शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

पाण्याच्या चोरीला महापालिकेचा लगाम; नवीन जलवाहिनीचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 15:32 IST

अकोला: महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीवर बार्शीटाकळी शहरात ठिकठिकाणी अवैधरीत्या ‘टॅपिंग’ करून पाण्याची चोरी करण्याच्या प्रकाराला मनपा प्रशासनाने कायमस्वरूपी लगाम लावला आहे.

अकोला: महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीवर बार्शीटाकळी शहरात ठिकठिकाणी अवैधरीत्या ‘टॅपिंग’ करून पाण्याची चोरी करण्याच्या प्रकाराला मनपा प्रशासनाने कायमस्वरूपी लगाम लावला आहे. ‘अमृत’ योजनेंतर्गत बार्शीटाकळीच्या बायपास परिसरात सव्वातीन किलोमीटर अंतराची जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. अकोलेकरांच्या हक्काच्या पाण्यावर बार्शीटाकळीत डल्ला मारला जात असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने २०१३ मध्ये स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून उघडकीस आणले होते, हे विशेष.महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावर ६५ एमएलडी व २५ एमएलडीचे दोन प्लांट कार्यरत आहेत. अकोलेकरांना पाणी पुरवठा करण्यासाठी महान येथून अकोला शहरापर्यंत ९०० व ६०० व्यासाच्या जलवाहिनीचे जाळे टाकण्यात आले आहे. त्यावेळी तत्कालीन बार्शीटाकळी ग्रामपंचायत क्षेत्रातून जलवाहिनीचे जाळे असल्याने ग्रामपंचायतच्या विनंतीवरून मनपाच्यावतीने ग्रामस्थांना पाणी पुरवठा केला जात होता. त्या बदल्यात ग्रामपंचायतकडून नियमित पाणीपट्टी जमा करणे बंधनकारक असताना अनेकदा तत्कालीन ग्रामपंचायतने पैसे भरण्यास असमर्थता दर्शविली. बार्शीटाकळी शहराच्या मध्य भागात जलवाहिनी असल्यामुळे संबंधित नागरिकांनी जलवाहिनीला ठिकठिकाणी अवैधरीत्या ‘टॅपिंग’ करून पाण्याची खुलेआम पळवापळवी सुरू केली होती. त्याचा परिणाम शहरातील पाणी पुरवठ्यावर होऊन जलकुंभांपर्यंत पाणी पोहोचण्यास विलंब होत होता. तत्कालीन ग्रामपंचायत मनपाकडे पाणीपट्टीचा भरणा करीत नसल्याचे पाहून अनेकदा पाणी पुरवठा खंडित करण्यात आला; परंतु ग्रामस्थांनी जलवाहिनीला फोडून पाण्याचा अवैध वापर सुरू ठेवल्याचे चित्र होते. यावर उपाय म्हणून बार्शीटाकळीमधील जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा बंद करून शहराबाहेरील बायपास परिसरात नवीन जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव मनपाच्या जलप्रदाय विभागाने तयार केला. या प्रस्तावानुसार ‘अमृत’ योजनेंतर्गत बार्शीटाकळीतील बायपास परिसरात सव्वातीन किलोमीटर जलवाहिनीचे जाळे टाकण्यात आले. त्यामुळे पाण्याचा चोरीला आळा बसण्यास मदत होणार आहे.‘टॅपिंग’द्वारे शेतीसाठी वापर!तत्कालीन बार्शीटाकळी ग्रामपंचायतच्या कालावधीत ग्रामस्थांनी मनपाच्या जलवाहिनीला ठिकठिकाणी अवैध ‘टॅपिंग’ केले होते. काही महाभागांनी ‘टॅपिंग’द्वारे चक्क शेतापर्यंत जलवाहिनी टाकून त्या माध्यमातून पिक ांना पाणी पुरवठा केला जात असल्याचे धक्कादायक चित्र २०१३ मध्ये ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून उघडकीस आणले होते.तत्कालीन आयुक्तांची धडाकेबाज कारवाई२०१३ मध्ये बार्शीटाकळी गावात मनपाच्या जलवाहिनीवरून पाण्याची चोरी होत असल्याचे समोर आल्यानंतर मनपाचे तत्कालीन आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, उपायुक्त दयानंद चिंचोळीकर यांनी गावातील अवैध कनेक्शन तोडण्याची धडाकेबाज कारवाई केली होती. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका