शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्त शेतक-यांना मदतीचे ‘कवच’ केव्हा?

By admin | Updated: May 28, 2016 02:00 IST

जिल्ह्यात ९४२ गावांतील शेतकर्‍यांना सरकारी मदतीची प्रतीक्षा.

संतोष येलकर / अकोलाजिल्ह्यातील लागवडयोग्य सर्व गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली असली तरी दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी शासनामार्फत अद्यापही मदत जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे दुष्काळाने होरपळलेल्या जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी सरकारच्या दुष्काळी मदतीचे कवच केव्हा मिळणार, याबाबत जिल्ह्यातील ९४२ गावांमधील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. खरीप हंगामातील नजरअंदाज पैसेवारीच्या आधारे जिल्ह्यातील लागवडयोग्य ९९७ गावांपैकी ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेली ५५ गावे शासनामार्फत गत ऑक्टोबरमध्ये दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली. या गावांमधील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी मदतदेखील प्राप्त झाली आहे. त्यानंतर शासनाच्या गत २३ मार्च रोजीच्या निर्णयानुसार, सुधारित व अंतिम पैसेवारीच्या आधारे ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेली जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील लागवडयोग्य सर्व ९९७ गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली. दुष्काळ जाहीर होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र दुष्काळग्रस्त गावांमधील शेतकर्‍यांसाठी शासनामार्फत अद्यापही मदत जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्त ९४२ गावांमधील शेतकरी अद्याप सरकारच्या दुष्काळी मदतीपासून वंचित आहेत. सतत तीन वर्षांपासूनची नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीने शेतकरी हवालदिल झाला आहे. दुष्काळाने होरपळणार्‍या शेतकर्‍यांकडे पैसा नाही. त्यामुळे येत्या खरीप हंगामात शेतीची मशागत आणि पेरणीचा खर्च कसा भागविणार, याबाबतची चिंता शेतकर्‍यांना सतावत आहे. त्याअनुषंगाने सरकारची दुष्काळी मदत केव्हा मिळणार, याबाबतची प्रतीक्षा जिल्ह्यातील ९४२ गावांमधील शेतकर्‍यांकडून केली जात आहे.