शहरं
Join us  
Trending Stories
1
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
2
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
3
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
4
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
5
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
6
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
7
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
8
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
9
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
10
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
11
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
12
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
13
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
14
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
15
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
16
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
17
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
18
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
19
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
20
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा

पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजना कागदावरच!

By admin | Updated: April 20, 2017 01:43 IST

केवळ सहा गावांसाठी सात विहिरींचे अधिग्रहण

अकोला : तापत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांचा कृती आराखडा मंजूर असला, तरी १९ एप्रिलपर्यंत केवळ सहा गावांसाठी सात विहिरी अधिग्रहण करण्याची उपाययोजना पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजना अद्याप कागदावरच आहेत.जीवाची लाही-लाही करणाऱ्या उन्हासोबतच जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यासह विविध गावांमध्ये पाणीटंचाईचे चटके ग्रामस्थांना सहन करावे लागत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी जिल्ह्यातील सातही तालुक्यांत पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांच्या कामांचा कृती आराखडा गत महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील ३११ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या १९८ उपाययोजना कृती आराखड्यात प्रस्तावित करण्यात आल्या. त्यामध्ये २२ विंधन विहिरी, २७ कूपनलिका, ४५ नळ योजनांची विशेष दुरुस्ती, नऊ तात्पुरत्या पूरक नळ योजना, एक टँकरद्वारे पाणीपुरवठा, ९४ विहिरींचे अधिग्रहण इत्यादी उपाययोजनांच्या कामांचा समावेश आहे. पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी १९ एप्रिलपर्यंत सहा गावांसाठी केवळ सात विहिरींचे अधिग्रहण करण्याची कामे पूर्ण करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांची कामे कागदावरच असल्याची स्थिती आहे.१३ कामांना प्रशासकीय मान्यता!पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांपैकी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत प्राप्त प्रस्तावानुसार, जिल्ह्यातील नऊ गावांमध्ये १३ उपाययोजनांच्या कामांसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी केवळ सात विहिरींचे अधिग्रहण करण्याची कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित पाणीटंचाई निवारणाची कामे अद्याप रखडली आहेत.१५ विंधन विहिरी, १० कूपनलिकांचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे!जिल्ह्यात १५ विंधन विहिरी आणि १० कूपनलिकांच्या कामांचे प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत १८ एप्रिल रोजी प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले आहेत.