शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

अमरावती एक्स्प्रेस कधी सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:13 IST

कोरोनामुळे रेल्वेच्या प्रवासी संख्येवर मोठा परिणाम झाला. प्रवासी नसल्याने मोठ्या प्रमाणात रेल्वेच्या फेऱ्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. आता ...

कोरोनामुळे रेल्वेच्या प्रवासी संख्येवर मोठा परिणाम झाला. प्रवासी नसल्याने मोठ्या प्रमाणात रेल्वेच्या फेऱ्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. आता हळूहळू निर्बंध शिथिल होत असल्याने प्रवासी संख्याही वाढली आहे. मोठ्या शहरातील उद्योग, व्यवसाय पूर्ववत होत आहेत. त्यामुळे गावाकडे परतलेले मजूर पुन्हा शहराकडे जात आहेत. मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षणही फुल्ल होत आहे ; परंतु अद्यापही काही महत्त्वाच्या रेल्वे सुरू झाल्या नाही. यामध्ये पॅसेंजर गाड्यांचा ही समावेश आहे. वऱ्हाडासाठी महत्त्वाची असलेली अमरावती-सूरत एक्स्प्रेस ही बंद आहे. या रेल्वे सुरू होण्याची प्रतीक्षा प्रवाशांना लागली आहे.

सध्या सुरू असलेल्या रेल्वे

गितांजली एक्स्प्रेस

नवजीवन एक्स्प्रेस

आझाद हिंद एक्स्प्रेस

पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेस

हावडा-सुरत एक्स्प्रेस

या गाड्या कधी सुरू होणार?

अमरावती-सुरत एक्स्प्रेस

भुसावळ-वर्धा पॅसेंजर

भुसावळ-नागपूर पॅसेंजर

भुसावळ-नरखेड पॅसेंजर

शालिमार एक्स्प्रेस

पॅसेंजर गाड्यांचे घोडे अडले कुठे?

गर्दीने गच्च भरणाऱ्या पॅसेंजर गाड्या मागील दीड वर्षांपासून कोरोनामुळे बंद करण्यात आल्या आहे. गर्दीच्या पार्श्वभूमीवर या रेल्वे अद्यापही बंद आहे.

जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या तीनही पॅसेंजर सुरू झालेल्या नाही. यामध्ये भुसावळ-नागपूर, भुसावळ-नरखेड, भुसावळ-वर्धा या पॅसेंजर गाड्यांचा समावेश आहे.

निर्बंध शिथिल झाल्यानंतरही यामधील एकही पॅसेंजर सुरू झाली नाही. त्यामुळे या पॅसेंजर गाड्यांचे घोडे अडले कुठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रवासी काय म्हणतात...

मूर्तिजापूर येथे ड्युटी असल्याने दररोज पॅसेंजर रेल्वेने ये-जा करत होतो ; परंतु कोरोनामुळे पॅसेंजर बंद आहेत. त्यामुळे एसटी बस किंवा स्वत:च्या खासगी गाडीने जावे लागत आहे.

- प्रवीण देशमुख

गावी जाण्यासाठी रेल्वेचा मोठा आधार होता ; परंतु जवळपास जाण्यासाठी पॅसेंजर बंद आहे. कोरोनामुळे त्या कधी सुरू होतील याची श्वाश्वती नाही. परिणामी, बसने प्रवास करावा लागतो.

- किशोर पाटील