शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
3
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
4
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

हिंदू राष्ट्रामध्ये ओबीसींचे स्थान काय असेल?

By admin | Updated: October 13, 2016 03:14 IST

अँड. आंबेडकर यांचा सवाल; धम्म मेळाव्यात शासन, ‘आरएसएस’चा घेतला समाचार.

सदानंद सिरसाट अकोला, दि. १२- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून हिंदू राष्ट्र निर्मितीचा घाट घातला जात आहे. त्यामध्ये ओबीसी समाजाचे स्थान कुठे असेल. पूर्वीची विषमतावादी समाजरचना उभारण्याऐवजी पूर्वापार चालत आलेली विषमता संपवण्याचा मान आता संघाने घ्यायला हवा, देशात समानता नसेल, तर हिंदुराष्ट्राचे करायचे काय, असा सवाल अँड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. धम्मचक्र प्रवर्तन महोत्सवानिमित्त क्रिकेट क्लब मैदानावर आयोजित धम्म मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र दारोकार गुरुजी, तर अतिथी म्हणून चैत्यभूमीचे व्यवस्थापक भन्ते बी. संघपाल यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी मंचावर उपस्थित होते. केंद्र शासनाने व्यावसायिक शिक्षणाची भूमिका मांडली. त्याचवेळी राज्य शासन पूर्वापार चालत आलेले जातींचे व्यवसाय बळकट करण्याची भाषा कौशल्य विकासाच्या नावाखाली बोलत आहे. त्यातून जातीव्यवस्था पुन्हा बळकट करण्याचे धोरण आखले जात आहे, असेही अँड. आंबेडकर म्हणाले. शिक्षणामध्ये जुन्या गुरुकुल पद्धतीची वाच्यता केली जात आहे. ते महागडे शिक्षण सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे होईल. हा प्रकार बाबासाहेबांनी दिलेल्या 'शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे', या मंत्रावर हल्ला करण्यासारखा आहे. शिक्षणक्षेत्रात घातलेल्या गोंधळाचे परिणाम आता हळूहळू समोर येत आहेत. वाढत्या लोकसंख्येत बेकारीची समस्या आहे. त्या तरुणांचा वेगळाच वापर करण्याचे तंत्र मांडले जात असल्याचे अँड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले. शेतकर्‍यांना लुटणारे ओबीसी किंवा दलित नाहीत, ते व्यापारी आणि राज्यकर्तेच आहेत. त्यांना हाकलण्यासाठी सर्वांनीच पुढे आले पाहिजे. शेतकर्‍यांचे खरे भांडण हे अर्थव्यवस्थेशी आहे. त्या व्यवस्थेशी लढायचे असेल, तर यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची कास धरण्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले. देशाची सत्ता गरिबाच्या हातात आल्याशिवाय बदल होणारच नाही, त्या बदलासाठी आपण तयार आहोत का, असेही त्यांनी विचारले.मंचावर पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार बळीराम सिरस्कार, कार्याध्यक्ष काशीराम साबळे, प्रा. अंजली आंबेडकर, माजी आमदार हरिदास भदे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, उपाध्यक्ष जमिरउल्लाखॉ पठाण, सभापती रेखा अंभोरे, देवकाबाई पातोंड, पक्षाचे पदाधिकारी डॉ.डी.एम. भांडे, डी.एन. खंडारे, प्रतिभा अवचार, डॉ.हर्षवर्धन मालोकार, डॉ.रहमान खान, प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हा परिषद गटनेता दामोदर जगताप, मनपा गटनेता गजानन गवई, कोषाध्यक्ष राजूमिया देशमुख, सुभाष रौंदळे, राजू खोने, पक्षाचे प्रसिद्धीप्रमुख प्रा.डॉ. प्रसन्नजित गवई उपस्थित होते. संचालन राजाभाऊ लबडे यांनी तर आभार भीमराव तायडे यांनी केले. सत्ता जातीमध्ये नव्हे, तर कुटुंबामध्ये!सत्ता जातींमध्ये नव्हे, तर जातींच्या काही कुटुंबामध्ये अडकली आहे. सर्व राजकीय पदे केवळ १६९ कुटुंबात विभागली आहेत.सैन्य कारवाईचेही मार्के टिंग..प्रधानमंत्री मोदी यांनी सैनिकांशिवाय ५६ इंच छाती ताणून काश्मिरात जाऊन दाखवावे, सैन्याने केलेल्या कारवाईचे नको तसे मार्केटिंग करण्याची हौस करू नये, असा टोलाही अँड. आंबेडकर यांनी लगावला. कधी नव्हे ते या सरकारने सैन्याच्या कारवाईचे राजकारण, भांडवलीकरणासोबतच बाजारीकरण केल्याचा आरोपही त्यांनी केला. उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्य़ासमोर ठेवून हा प्रकार केला जात असल्याचेही ते म्हणाले. बहुजन नेत्यांवर भाजप, संघाकडून 'ऑपरेशन'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपने अनेक मराठा नेत्यांना सध्या शस्त्रक्रिया गृहात ठेवले आहे. आमच्या पद्धतीने वागत नसाल, तर शस्त्रक्रिया करू, असा दमच दिला जात आहे. त्यामुळे लगतच्या काळात अनेकांवर झालेली शस्त्रक्रिया आपणावर नको म्हणून मराठा नेते त्यांना बळी पडत आहेत, असेही अँड. आंबेडकर यांनी सांगितले.महिलांवर घरात होणार्‍या अत्याचारावरही बोलामहिलांवर बाह्य जगात होणार्‍या अत्याचारासंदर्भात बोलले जाते. त्यावर मोर्चेही निघतात. मात्र, त्याचवेळी घरात होणार्‍या अत्याचाराविरोधात आवाज उठवण्याचीही चळवळ व्हायला हवी.