शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

अकोला जिल्हावासीयांना पाणीटंचाईचे चटके

By admin | Updated: April 6, 2015 02:13 IST

पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट; पाणीटंचाई निवारणाचा आराखडा कागदावरच.

अकोला : उन्हासोबतच जिल्ह्यातील विविध भागांमध्ये ग्रामस्थांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. ग्रामस्थांना बरेच अंतराहून बैलगाडी, दुचाकी, सायकलने पाणी आणावे लागत आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाययोजनांचा समावेश असलेला कृती आराखडा जिल्हा प्रशासनामार्फत मंजूर करण्यात आला असला तरी अनेक गावांमध्ये प्रत्यक्षात पाणीटंचाई निवारणाची कामे सुरू झालेली नाहीत. परिणामी ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे कागदावरील कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे. जिल्ह्यातील अनेक गावांतील शेतकरी व शेतमजुरांना दिवसभर शेतात राबून संध्याकाळी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच आहे. अल्प व अनियमित पावसामुळे खरीप हंगामातील पिके समाधानकारक झाली नाहीत. अशातच अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे रबी हंगामातील गहू, हरभरा पिकांची प्रचंड नासाडी झाली आहे. शेतकर्‍यांच्या हाततोंडाशी आलेला घास हिरावला गेला; आता पाणीटंचाईमुळे ते हवालदिल झाले आहेत. यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही. धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा असल्याने, हिवाळ्यातच जिल्ह्यातील विविध भागांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती. आता उन्हाळा सुरू झाल्याने पाणीटंचाईची समस्या तीव्र होत आहे. अनेक गावांना १५ दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील विविध भागांमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होणार आहे. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत विविध उपाययोजनांचा कृती आराखडा मंजुरीसाठी तयार करण्यात आला होता. या कृती आराखड्यास जिल्हाधिकार्‍यांनी मंजुरी दिली होती. कृती आराखड्यात जिल्ह्यातील ४५८ गावांसाठी ५८२ उपाययोजनांचा समावेश असून, या कामांसाठी ११ कोटी ८३ लाख ३२ हजार रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला होता. दरम्यान, एप्रिल ते जून २0१५ या कालावधीत पाणीटंचाई उपाययोजनांच्या कृती आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. उपाययोजनांवर ३ कोटी ८६ लाख ५ हजार एवढा खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील १५९ गावे प्रस्तावित असून, या गावांमध्ये २५८ उपाययोजना करण्यात येणार आहेत.