शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

पाण्याच्या चोरीला महापालिकेचा लगाम; नवीन जलवाहिनीचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 15:32 IST

अकोला: महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीवर बार्शीटाकळी शहरात ठिकठिकाणी अवैधरीत्या ‘टॅपिंग’ करून पाण्याची चोरी करण्याच्या प्रकाराला मनपा प्रशासनाने कायमस्वरूपी लगाम लावला आहे.

अकोला: महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीवर बार्शीटाकळी शहरात ठिकठिकाणी अवैधरीत्या ‘टॅपिंग’ करून पाण्याची चोरी करण्याच्या प्रकाराला मनपा प्रशासनाने कायमस्वरूपी लगाम लावला आहे. ‘अमृत’ योजनेंतर्गत बार्शीटाकळीच्या बायपास परिसरात सव्वातीन किलोमीटर अंतराची जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. अकोलेकरांच्या हक्काच्या पाण्यावर बार्शीटाकळीत डल्ला मारला जात असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने २०१३ मध्ये स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून उघडकीस आणले होते, हे विशेष.महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावर ६५ एमएलडी व २५ एमएलडीचे दोन प्लांट कार्यरत आहेत. अकोलेकरांना पाणी पुरवठा करण्यासाठी महान येथून अकोला शहरापर्यंत ९०० व ६०० व्यासाच्या जलवाहिनीचे जाळे टाकण्यात आले आहे. त्यावेळी तत्कालीन बार्शीटाकळी ग्रामपंचायत क्षेत्रातून जलवाहिनीचे जाळे असल्याने ग्रामपंचायतच्या विनंतीवरून मनपाच्यावतीने ग्रामस्थांना पाणी पुरवठा केला जात होता. त्या बदल्यात ग्रामपंचायतकडून नियमित पाणीपट्टी जमा करणे बंधनकारक असताना अनेकदा तत्कालीन ग्रामपंचायतने पैसे भरण्यास असमर्थता दर्शविली. बार्शीटाकळी शहराच्या मध्य भागात जलवाहिनी असल्यामुळे संबंधित नागरिकांनी जलवाहिनीला ठिकठिकाणी अवैधरीत्या ‘टॅपिंग’ करून पाण्याची खुलेआम पळवापळवी सुरू केली होती. त्याचा परिणाम शहरातील पाणी पुरवठ्यावर होऊन जलकुंभांपर्यंत पाणी पोहोचण्यास विलंब होत होता. तत्कालीन ग्रामपंचायत मनपाकडे पाणीपट्टीचा भरणा करीत नसल्याचे पाहून अनेकदा पाणी पुरवठा खंडित करण्यात आला; परंतु ग्रामस्थांनी जलवाहिनीला फोडून पाण्याचा अवैध वापर सुरू ठेवल्याचे चित्र होते. यावर उपाय म्हणून बार्शीटाकळीमधील जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा बंद करून शहराबाहेरील बायपास परिसरात नवीन जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव मनपाच्या जलप्रदाय विभागाने तयार केला. या प्रस्तावानुसार ‘अमृत’ योजनेंतर्गत बार्शीटाकळीतील बायपास परिसरात सव्वातीन किलोमीटर जलवाहिनीचे जाळे टाकण्यात आले. त्यामुळे पाण्याचा चोरीला आळा बसण्यास मदत होणार आहे.‘टॅपिंग’द्वारे शेतीसाठी वापर!तत्कालीन बार्शीटाकळी ग्रामपंचायतच्या कालावधीत ग्रामस्थांनी मनपाच्या जलवाहिनीला ठिकठिकाणी अवैध ‘टॅपिंग’ केले होते. काही महाभागांनी ‘टॅपिंग’द्वारे चक्क शेतापर्यंत जलवाहिनी टाकून त्या माध्यमातून पिक ांना पाणी पुरवठा केला जात असल्याचे धक्कादायक चित्र २०१३ मध्ये ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून उघडकीस आणले होते.तत्कालीन आयुक्तांची धडाकेबाज कारवाई२०१३ मध्ये बार्शीटाकळी गावात मनपाच्या जलवाहिनीवरून पाण्याची चोरी होत असल्याचे समोर आल्यानंतर मनपाचे तत्कालीन आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, उपायुक्त दयानंद चिंचोळीकर यांनी गावातील अवैध कनेक्शन तोडण्याची धडाकेबाज कारवाई केली होती. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका