शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

आगरसह परिसरातील पाणीपुरवठा ठप्प; ग्रामस्थांना हिवाळ्यात घ्यावे लागते पाणी विकत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:18 IST

आगर परिसरातील नवथळ, खेकडी, पाळोदी, कंचनपूर, बादलापूर आदी गावांना दर आठवड्यातून एकदा खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणीपुरवठा केला जातो. ...

आगर परिसरातील नवथळ, खेकडी, पाळोदी, कंचनपूर, बादलापूर आदी गावांना दर आठवड्यातून एकदा खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणीपुरवठा केला जातो. मात्र गेल्या महिन्याभरापासून पाणीपुरवठा योजनेच बंद असल्याने ग्रामस्थांची भटकंती होत आहे. ग्रामस्थांनी अनेकदा ग्रामपंचायत विभागाशी संपर्क साधून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली; मात्र याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिसरात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने नेते यामध्ये व्यस्त आहेत. दुसरीकडे, नागरिक पाण्यासाठी भटकंती करीत असल्याचे चित्र आहे.

पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत असल्याने ग्रामस्थांना आर्थिक भुर्दंड

गावात पाणीपुरवठा ठप्प असल्याने ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. तसेच ग्रामस्थांना दररोज खासगी टँकरमधून पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याकडे पाणीपुरवठा विभागाने लक्ष देऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.

फोटो : आगर गावातील रिकामे जलकुंभ.