शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
2
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
3
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
4
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
5
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल चामखीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
8
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
9
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
10
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
11
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
12
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
13
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
14
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
15
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
16
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
17
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
18
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
19
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
20
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...

हिंदू राष्ट्रामध्ये ओबीसींचे स्थान काय असेल?

By admin | Updated: October 13, 2016 03:14 IST

अँड. आंबेडकर यांचा सवाल; धम्म मेळाव्यात शासन, ‘आरएसएस’चा घेतला समाचार.

सदानंद सिरसाट अकोला, दि. १२- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून हिंदू राष्ट्र निर्मितीचा घाट घातला जात आहे. त्यामध्ये ओबीसी समाजाचे स्थान कुठे असेल. पूर्वीची विषमतावादी समाजरचना उभारण्याऐवजी पूर्वापार चालत आलेली विषमता संपवण्याचा मान आता संघाने घ्यायला हवा, देशात समानता नसेल, तर हिंदुराष्ट्राचे करायचे काय, असा सवाल अँड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. धम्मचक्र प्रवर्तन महोत्सवानिमित्त क्रिकेट क्लब मैदानावर आयोजित धम्म मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र दारोकार गुरुजी, तर अतिथी म्हणून चैत्यभूमीचे व्यवस्थापक भन्ते बी. संघपाल यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी मंचावर उपस्थित होते. केंद्र शासनाने व्यावसायिक शिक्षणाची भूमिका मांडली. त्याचवेळी राज्य शासन पूर्वापार चालत आलेले जातींचे व्यवसाय बळकट करण्याची भाषा कौशल्य विकासाच्या नावाखाली बोलत आहे. त्यातून जातीव्यवस्था पुन्हा बळकट करण्याचे धोरण आखले जात आहे, असेही अँड. आंबेडकर म्हणाले. शिक्षणामध्ये जुन्या गुरुकुल पद्धतीची वाच्यता केली जात आहे. ते महागडे शिक्षण सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे होईल. हा प्रकार बाबासाहेबांनी दिलेल्या 'शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे', या मंत्रावर हल्ला करण्यासारखा आहे. शिक्षणक्षेत्रात घातलेल्या गोंधळाचे परिणाम आता हळूहळू समोर येत आहेत. वाढत्या लोकसंख्येत बेकारीची समस्या आहे. त्या तरुणांचा वेगळाच वापर करण्याचे तंत्र मांडले जात असल्याचे अँड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले. शेतकर्‍यांना लुटणारे ओबीसी किंवा दलित नाहीत, ते व्यापारी आणि राज्यकर्तेच आहेत. त्यांना हाकलण्यासाठी सर्वांनीच पुढे आले पाहिजे. शेतकर्‍यांचे खरे भांडण हे अर्थव्यवस्थेशी आहे. त्या व्यवस्थेशी लढायचे असेल, तर यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची कास धरण्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले. देशाची सत्ता गरिबाच्या हातात आल्याशिवाय बदल होणारच नाही, त्या बदलासाठी आपण तयार आहोत का, असेही त्यांनी विचारले.मंचावर पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार बळीराम सिरस्कार, कार्याध्यक्ष काशीराम साबळे, प्रा. अंजली आंबेडकर, माजी आमदार हरिदास भदे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, उपाध्यक्ष जमिरउल्लाखॉ पठाण, सभापती रेखा अंभोरे, देवकाबाई पातोंड, पक्षाचे पदाधिकारी डॉ.डी.एम. भांडे, डी.एन. खंडारे, प्रतिभा अवचार, डॉ.हर्षवर्धन मालोकार, डॉ.रहमान खान, प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हा परिषद गटनेता दामोदर जगताप, मनपा गटनेता गजानन गवई, कोषाध्यक्ष राजूमिया देशमुख, सुभाष रौंदळे, राजू खोने, पक्षाचे प्रसिद्धीप्रमुख प्रा.डॉ. प्रसन्नजित गवई उपस्थित होते. संचालन राजाभाऊ लबडे यांनी तर आभार भीमराव तायडे यांनी केले. सत्ता जातीमध्ये नव्हे, तर कुटुंबामध्ये!सत्ता जातींमध्ये नव्हे, तर जातींच्या काही कुटुंबामध्ये अडकली आहे. सर्व राजकीय पदे केवळ १६९ कुटुंबात विभागली आहेत.सैन्य कारवाईचेही मार्के टिंग..प्रधानमंत्री मोदी यांनी सैनिकांशिवाय ५६ इंच छाती ताणून काश्मिरात जाऊन दाखवावे, सैन्याने केलेल्या कारवाईचे नको तसे मार्केटिंग करण्याची हौस करू नये, असा टोलाही अँड. आंबेडकर यांनी लगावला. कधी नव्हे ते या सरकारने सैन्याच्या कारवाईचे राजकारण, भांडवलीकरणासोबतच बाजारीकरण केल्याचा आरोपही त्यांनी केला. उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्य़ासमोर ठेवून हा प्रकार केला जात असल्याचेही ते म्हणाले. बहुजन नेत्यांवर भाजप, संघाकडून 'ऑपरेशन'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपने अनेक मराठा नेत्यांना सध्या शस्त्रक्रिया गृहात ठेवले आहे. आमच्या पद्धतीने वागत नसाल, तर शस्त्रक्रिया करू, असा दमच दिला जात आहे. त्यामुळे लगतच्या काळात अनेकांवर झालेली शस्त्रक्रिया आपणावर नको म्हणून मराठा नेते त्यांना बळी पडत आहेत, असेही अँड. आंबेडकर यांनी सांगितले.महिलांवर घरात होणार्‍या अत्याचारावरही बोलामहिलांवर बाह्य जगात होणार्‍या अत्याचारासंदर्भात बोलले जाते. त्यावर मोर्चेही निघतात. मात्र, त्याचवेळी घरात होणार्‍या अत्याचाराविरोधात आवाज उठवण्याचीही चळवळ व्हायला हवी.