शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

योजना बिनकामाची; ४४ गावांची तहान ‘टँकर’वरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 14:35 IST

वान धरणातून पाणी पुरवठा करण्याची योजना बिनकामाची ठरली असून, पावसाळ्यातही टंचाईग्रस्त ४४ गावांची तहान ‘टँकर’च्या पाण्यावरच भागविली जात आहे.

ठळक मुद्देसप्टेंबरपासून खांबोरा पाणी पुरवठा योजनेंतर्गत गावांना धरणातून पाणी पुरवठा बंद करण्यात आला. पाणीटंचाईग्रस्त गावांना गत आॅक्टोबरपासून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. जुनी जलवाहिनी ठिकठिकाणी ‘लिकेज’ होत असल्याने ‘वान’चे पाणीटंचाईग्रस्त ४४ गावांपर्यंत पोहोचले नाही.

 - संतोष येलकरअकोला : जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ४४ गावांना वाण धरणातून पाणी पुरवठा करण्यासाठी तातडीच्या योजनेचे काम गत एप्रिलमध्येच पूर्ण करण्यात आले; मात्र उन्हाळा उलटून गेला असला, तरी अद्यापही पाणीटंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थांना ‘वान’चे पाणी मिळाले नाही. त्यामुळे वान धरणातून पाणी पुरवठा करण्याची योजना बिनकामाची ठरली असून, पावसाळ्यातही टंचाईग्रस्त ४४ गावांची तहान ‘टँकर’च्या पाण्यावरच भागविली जात आहे.गतवर्षीच्या पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने महान येथील काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याच्या पृष्ठभूमीवर धरणातील जलसाठा अकोला शहरासाठी आरक्षित करण्यात आला असून, गत सप्टेंबरपासून खांबोरा पाणी पुरवठा योजनेंतर्गत गावांना धरणातून पाणी पुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त गावांना गत आॅक्टोबरपासून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यानुषंगाने खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत टंचाईग्रस्त ४४ गावांना वाण धरणातून पाणी पुरवठा करण्यासाठी ३ कोटी ६७ लाख रुपयांच्या तातडीच्या योजनेला शासनामार्फत मंजुरी देण्यात आली. या योजनेंतर्गत उगवा फाटा ते घुसरपर्यंत नवीन जलवाहिनी टाकून घुसर येथील ‘सम्प’मधून ४४ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी चोहोट्टा बाजार येथे ६० अश्वशक्तीचे सबमर्सिबल पंप बसविण्यात आले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत योजनेचे काम गत एप्रिलमध्ये पूर्ण करण्यात आले असून, त्यानंतर टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी चाचणी घेण्यात आली असता, चोहोट्टा बाजार ते उगवापर्यंत जुनी जलवाहिनी ठिकठिकाणी ‘लिकेज’ होत असल्याने ‘वान’चे पाणीटंचाईग्रस्त ४४ गावांपर्यंत पोहोचले नाही. जलवाहिनी दुरुस्तीच्या कामात उन्हाळा उलटून गेला, पावसाळा सुरू झाला; मात्र वान धरणाचे पाणी खारपाणपट्ट्यातील ग्रामस्थांना मिळाले नाही. त्यामुळे टंचाईग्रस्त ४४ गावांतील ग्रामस्थांना अद्यापही टँकरच्या पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे. वान धरणातून पाणी पुरवठा करण्यासाठी तातडीची बाब म्हणून कोट्यवधी रुपयांच्या योजनेचे काम पूर्ण करण्यात आले; मात्र ग्रामस्थांना पाणी मिळाले नसल्याने आणि गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत असल्याने कोट्यवधी रुपये खर्च करून पूर्ण करण्यात आलेली ही पाणी पुरवठा योजना बिनकामाची ठरली आहे.कोट्यवधींचा खर्च पाण्यात?वान धरणातून टंचाईग्रस्त ४४ गावांना पाणी पुरवठा करण्याच्या योजनेच्या कामावर ३ कोटी ६७ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला; मात्र योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर अद्याप या योजनेंतर्गत ‘वान’चे पाणी गावांपर्यंत पोहोचले नाही. त्यामुळे या योजनेच्या कामावर झालेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात तर गेला नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दहा महिन्यांपासून ‘टँकर’द्वारे सुरू आहे पाणी पुरवठा!खारपाणपट्ट्यातील खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ५५ गावांमध्ये गत सप्टेंबरपासून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. गत महिन्यांपासून टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. उन्हाळा संपला असला, तरी ग्रामस्थांना टँकरच्या पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे.

वान धरणातून ४४ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी योजनेचे काम पूर्ण करण्यात आले; मात्र उन्हाळा संपला तरी ग्रामस्थांना ‘वान’चे पाणी मिळाले नाही. त्यामुळे पावसाळ्यातही टँकरद्वारे पाणी पुरवठ्यावरच ग्रामस्थांना तहान भागवावी लागत आहे. टंचाईच्या परिस्थितीत पाणी मिळाले नसल्याने वान धरणातून पाणी पुरवठा करण्याच्या योजनेचा टंचाईग्रस्त गावांना उपयोग झाला नाही.- दिलीप मोहोड, अध्यक्ष, बारुला कृती समिती, आपातापा.

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणी