शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
2
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
3
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
4
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
5
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
6
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
7
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
8
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
9
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
10
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
11
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
12
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
13
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
14
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
15
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
16
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
17
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
18
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
19
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
20
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
Daily Top 2Weekly Top 5

भूगर्भातील पाण्याचे यंदा काटेकोर नियोजन करावे लागणार!

By admin | Updated: July 13, 2015 01:19 IST

पावसाने मारली दडी, भविष्यातील अंदाज भिन्न

राजरत्न सिरसाट/अकोला : गेल्यावर्षी कमी झालेला पाऊस आणि यावर्षी भारतीय हवामानशास्त्र विभागाने केलेले पावसाचे भाकीत बघता, हे वर्षदेखील कमी पावसाचे असल्याचे एकूण चित्र समोर येत आहे. त्यामुळे यावर्षी भूगर्भातील पाण्याचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. या पावसाच्या अनिश्‍चिततेमुळे शेतकर्‍यांनासुद्धा आता पीकपद्धतीत बदल करावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्यावर्षी पडलेल्या पावसाची आकडेवारी आणि यावर्षीचे भाकीत बघता, पाण्याचे नियोजन करणे किती अपरिहार्य आहे, हे लक्षात येते. अकोला जिलतील गेल्या दोन-तीन वर्षांंतील पावसाची सरासरी आकडेवारी बघितल्यास अत्यंत कमी आहे. २0१२-१३ मध्ये जिल्ह्यात केवळ ६७४ मि.मी. पाऊस पडला. २0१३-१४ मध्ये ८९४ मि.मी. पाऊस झाला आणि २0१४-१५ मध्ये पावसाळ्य़ात केवळ ५७२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. डिसेंबरपर्यंंत या पावसाची ६८0.७0 मि.मी. नोंद झाली आहे. या पाच वर्षांंत पावसाचे सरासरी चित्र बदलले आहे. कधी कमी, तर कधी जास्त, असे या पावसाचे स्वरू प आहे. २0१४-१५ या वर्षात १४0 मि.मी. पाऊस २३ जुलै व ९0 मि.मी. पाऊस ८ सप्टेंबर या एकाच दिवशी कोसळला. म्हणजेच पावसाळ्य़ातील अर्धा पाऊस हा एकाच दिवशी काही तासांत कोसळत असल्याचे या आकडेवारीवरू न निदर्शनास येत आहे. २0१५-१६ यावर्षी जूनमध्ये पश्‍चिम विदर्भात १२0 टक्के पाऊस झाला, पण लगेच पावसाने दडी मारली. भविष्यात हवामानाचे वेगवेगळे अंदाज वर्तविण्यात येत आहेत. मागील वर्षी पावसाचे पाणी भूगर्भाला मिळाले नसल्याचा धक्कादायक निष्कर्ष डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मृद व जलसंधारण विभागाने काढले आहेत. त्यामुळे २0१३-१४ मध्ये पडलेल्या पावसाचे जे पाणी भूगर्भाला मिळाले, त्या पाण्याचा व भूगर्भात अगोदरच असलेल्या नैसर्गिक पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. पावासाचे स्वरू प बदलले असून, २0१३-१४ मध्ये पाऊस चांगला झाला, पण अर्धा पाऊस हा १६ ते १८ तासांत पडला होता. १४-१५ मध्ये कमी पाऊस झाला, त्याचा अभ्यास केला असून, खारपाणपट्टय़ातील भूगर्भपातळीत गतवर्षी अडीच मीटरने घट झाल्याचे निदर्शनात आले आहे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याचेही आता काटेकोर नियोजन करावे लागणार असल्याचे कृषी विद्यापीठाच्या मृद व जलसंधारण विभाग प्रमुख डॉ. सुभाष टाले यांनी सांगीतले.