शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

भूगर्भातील पाण्याचे यंदा काटेकोर नियोजन करावे लागणार!

By admin | Updated: July 13, 2015 01:19 IST

पावसाने मारली दडी, भविष्यातील अंदाज भिन्न

राजरत्न सिरसाट/अकोला : गेल्यावर्षी कमी झालेला पाऊस आणि यावर्षी भारतीय हवामानशास्त्र विभागाने केलेले पावसाचे भाकीत बघता, हे वर्षदेखील कमी पावसाचे असल्याचे एकूण चित्र समोर येत आहे. त्यामुळे यावर्षी भूगर्भातील पाण्याचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. या पावसाच्या अनिश्‍चिततेमुळे शेतकर्‍यांनासुद्धा आता पीकपद्धतीत बदल करावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्यावर्षी पडलेल्या पावसाची आकडेवारी आणि यावर्षीचे भाकीत बघता, पाण्याचे नियोजन करणे किती अपरिहार्य आहे, हे लक्षात येते. अकोला जिलतील गेल्या दोन-तीन वर्षांंतील पावसाची सरासरी आकडेवारी बघितल्यास अत्यंत कमी आहे. २0१२-१३ मध्ये जिल्ह्यात केवळ ६७४ मि.मी. पाऊस पडला. २0१३-१४ मध्ये ८९४ मि.मी. पाऊस झाला आणि २0१४-१५ मध्ये पावसाळ्य़ात केवळ ५७२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. डिसेंबरपर्यंंत या पावसाची ६८0.७0 मि.मी. नोंद झाली आहे. या पाच वर्षांंत पावसाचे सरासरी चित्र बदलले आहे. कधी कमी, तर कधी जास्त, असे या पावसाचे स्वरू प आहे. २0१४-१५ या वर्षात १४0 मि.मी. पाऊस २३ जुलै व ९0 मि.मी. पाऊस ८ सप्टेंबर या एकाच दिवशी कोसळला. म्हणजेच पावसाळ्य़ातील अर्धा पाऊस हा एकाच दिवशी काही तासांत कोसळत असल्याचे या आकडेवारीवरू न निदर्शनास येत आहे. २0१५-१६ यावर्षी जूनमध्ये पश्‍चिम विदर्भात १२0 टक्के पाऊस झाला, पण लगेच पावसाने दडी मारली. भविष्यात हवामानाचे वेगवेगळे अंदाज वर्तविण्यात येत आहेत. मागील वर्षी पावसाचे पाणी भूगर्भाला मिळाले नसल्याचा धक्कादायक निष्कर्ष डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मृद व जलसंधारण विभागाने काढले आहेत. त्यामुळे २0१३-१४ मध्ये पडलेल्या पावसाचे जे पाणी भूगर्भाला मिळाले, त्या पाण्याचा व भूगर्भात अगोदरच असलेल्या नैसर्गिक पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. पावासाचे स्वरू प बदलले असून, २0१३-१४ मध्ये पाऊस चांगला झाला, पण अर्धा पाऊस हा १६ ते १८ तासांत पडला होता. १४-१५ मध्ये कमी पाऊस झाला, त्याचा अभ्यास केला असून, खारपाणपट्टय़ातील भूगर्भपातळीत गतवर्षी अडीच मीटरने घट झाल्याचे निदर्शनात आले आहे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याचेही आता काटेकोर नियोजन करावे लागणार असल्याचे कृषी विद्यापीठाच्या मृद व जलसंधारण विभाग प्रमुख डॉ. सुभाष टाले यांनी सांगीतले.