शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

६४ खेड्यांना ‘बोअर’द्वारे करणार पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 01:29 IST

अकोला: खांबोराजवळील उन्नई बंधारा आटल्याने खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा विभागांतर्गत ६४ गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या जलसंकटाच्या परिस्थितीत सुकळी येथील तलावात बोअर करून, त्याद्वारे ६४ खेड्यांना पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत १९ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसुकळी तलावात बोअर करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे!दूषित पाण्यावर भागविली जाते तहानग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात! 

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: खांबोराजवळील उन्नई बंधारा आटल्याने खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा विभागांतर्गत ६४ गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या जलसंकटाच्या परिस्थितीत सुकळी येथील तलावात बोअर करून, त्याद्वारे ६४ खेड्यांना पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत १९ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात आला आहे.  यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र दमदार पाऊस झाला नसल्याने, जिल्हय़ातील धरणांमधील जलसाठय़ात अद्यापही वाढ झाली नाही. त्यामध्ये अकोला शहरासह खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करणार्‍या महान येथील काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असून, धरणातील जलसाठा अकोला शहर पाणीपुरवठा योजनेसाठी आरक्षित असून, खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी धरणातून पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे योजनेंतर्गत ६४ गावांना खांबोराजवळील उन्नई बंधार्‍यातून आठ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता; मात्र उन्नई बंधार्‍यातील पाणी संपल्याने खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांचा पाणीपुरवठा गत ७ ऑगस्टपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात ६४ गावांमध्ये जलसंकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यानुषंगाने अकोला तालुक्यातल्या सुकळी येथील तलावात प्रायोगिक तत्त्वावर बोअर करून, त्याद्वारे ६४ गावांना पाणीपुरवठा करण्याचा जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात आला आहे. या पृष्ठभूमीवर या प्रस्तावाला जिल्हाधिकार्‍यांकडून केव्हा मान्यता मिळणार आणि टंचाईग्रस्त गावांना प्रत्यक्षात पिण्याचे पाणी केव्हा मिळणार, याबाबतची प्रतीक्षा ग्रामस्थांकडून केली जात आहे.

दूषित पाण्यावर भागविली जाते तहान; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात! खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा बंद असल्याने, ६४ गावांमधील ग्रामस्थांना नदी-नाल्यातील ‘झिर्‍या’च्या दूषित पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. तहान भागविण्यासाठी दूषित पाण्याचा वापर करावा लागत असल्याने, या गावांमधील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

महिनाभरापासून ग्रामस्थांना मिळाले नाही पाणी!उन्नई बंधार्‍यातील पाणी संपल्याने गत महिनाभरापासून खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६0 गावांमधील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळाले नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे.

सुकळी येथील तलावात प्रायोगिक तत्त्वावर बोअर करून, त्याद्वारे ६४ खेड्यांना पाणीपुरवठा करण्याच्या उपाययोजनेचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.-उल्हास बंडसहायक भूवैज्ञानिक, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग