शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

बचत गटातून साधला उन्नतीचा मार्ग!

By admin | Updated: April 24, 2017 01:59 IST

स्वयंरोजगाराची धरली कास: गोपालखेडच्या युवकांनी केली बेरोजगारावर मात

अतुल जयस्वाल - अकोलागावात राहून काय करायचे, ना रोजगाराची साधने, ना शिक्षणाच्या संधी, अशी नकारात्मक भावना असलेले अनेक युवक गाव सोडून रोजगारासाठी शहराचा रस्ता धरतात. अकोला जिल्ह्यातील गोपालखेड या छोट्याशा गावातील काही युवकांनी मात्र बचत गटाच्या माध्यमातून एकत्र येऊन स्वयंरोजगाराची कास धरत बेरोजगारीवर मात केली आहे.अकोल्यापासून २० कि.मी. अंतरावर गोपालखेड हे छोटेसे गाव आहे. खारपाणपट्ट्यात असलेल्या या गावाची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे. शेतीव्यतिरिक्त रोजगाराचे इतर कोणतेही साधन नसल्यामुळे गावातील अनेक तरुण रोजगारासाठी अकोला व इतर मोठ्या शहरांमध्ये कार्यरत आहेत. शेतीला जोडधंदा म्हणून गावातील काही सुशिक्षित तरुणांनी २००९ मध्ये एकत्र येऊन संघर्ष स्वयं सहायता बचत गटाची स्थापना केली. काही वर्षे बचत गट सुरळीत चालू राहिल्यानंतर या युवकांनी बचत गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराची कास धरण्याचा निर्धार केला. त्यांच्या निर्धाराला साथ लाभली कृषी समृद्धी प्रकल्पाची. या प्रकल्पाद्वारे ३० टक्के अनुदान घेऊन बचत गटातील अजय मोडक, गोपाल मोडक, विजय देशमुख, अमोल पिसे व सुरेश कौलकार यांनी आपल्या हिश्शाची रक्कम भरून मागच्या वर्षी दोन लाख रुपयांत मिनी दाल मिल सुरू केला. या भागात तुरीचे उत्पादन चांगले होत असल्यामुळे त्यांच्या दाल मिलला चांगला प्रतिसाद मिळू लागला. आसपासच्या गावांमधील शेतकऱ्यांनीही बचत गटाच्या दाल मिलमधून तूर डाळ तयार करून घेण्यास सुरुवात केली. पहिल्या वर्षी बचत गटाच्या मिलमध्ये ५० क्विंटल तूर डाळीवर प्रक्रिया करण्यात आली. यावर्षी आतापर्यंत जवळपास १०० क्विंटल तूर डाळीवर प्रक्रिया करण्यात आली असून, अजूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या उद्योगातून बचत गट भरभराटीस आला असून, या तरुणांनी बेरोजगारीवर मात करीत रोजगार मिळविला आहे. गुळपट्टी, शेवयांचीही विक्रीबचत गटातील सदस्यांनी गुळपट्टी आणि सेवया तयार करण्याचा गृहोद्योगही सुरू केला आहे. बचत गटातील प्रवीण मोडक, प्रफुल्ल मोडक, अजय मोडक, विजय देशमुख हे चार सदस्य २०१३ पासून सेवया तयार करीत आहेत. या सेवयांना चांगली मागणी असून, गतवर्षी त्यांनी ४० हजार रुपयांच्या मालाची विक्री केली, तसेच बचत गटातील सदस्य कृषी प्रदर्शन व इतर प्रदर्शनांमध्ये गुळपट्टीची विक्री करून बचत गटाला आर्थिक हातभार लावतात.