शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

दुष्काळग्रस्त शेतक-यांना मदतीचे ‘कवच’ केव्हा?

By admin | Updated: May 28, 2016 02:00 IST

जिल्ह्यात ९४२ गावांतील शेतकर्‍यांना सरकारी मदतीची प्रतीक्षा.

संतोष येलकर / अकोलाजिल्ह्यातील लागवडयोग्य सर्व गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली असली तरी दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी शासनामार्फत अद्यापही मदत जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे दुष्काळाने होरपळलेल्या जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी सरकारच्या दुष्काळी मदतीचे कवच केव्हा मिळणार, याबाबत जिल्ह्यातील ९४२ गावांमधील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. खरीप हंगामातील नजरअंदाज पैसेवारीच्या आधारे जिल्ह्यातील लागवडयोग्य ९९७ गावांपैकी ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेली ५५ गावे शासनामार्फत गत ऑक्टोबरमध्ये दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली. या गावांमधील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी मदतदेखील प्राप्त झाली आहे. त्यानंतर शासनाच्या गत २३ मार्च रोजीच्या निर्णयानुसार, सुधारित व अंतिम पैसेवारीच्या आधारे ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेली जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील लागवडयोग्य सर्व ९९७ गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली. दुष्काळ जाहीर होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र दुष्काळग्रस्त गावांमधील शेतकर्‍यांसाठी शासनामार्फत अद्यापही मदत जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्त ९४२ गावांमधील शेतकरी अद्याप सरकारच्या दुष्काळी मदतीपासून वंचित आहेत. सतत तीन वर्षांपासूनची नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीने शेतकरी हवालदिल झाला आहे. दुष्काळाने होरपळणार्‍या शेतकर्‍यांकडे पैसा नाही. त्यामुळे येत्या खरीप हंगामात शेतीची मशागत आणि पेरणीचा खर्च कसा भागविणार, याबाबतची चिंता शेतकर्‍यांना सतावत आहे. त्याअनुषंगाने सरकारची दुष्काळी मदत केव्हा मिळणार, याबाबतची प्रतीक्षा जिल्ह्यातील ९४२ गावांमधील शेतकर्‍यांकडून केली जात आहे.