शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

पहिल्या पिकाचे नाचगाण्याने स्वागत

By admin | Updated: April 12, 2016 01:29 IST

खामगाव तालुक्यातील पिंप्री धनगर येथे तीन दशकानंतर झाली बागायती शेती.

खामगाव (जि. बुलडाणा): खामगाव तालुक्यातील पिंप्री धनगर येथे तब्बल ३२ वर्षांनंतर यावर्षी पहिल्यादांच सिंचन करून बागायती शेती करण्यात आली. या पहिल्या पिकाचे येथील शेतकर्‍यांनी बंजारा शैलीत नाचगाण्याने स्वागत केले.मन प्रकल्पामुळे पिंप्री धनगर येथील अनेक शेतकर्‍यांची बागायती शेती गेली होती. १९८७-८८ साली या गावाचे पुनर्वसन माळरानावर करण्यात आले. प्रकल्पामध्ये शेती गेल्याने अनेकांवर बेरोजगारांची कुर्‍हाड कोसळली होती. प्रकल्पासाठी शेती गेली, पण शेतीसाठी प्रकल्पाचे पाणीही मिळत नसल्याने शेतकर्‍यांनी तब्बल तीन दशकं लढा दिला. यावर्षी पहिल्यादांच जलाशयाचे पाणी मिळाल्याने शेतकर्‍यांनी कांदा, भुईमुग आणि इतर पिके घेतली. त्यापैकी काही पिकं हाती आल्यानंतर या शेतकर्‍यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. बंजाराबहुल लोकवस्ती असलेल्या या गावात पहिल्या पिकाचे शेतकर्‍यांनी वाजत-गाजत उत्साहात स्वागत केले. पाण्यासाठी दिलेल्या लढय़ामध्ये मदत करणार्‍या प्रत्येक व्यक्तीचा यावेळी गावकर्‍यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी उपकार्यकारी अभियंता आर.एस.जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देवेंद्र देशमुख, सुनील जाधव, प्रतापराव राठोड, तेजराव नहार, संतोष राठोड, सरपंच आशाताई जाधव यांचाही सत्कार यावेळी गावकर्‍यांच्यावतीने करण्यात आला.