शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
3
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
4
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
5
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
6
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
7
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
8
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
9
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
10
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
11
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
12
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
13
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
14
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
15
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
16
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
17
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
18
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
19
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
20
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर

जलयुक्तची कामे होऊनही पाणीटंचाई

By admin | Updated: May 1, 2017 02:48 IST

बाळापूर तालुक्यात ५२ गावांमध्ये जलयुक्तची झाली कामे

अनंत वानखडे - बाळापूरबाळापूर तालुक्यातील ५२ गावांत जलयुक्त शिवार योजनेची कामे सुरू आहेत. २०१४-१५ पासून जलयुक्त शिवार योजना सुरू झाली. जलयुक्त शिवार योजनेत तांत्रिकदृष्ट्या योग्य अशी कामे न झाल्याने योजनेला हरताळ फासून शासकीय योजना कुरण ठरत आहे.जलयुक्त शिवार योजना शेतकऱ्यांना खरिपातील पाऊस खंडित झाल्यास पिकांना जीवनदान देण्यासाठी शेतकरी नदी-नाल्यावर अडविलेले पाणी पिकांना पंपाद्वारे देण्यासाठी वापरतात; परंतु ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी शिवार योजनेचा कुठलाही लाभ होत नसल्याने जलयुक्त शिवार योजनेच्या गावातच पाणीटंचाईचे संकट उभे राहत असल्याचे चिन्ह आहे.२०१४-१५ मध्ये जलयुक्त शिवार योजनेत २० गावे २०१५-१६ मध्ये १२ गावे, २०१६-१७ मध्ये २० गावे असे एकूण ५२ गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेंतर्गत भूगर्भात पाणी जिरविण्यासाठी पावसाचे पाणी शिवारातच अडविण्यासाठी नाले शासकीय जमिनीवर शेततळे खोदणे, शेतकऱ्याच्या शेतात ढाळीचे बांध बांधणे, विहीर पुनर्भरण, नाला रुंदीकरण, बंधारे, शेततळ्यातील गाळ काढून पाणी साठवण क्षमता वाढवणे आदी कामांसोबत सिमेंट बंधारे बांधणे यासाठी लघुसिंचन जि. प. बांधकाम विभाग, तालुका कृ षी कार्यालय, जलसंधारण विभाग, वन विभाग, पाटबंधारे विभाग आदी विभागांतर्गत जलयुक्त शिवार योजनेची कामे प्रशासन करीत आहेत. जलयुक्त शिवार योजनेत लोकसहभागाची खरी गरज आहे; परंतु लोकसहभाग वाढवण्यासाठी कुठलाही प्रयत्न न करता प्रशासकीय अधिकारी कुठल्याही कामाला तांत्रिकदृष्ट्या मंजुरी न घेता भ्रष्टाचाराला पूरक अशी कामे केली जात आहे. अनेक शेततळी बंधारे कोरडीच राहिली. विहीर पुनर्भरणाच्या नावाखाली कामे झाली; परंतु फायदा झालेला नाही. मोरगाव सादीजनमध्ये मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार योजनेची सर्वात जास्त कामे झाली; परंतु तेथे अद्यापही पाणीटंचाई भासत आहे. याबात ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात प्रशासनाकडे योजनेच्या निकृ ष्ट कामाच्या तक्रारी झाल्या. परंतु चौकशी झाली नसल्याचा आरोप बंडू टेकाडे, खंडूजी लाखे, देवीदास वाघ, हरिभाऊ वाघ यांनी केल्या होत्या. वझेगाव, दधम, शेळद, उरळ खु. लोहारा या गावांतही तीच परिस्थिती आहे. जलयुक्त शिवार योजनेत सर्व कामे यंत्रांनी केली जात असली, तरी खोली, रुंदीकरण कामात निकृ ष्ट दर्जा, प्रत्यक्ष कामापेक्षा जास्त बिल काढून भ्रष्टाचाराला पूरक ठरल्याने दोन वर्षांपूर्वीची अनेक ढाळीचे बांध शेततळे, जमीनदोस्त झाले आहेत. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक योजनेत भ्रष्टाचारासाठी पायवाटा काढून निकृ ष्ट दर्जाची कामे प्रशासकीय अधिकारी हेतुपुरस्सर दुर्लक्षित करून कामात वाटेकरी होत आहेत. जलयुक्त शिवार योजना पाणीटंचाई निवारण्यासाठी पूरक असली, तरी नियोजनाअभावी, भूगर्भशास्त्रीय दृष्टिकोनातून केली नसल्याने योजना भ्रष्टाचाराचे केवळ कुरण ठरणार आहे. खारपाणपट्ट्यात भीषण पाणीटंचाईतालुका हा खारपाणपट्ट्याने व्यापला आहे. सिंचन क्षेत्र केवळ पाच टक्के आहे. २०१४-१५ मध्ये घेतलेल्या योजनेतील कामामुळे ग्रामीण भागात पाणीटंचाई कमी होण्याऐवजी वाढ होत आहे.