शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

६४ खेड्यांना ‘बोअर’द्वारे करणार पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 01:29 IST

अकोला: खांबोराजवळील उन्नई बंधारा आटल्याने खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा विभागांतर्गत ६४ गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या जलसंकटाच्या परिस्थितीत सुकळी येथील तलावात बोअर करून, त्याद्वारे ६४ खेड्यांना पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत १९ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसुकळी तलावात बोअर करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे!दूषित पाण्यावर भागविली जाते तहानग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात! 

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: खांबोराजवळील उन्नई बंधारा आटल्याने खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा विभागांतर्गत ६४ गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या जलसंकटाच्या परिस्थितीत सुकळी येथील तलावात बोअर करून, त्याद्वारे ६४ खेड्यांना पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत १९ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात आला आहे.  यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र दमदार पाऊस झाला नसल्याने, जिल्हय़ातील धरणांमधील जलसाठय़ात अद्यापही वाढ झाली नाही. त्यामध्ये अकोला शहरासह खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करणार्‍या महान येथील काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असून, धरणातील जलसाठा अकोला शहर पाणीपुरवठा योजनेसाठी आरक्षित असून, खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी धरणातून पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे योजनेंतर्गत ६४ गावांना खांबोराजवळील उन्नई बंधार्‍यातून आठ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता; मात्र उन्नई बंधार्‍यातील पाणी संपल्याने खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांचा पाणीपुरवठा गत ७ ऑगस्टपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात ६४ गावांमध्ये जलसंकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यानुषंगाने अकोला तालुक्यातल्या सुकळी येथील तलावात प्रायोगिक तत्त्वावर बोअर करून, त्याद्वारे ६४ गावांना पाणीपुरवठा करण्याचा जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात आला आहे. या पृष्ठभूमीवर या प्रस्तावाला जिल्हाधिकार्‍यांकडून केव्हा मान्यता मिळणार आणि टंचाईग्रस्त गावांना प्रत्यक्षात पिण्याचे पाणी केव्हा मिळणार, याबाबतची प्रतीक्षा ग्रामस्थांकडून केली जात आहे.

दूषित पाण्यावर भागविली जाते तहान; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात! खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा बंद असल्याने, ६४ गावांमधील ग्रामस्थांना नदी-नाल्यातील ‘झिर्‍या’च्या दूषित पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. तहान भागविण्यासाठी दूषित पाण्याचा वापर करावा लागत असल्याने, या गावांमधील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

महिनाभरापासून ग्रामस्थांना मिळाले नाही पाणी!उन्नई बंधार्‍यातील पाणी संपल्याने गत महिनाभरापासून खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६0 गावांमधील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळाले नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे.

सुकळी येथील तलावात प्रायोगिक तत्त्वावर बोअर करून, त्याद्वारे ६४ खेड्यांना पाणीपुरवठा करण्याच्या उपाययोजनेचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.-उल्हास बंडसहायक भूवैज्ञानिक, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग