिकाचा विम्याचा लाभ केव्हा मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे.

सौंदळा परिसरातील सौंदळा, वारखेड, बाद खेड, वारी, पिंपरखेड, कार्ला परिसरात दरवर्षीच कपाशीचा पेरा मोठ्या प्रमाणात होतो. मात्र, कपाशीला लगणारा खर्च, उत्पादनातील घट लक्षात घेता शेतकरी फळबाग पिकाकडे वळले आहेत. गेल्या पाच वर्षांपासून वारी, भैरवगड शिवारात शेतकऱ्यांनी संत्रा पिकाची दरवर्षीच मोठ्या प्रमाणत लागवड होत आहे. पाच वर्षांपूर्वी अनेक शेतकऱ्यांनी संत्रा पिकाची लागवड केली असल्याने शेतकरी दरवर्षीच पीक विमा काढतात. अद्यापही शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नसल्याने शेतकरी संकटात आहेत. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन शेतकऱ्यांना विम्याचा लाभ देण्याची मागणी, शेतकऱ्यांनी निवेदनातून केली आहे. शेतकऱ्यांनी कृषिमंत्री, जिल्हाधिकारी, कृषी आयुक्त अमरावती, तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन पाठविले आहे. निवेदनावर शंकरराव पुंडकर, वृषाली दिलीप पुदाखे, दिलीप पुदाखे, जगन्नाथ सित्रे, गुलाब महारणार, सुभाष रहाणे, श्रीकृष्ण हागे, ज्ञानदेव खाडे, गोपाल साबळे, किशोर साबळे, महादेव साबळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

--------

...अन्यथा रास्ता रोको आंदोलन

वारी, भैरवगड शिवारातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ अद्यापही मिळाला नसल्याने शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. पीक विमा न मिळाल्यास शेतकरी उपोषण किंवा रास्ता रोको आंदोलन करतील, असा इशारा शेतकऱ्यांनी निवेदनातून दिला आहे.

---------------------