शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

कंत्राटदारांच्या मनमानीमुळे पाणी योजनांचा बट्ट्याबोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 12:48 IST

अकोला: ग्रामस्थांना पाणी मिळण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये निधी उपलब्ध करून दिलेल्या जिल्ह्यातील १०१ पैकी ८ पाणीपुरवठा योजना कंत्राटदारांच्या मनमानीपणामुळे पाच वर्षापेक्षाही अधिक काळापासून अर्धवट आहेत.

अकोला: ग्रामस्थांना पाणी मिळण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये निधी उपलब्ध करून दिलेल्या जिल्ह्यातील १०१ पैकी ८ पाणीपुरवठा योजना कंत्राटदारांच्या मनमानीपणामुळे पाच वर्षापेक्षाही अधिक काळापासून अर्धवट आहेत. विशेष म्हणजे, अंमलबजावणी यंत्रणा जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभाग असताना मुदतीत कामे पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर कोणती कारवाई करण्यात आली. ही बाब सत्ताधारी किंवा अधिकाऱ्यांनीही गांभीर्याने घेतलेली नाही. त्यामुळे या गावांमध्ये पाण्यासाठी ग्रामस्थांना प्रतीक्षाच आहे.ग्रामीण भागात पाणी पुरवठा व स्वच्छता समितीकडून गेल्या दहा ते बारा वर्षात शेकडो योजनांची कामे सुरू झाली. राष्ट्रीय पेयजल योजना, भारत निर्माण योजना, ग्रामीण पेयजल योजनांसाठी शासनाने २००८ पासून कोट्यवधींचा निधी दिला. त्या योजनांच्या कामात कोट्यवधींच्या अपहाराचीच प्रकरणे पुढे आली. त्यामुळे ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे अधिकार काढून घेण्याचा निर्णय शासनाने घेतला. ठरलेल्या काळात पूर्ण न झालेल्या तसेच तीन वर्षांपासून प्रलंबित योजना शिल्लक निधीसह जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने जिल्ह्यातील शाखा अभियंत्यांना योजनेचे काम तपासण्याचे उद्दिष्ट दिले. अपूर्ण कामांचे मूल्यांकन करून उर्वरित निधी जिल्हा परिषदेला हस्तांतरित करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर देण्यात आली. त्याचा आढावा दर पंधरवड्यात घेण्याचेही निर्देश देण्यात आले. जिल्ह्यांमध्ये असलेल्या योजनांची कामे, अपूर्ण कामे, खर्च, शिल्लक निधी, वसूलपात्र रकमेचा शोध घेऊन तातडीने योजना हस्तांतरण करण्याचे निर्देश देण्यात आले, तर अपहारित रकमेची वसुली ३१ मार्च २०१९ पर्यंत करण्याचेही बजावण्यात आले. योजनांचा आढावा घेतला असता जिल्ह्यातील सात योजनांची कामे कंत्राटदारांच्या मनमानीपणामुळे अपूर्ण आहेत. त्यांच्या मनमानीचा फटका गावातील ग्रामस्थांना बसत आहे.विशेष म्हणजे, निधी देणारी तसेच नियंत्रण ठेवणारी यंत्रणा जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभाग आहे. या विभागाने संबंधित कंत्राटदारांवर कोणती कारवाई केली, ही बाब अद्याप पुढे आलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करण्याचीही वेळ आली आहे. 

 

टॅग्स :Akolaअकोलाwater transportजलवाहतूकAkola ZPअकोला जिल्हा परिषद