शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

जलयुक्तची कामे होऊनही पाणीटंचाई

By admin | Updated: May 1, 2017 02:48 IST

बाळापूर तालुक्यात ५२ गावांमध्ये जलयुक्तची झाली कामे

अनंत वानखडे - बाळापूरबाळापूर तालुक्यातील ५२ गावांत जलयुक्त शिवार योजनेची कामे सुरू आहेत. २०१४-१५ पासून जलयुक्त शिवार योजना सुरू झाली. जलयुक्त शिवार योजनेत तांत्रिकदृष्ट्या योग्य अशी कामे न झाल्याने योजनेला हरताळ फासून शासकीय योजना कुरण ठरत आहे.जलयुक्त शिवार योजना शेतकऱ्यांना खरिपातील पाऊस खंडित झाल्यास पिकांना जीवनदान देण्यासाठी शेतकरी नदी-नाल्यावर अडविलेले पाणी पिकांना पंपाद्वारे देण्यासाठी वापरतात; परंतु ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी शिवार योजनेचा कुठलाही लाभ होत नसल्याने जलयुक्त शिवार योजनेच्या गावातच पाणीटंचाईचे संकट उभे राहत असल्याचे चिन्ह आहे.२०१४-१५ मध्ये जलयुक्त शिवार योजनेत २० गावे २०१५-१६ मध्ये १२ गावे, २०१६-१७ मध्ये २० गावे असे एकूण ५२ गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेंतर्गत भूगर्भात पाणी जिरविण्यासाठी पावसाचे पाणी शिवारातच अडविण्यासाठी नाले शासकीय जमिनीवर शेततळे खोदणे, शेतकऱ्याच्या शेतात ढाळीचे बांध बांधणे, विहीर पुनर्भरण, नाला रुंदीकरण, बंधारे, शेततळ्यातील गाळ काढून पाणी साठवण क्षमता वाढवणे आदी कामांसोबत सिमेंट बंधारे बांधणे यासाठी लघुसिंचन जि. प. बांधकाम विभाग, तालुका कृ षी कार्यालय, जलसंधारण विभाग, वन विभाग, पाटबंधारे विभाग आदी विभागांतर्गत जलयुक्त शिवार योजनेची कामे प्रशासन करीत आहेत. जलयुक्त शिवार योजनेत लोकसहभागाची खरी गरज आहे; परंतु लोकसहभाग वाढवण्यासाठी कुठलाही प्रयत्न न करता प्रशासकीय अधिकारी कुठल्याही कामाला तांत्रिकदृष्ट्या मंजुरी न घेता भ्रष्टाचाराला पूरक अशी कामे केली जात आहे. अनेक शेततळी बंधारे कोरडीच राहिली. विहीर पुनर्भरणाच्या नावाखाली कामे झाली; परंतु फायदा झालेला नाही. मोरगाव सादीजनमध्ये मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार योजनेची सर्वात जास्त कामे झाली; परंतु तेथे अद्यापही पाणीटंचाई भासत आहे. याबात ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात प्रशासनाकडे योजनेच्या निकृ ष्ट कामाच्या तक्रारी झाल्या. परंतु चौकशी झाली नसल्याचा आरोप बंडू टेकाडे, खंडूजी लाखे, देवीदास वाघ, हरिभाऊ वाघ यांनी केल्या होत्या. वझेगाव, दधम, शेळद, उरळ खु. लोहारा या गावांतही तीच परिस्थिती आहे. जलयुक्त शिवार योजनेत सर्व कामे यंत्रांनी केली जात असली, तरी खोली, रुंदीकरण कामात निकृ ष्ट दर्जा, प्रत्यक्ष कामापेक्षा जास्त बिल काढून भ्रष्टाचाराला पूरक ठरल्याने दोन वर्षांपूर्वीची अनेक ढाळीचे बांध शेततळे, जमीनदोस्त झाले आहेत. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक योजनेत भ्रष्टाचारासाठी पायवाटा काढून निकृ ष्ट दर्जाची कामे प्रशासकीय अधिकारी हेतुपुरस्सर दुर्लक्षित करून कामात वाटेकरी होत आहेत. जलयुक्त शिवार योजना पाणीटंचाई निवारण्यासाठी पूरक असली, तरी नियोजनाअभावी, भूगर्भशास्त्रीय दृष्टिकोनातून केली नसल्याने योजना भ्रष्टाचाराचे केवळ कुरण ठरणार आहे. खारपाणपट्ट्यात भीषण पाणीटंचाईतालुका हा खारपाणपट्ट्याने व्यापला आहे. सिंचन क्षेत्र केवळ पाच टक्के आहे. २०१४-१५ मध्ये घेतलेल्या योजनेतील कामामुळे ग्रामीण भागात पाणीटंचाई कमी होण्याऐवजी वाढ होत आहे.