शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

कालव्याला तडे गेल्याने पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:21 IST

बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव येथे शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून धरणाची उभारणी केली. उतावळी प्रकल्पाच्या देऊळगाव येथील धरणापासून उमरा-पांगरा, चान्नी, ...

बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव येथे शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून धरणाची उभारणी केली. उतावळी प्रकल्पाच्या देऊळगाव येथील धरणापासून उमरा-पांगरा, चान्नी, खेट्री, चतारी मार्गे सस्तीपर्यंतच्या कालव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रब्बीच्या पिकांकरिता पाणी पुरवठा करण्यात येतो. या वर्षात समाधानकारक पाऊस झाल्याने उतावळी प्रकल्पाचे धरण शंभर टक्के भरले. दरम्यान, सदरच्या धरणाचे पाणी कालव्यामार्फत चान्नी, खेट्री, चतारी येथील शेतकऱ्यांना रबी हंगामातील पिकांना देण्यात येत आहे. परंतु पातूर तालुक्यातील चान्नी, खेट्री, चतारी, सस्तीपर्यंतच्या कालव्याला बहुतांश ठिकाणी तडे गेले आहेत. तसेच टी-पॉइंटचे गेट नादुरुस्त असल्याने कालव्यातून जवळपास ५० टक्के पाण्याचा अपव्यय होत आहे. पाण्याचा होणारा अपव्यय थांबविण्याकरिता पातूर तालुक्यातील चान्नी ते सस्तीपर्यंतच्या कालव्याची लायनिंग करून काँक्रिटीकरण करण्यासाठी संबंधित विभागाला निधी उपलब्ध करावा, अशा मागणी निवेदनाद्वारे चतारी येथील पोलीस पाटील विजय सरदार यांनी केली.