शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

पाण्याच्या टाक्या गाळाने भरल्या!

By admin | Updated: June 17, 2015 02:15 IST

स्वच्छ करण्याचे गटविकास अधिका-यांना आदेश.

अकोला : जिल्ह्यातील ५४२ ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी असलेल्या ४६0 पाणी साठवण टाक्यांची वर्षानुवर्षांपासून स्वच्छताच झाली नाही. त्यामुळे या टाक्या गाळाने भरल्या असून, ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ही बाब लक्षात घेऊन सर्व टाक्या पंधरा दिवसांत स्वच्छ करण्याचे आदेश ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी मंगळवारी दिलेत. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत ग्रामपंचायतींच्या हद्दीत विविध योजनांतर्गत पाणीपुरवठा योजना राबविली जाते. जिल्ह्यात या योजनांसाठी ४६0 टाक्या बांधण्यात आल्या आहेत. या टाक्यांची देखभाल दुरुस्ती हा ग्रामपंचायतच्या कामाचा भाग आहे. पाणीपट्टी वसूल करून ग्रामस्थांना स्वच्छ पाणी देण्याची जबाबदारी पंचायत विभागाची आहे. त्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची यंत्रणा सहकार्य करीत असते; मात्र पंचायत आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभाग या दोन्ही यंत्रणांकडून वर्षानुवर्षांपासून पाणी साठवण टाक्यांची स्वच्छताच झाली नाही. त्यामुळे पाण्यासोबत वाहून आलेला गाळ साठवण टाक्यांमध्ये जमा झाला आहे. त्यामुळे टाक्यांची साठवण क्षमता तर कमी झालीच, शिवाय गाळामुळे पाणी दूषित होऊन ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही बाब एका पाहणीत आढळून आल्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी मंगळवारी तातडीने आदेश काढून सर्व गटविकास अधिकार्‍यांना साठवण टाक्यांमधील गाळ काढून टाक्या स्वच्छ करण्याचे निर्देश दिले आहेत. पंधरा दिवसांत टाक्यांची गाळ काढून स्वच्छता करून तसा अहवाल ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे सादर करण्याचे निर्देशही कार्यकारी अभियंत्यांनी दिले आहेत.