शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

पातूर तालुक्यातील ६७ गावांमध्ये पाणीटंचाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:17 IST

६७ गावांमध्ये पाणीटंचाई असल्यामुळे या गावांचा पाणीटंचाई कृती आराखड्यामध्ये समावेश करण्यात आला. कृती आराखड्यामध्ये प्रामुख्याने विहीर स्रोत गाळ ...

६७ गावांमध्ये पाणीटंचाई असल्यामुळे या गावांचा पाणीटंचाई कृती आराखड्यामध्ये समावेश करण्यात आला.

कृती आराखड्यामध्ये प्रामुख्याने विहीर स्रोत गाळ काढणे, विहिरी अधिग्रहण करणे, टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, प्रगतिपथावरील नळ योजना पूर्ण करणे, नळ योजनेमध्ये विशेष दुरुस्ती, तात्पुरती पूरक नळ योजना, विंधन विहीर विशेष दुरुस्ती, हातपंप, विहीर पंप, नवीन विंधन विहीर विशेष दुरुस्ती, नवीन सिंचन विहीर दुरुस्ती यामध्ये हातपंप, विहीर पंप, नवीन विंधन विहीर, कूपनलिका, आदी उपाययोजनांचा समावेश असून, ६७ गावांमधील पाणीटंचाईसाठी १३९.५१ लाखांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. माहे जानेवारी ते मार्च २०२१ पर्यंत ६७ गावांपैकी पातूर तालुक्यातील ४७ गावे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यावर ८४.२० लाखांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली. यावर्षी उन्हाचा वाढता पारा पाहता, पातूर तालुक्यातील अन्य गावांमध्ये उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरवर्षी वाढत्या उन्हामुळे हातपंपाच्या पाण्याची खोली, विहिरीच्या पाण्याची पातळी तसेच धरणाची पातळी खोल जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळेवर आणखी काही गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्यास प्रशासनाकडे कोणतीही उपाययोजना नसून, आणखी काही गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्यास प्रशासनाची तारांबळ उडणार असल्याचे बोलले जात आहे.

फोटो:

या गावांमध्ये पाणीटंचाई

पातूर तालुक्यातील बेलुरा खुर्द, बेलुरा बुद्रुक, खामखेड, उमरा, पांगरा, दिग्रस, सावरगाव, जांब, झरंडी, कारला, मलकापूर, भानोस, आस्टूल, सुकळी, दिग्रस खुर्द, हिंगणा, तांदळी खुर्द, आसोला, पळसखेड, आदी गावांचा पाणीटंचाई आराखड्यामध्ये समावेश करण्यात आला असून, या गावांमध्ये चार नळ योजना, हातपंप ८३, विद्युत पंप ८, सार्वजनिक विहिरी २८, खासगी विहिरी २३, विहिरी खोल करणे ६, गाळ काढणे, १४ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

या गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा

मलकापूर, भानोस, आस्टूल या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. पाच नवीन विंधन विहिरी असून, ५५.३१ लाखांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे, तर २० गावांमध्ये २९ उपाययोजना अपेक्षित आहेत.

सध्या तालुक्यातील चार गावांचे विहीर अधिग्रहण करण्यासाठीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. मात्र, एकाही गावाने टॅंकरची मागणी केलेली नाही.

-कपिल पवार, पाणीटंचाई विभागप्रमुख, पंचायत समिती पातूर