शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजना कागदावरच!

By admin | Updated: April 20, 2017 01:43 IST

केवळ सहा गावांसाठी सात विहिरींचे अधिग्रहण

अकोला : तापत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांचा कृती आराखडा मंजूर असला, तरी १९ एप्रिलपर्यंत केवळ सहा गावांसाठी सात विहिरी अधिग्रहण करण्याची उपाययोजना पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजना अद्याप कागदावरच आहेत.जीवाची लाही-लाही करणाऱ्या उन्हासोबतच जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यासह विविध गावांमध्ये पाणीटंचाईचे चटके ग्रामस्थांना सहन करावे लागत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी जिल्ह्यातील सातही तालुक्यांत पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांच्या कामांचा कृती आराखडा गत महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील ३११ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या १९८ उपाययोजना कृती आराखड्यात प्रस्तावित करण्यात आल्या. त्यामध्ये २२ विंधन विहिरी, २७ कूपनलिका, ४५ नळ योजनांची विशेष दुरुस्ती, नऊ तात्पुरत्या पूरक नळ योजना, एक टँकरद्वारे पाणीपुरवठा, ९४ विहिरींचे अधिग्रहण इत्यादी उपाययोजनांच्या कामांचा समावेश आहे. पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी १९ एप्रिलपर्यंत सहा गावांसाठी केवळ सात विहिरींचे अधिग्रहण करण्याची कामे पूर्ण करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांची कामे कागदावरच असल्याची स्थिती आहे.१३ कामांना प्रशासकीय मान्यता!पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांपैकी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत प्राप्त प्रस्तावानुसार, जिल्ह्यातील नऊ गावांमध्ये १३ उपाययोजनांच्या कामांसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी केवळ सात विहिरींचे अधिग्रहण करण्याची कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित पाणीटंचाई निवारणाची कामे अद्याप रखडली आहेत.१५ विंधन विहिरी, १० कूपनलिकांचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे!जिल्ह्यात १५ विंधन विहिरी आणि १० कूपनलिकांच्या कामांचे प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत १८ एप्रिल रोजी प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले आहेत.