शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
4
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
5
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
6
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
7
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
8
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
9
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
10
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
11
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
12
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
13
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
14
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
15
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
17
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
18
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
19
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
20
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...

पाण्याच्या टाक्या गाळाने भरल्या!

By admin | Updated: June 17, 2015 02:15 IST

स्वच्छ करण्याचे गटविकास अधिका-यांना आदेश.

अकोला : जिल्ह्यातील ५४२ ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी असलेल्या ४६0 पाणी साठवण टाक्यांची वर्षानुवर्षांपासून स्वच्छताच झाली नाही. त्यामुळे या टाक्या गाळाने भरल्या असून, ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ही बाब लक्षात घेऊन सर्व टाक्या पंधरा दिवसांत स्वच्छ करण्याचे आदेश ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी मंगळवारी दिलेत. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत ग्रामपंचायतींच्या हद्दीत विविध योजनांतर्गत पाणीपुरवठा योजना राबविली जाते. जिल्ह्यात या योजनांसाठी ४६0 टाक्या बांधण्यात आल्या आहेत. या टाक्यांची देखभाल दुरुस्ती हा ग्रामपंचायतच्या कामाचा भाग आहे. पाणीपट्टी वसूल करून ग्रामस्थांना स्वच्छ पाणी देण्याची जबाबदारी पंचायत विभागाची आहे. त्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची यंत्रणा सहकार्य करीत असते; मात्र पंचायत आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभाग या दोन्ही यंत्रणांकडून वर्षानुवर्षांपासून पाणी साठवण टाक्यांची स्वच्छताच झाली नाही. त्यामुळे पाण्यासोबत वाहून आलेला गाळ साठवण टाक्यांमध्ये जमा झाला आहे. त्यामुळे टाक्यांची साठवण क्षमता तर कमी झालीच, शिवाय गाळामुळे पाणी दूषित होऊन ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही बाब एका पाहणीत आढळून आल्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी मंगळवारी तातडीने आदेश काढून सर्व गटविकास अधिकार्‍यांना साठवण टाक्यांमधील गाळ काढून टाक्या स्वच्छ करण्याचे निर्देश दिले आहेत. पंधरा दिवसांत टाक्यांची गाळ काढून स्वच्छता करून तसा अहवाल ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे सादर करण्याचे निर्देशही कार्यकारी अभियंत्यांनी दिले आहेत.