शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

अकोल्याचे टरबूज-खरबूजही जाणार आखाती देशात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 18:07 IST

अकोला: जिल्ह्यातील केळी, डाळिंब, भेंडी, मिरचीपाठोपाठ तेल्हारा आणि पातूर तालुक्यातील टरबूज व खरबूजही आखाती देशात जाणार आहे. टरबूज आणि खरबूज निर्यातीचा निर्यातदार कंपनीसोबत लवकरच करारनामा करण्यात येणार आहे.

- संतोष येलकर

अकोला: जिल्ह्यातील केळी, डाळिंब, भेंडी, मिरचीपाठोपाठ तेल्हारा आणि पातूर तालुक्यातील टरबूज व खरबूजही आखाती देशात जाणार आहे. टरबूज आणि खरबूज निर्यातीचा निर्यातदार कंपनीसोबत लवकरच करारनामा करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा तसेच शेतकºयांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारात जिल्ह्यातील भाजीपाला आणि फळपिकांच्या निर्यातीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने गतवर्षीपासून जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील केळी आखाती देशात निर्यात करण्यात येत आहे. त्यानंतर जिल्ह्यातील डाळिंब, भेंडी आणि मिरचीची निर्यात सुरू करण्यात आली. त्या पाठोपाठ आता जिल्ह्यातील तेल्हारा व पातूर या दोेन तालुक्यातील टरबूज आणि खरबुजाची निर्यात दुबई, अबुधाबी, बहरीन, मस्कत इत्यादी आखाती देशांत करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन, ‘अपेडा’च्या पुढाकारात मोर्णा व्हॅली कंपनीचा बॉम्बे एक्सपोर्ट कंपनीसोबत लवकरच करारनामा करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने आता अकोला जिल्ह्यातील टरबूज व खरबूजही आखाती देशांत जाणार आहे.पातूर-तेल्हारा तालुक्यात १५० हेक्टरवर टरबूज-खरबुजाची लागवड!टरबूज-खरबुजाची आखाती देशात निर्यात करण्यासाठी जिल्ह्यातील पातूर व तेल्हारा या दोन तालुक्यात १५० हेक्टर क्षेत्रावर टरबूज व खरबूज लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये पातूर तालुक्यातील चान्नी, पिंपळखुटा व उमरा आणि तेल्हारा तालुक्यात चितलवाडी, हिवरखेड, दहिगाव अवताडे इत्यादी गावांत १५ नोव्हेंबरपर्यंत टरबूज व खरबुजाची लागवड करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील शेतकºयांच्या शेतमालाला योग्य भाव उपलब्ध व्हावा आणि उत्पन्न वाढावे, यासाठी जिल्ह्यातील फळे-भाजीपाला निर्यातीचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील टरबूज व खरबूज निर्यातीचे नियोजन करण्यात आले आहे. निर्यातीद्वारे शेतमालाला चांगला भाव मिळणार असल्याने, त्याचा शेतकºयांना फायदा होणार आहे.-आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हाधिकारीजिल्ह्यातील केळी, डाळिंब, भेंडी व मिरचीची निर्यात आखाती देशात सुरू आहे. आता पातूर व तेल्हारा तालुक्यातील टरबूज व खरबुजाची निर्यातही आखाती देशात करण्यात येणार असून, त्यासाठी संबंधित निर्यातदार कंपनीसोबत करारनामा करण्यात येणार आहे.- अशोक अमानकर,  उपजिल्हाधिकारी (रोहयो)

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेय