शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

योजना बिनकामाची; ४४ गावांची तहान ‘टँकर’वरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 14:35 IST

वान धरणातून पाणी पुरवठा करण्याची योजना बिनकामाची ठरली असून, पावसाळ्यातही टंचाईग्रस्त ४४ गावांची तहान ‘टँकर’च्या पाण्यावरच भागविली जात आहे.

ठळक मुद्देसप्टेंबरपासून खांबोरा पाणी पुरवठा योजनेंतर्गत गावांना धरणातून पाणी पुरवठा बंद करण्यात आला. पाणीटंचाईग्रस्त गावांना गत आॅक्टोबरपासून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. जुनी जलवाहिनी ठिकठिकाणी ‘लिकेज’ होत असल्याने ‘वान’चे पाणीटंचाईग्रस्त ४४ गावांपर्यंत पोहोचले नाही.

 - संतोष येलकरअकोला : जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ४४ गावांना वाण धरणातून पाणी पुरवठा करण्यासाठी तातडीच्या योजनेचे काम गत एप्रिलमध्येच पूर्ण करण्यात आले; मात्र उन्हाळा उलटून गेला असला, तरी अद्यापही पाणीटंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थांना ‘वान’चे पाणी मिळाले नाही. त्यामुळे वान धरणातून पाणी पुरवठा करण्याची योजना बिनकामाची ठरली असून, पावसाळ्यातही टंचाईग्रस्त ४४ गावांची तहान ‘टँकर’च्या पाण्यावरच भागविली जात आहे.गतवर्षीच्या पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने महान येथील काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याच्या पृष्ठभूमीवर धरणातील जलसाठा अकोला शहरासाठी आरक्षित करण्यात आला असून, गत सप्टेंबरपासून खांबोरा पाणी पुरवठा योजनेंतर्गत गावांना धरणातून पाणी पुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त गावांना गत आॅक्टोबरपासून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यानुषंगाने खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत टंचाईग्रस्त ४४ गावांना वाण धरणातून पाणी पुरवठा करण्यासाठी ३ कोटी ६७ लाख रुपयांच्या तातडीच्या योजनेला शासनामार्फत मंजुरी देण्यात आली. या योजनेंतर्गत उगवा फाटा ते घुसरपर्यंत नवीन जलवाहिनी टाकून घुसर येथील ‘सम्प’मधून ४४ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी चोहोट्टा बाजार येथे ६० अश्वशक्तीचे सबमर्सिबल पंप बसविण्यात आले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत योजनेचे काम गत एप्रिलमध्ये पूर्ण करण्यात आले असून, त्यानंतर टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी चाचणी घेण्यात आली असता, चोहोट्टा बाजार ते उगवापर्यंत जुनी जलवाहिनी ठिकठिकाणी ‘लिकेज’ होत असल्याने ‘वान’चे पाणीटंचाईग्रस्त ४४ गावांपर्यंत पोहोचले नाही. जलवाहिनी दुरुस्तीच्या कामात उन्हाळा उलटून गेला, पावसाळा सुरू झाला; मात्र वान धरणाचे पाणी खारपाणपट्ट्यातील ग्रामस्थांना मिळाले नाही. त्यामुळे टंचाईग्रस्त ४४ गावांतील ग्रामस्थांना अद्यापही टँकरच्या पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे. वान धरणातून पाणी पुरवठा करण्यासाठी तातडीची बाब म्हणून कोट्यवधी रुपयांच्या योजनेचे काम पूर्ण करण्यात आले; मात्र ग्रामस्थांना पाणी मिळाले नसल्याने आणि गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत असल्याने कोट्यवधी रुपये खर्च करून पूर्ण करण्यात आलेली ही पाणी पुरवठा योजना बिनकामाची ठरली आहे.कोट्यवधींचा खर्च पाण्यात?वान धरणातून टंचाईग्रस्त ४४ गावांना पाणी पुरवठा करण्याच्या योजनेच्या कामावर ३ कोटी ६७ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला; मात्र योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर अद्याप या योजनेंतर्गत ‘वान’चे पाणी गावांपर्यंत पोहोचले नाही. त्यामुळे या योजनेच्या कामावर झालेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात तर गेला नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दहा महिन्यांपासून ‘टँकर’द्वारे सुरू आहे पाणी पुरवठा!खारपाणपट्ट्यातील खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ५५ गावांमध्ये गत सप्टेंबरपासून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. गत महिन्यांपासून टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. उन्हाळा संपला असला, तरी ग्रामस्थांना टँकरच्या पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे.

वान धरणातून ४४ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी योजनेचे काम पूर्ण करण्यात आले; मात्र उन्हाळा संपला तरी ग्रामस्थांना ‘वान’चे पाणी मिळाले नाही. त्यामुळे पावसाळ्यातही टँकरद्वारे पाणी पुरवठ्यावरच ग्रामस्थांना तहान भागवावी लागत आहे. टंचाईच्या परिस्थितीत पाणी मिळाले नसल्याने वान धरणातून पाणी पुरवठा करण्याच्या योजनेचा टंचाईग्रस्त गावांना उपयोग झाला नाही.- दिलीप मोहोड, अध्यक्ष, बारुला कृती समिती, आपातापा.

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणी