शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

कंत्राटदारांच्या मनमानीमुळे पाणी योजनांचा बट्ट्याबोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 12:48 IST

अकोला: ग्रामस्थांना पाणी मिळण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये निधी उपलब्ध करून दिलेल्या जिल्ह्यातील १०१ पैकी ८ पाणीपुरवठा योजना कंत्राटदारांच्या मनमानीपणामुळे पाच वर्षापेक्षाही अधिक काळापासून अर्धवट आहेत.

अकोला: ग्रामस्थांना पाणी मिळण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये निधी उपलब्ध करून दिलेल्या जिल्ह्यातील १०१ पैकी ८ पाणीपुरवठा योजना कंत्राटदारांच्या मनमानीपणामुळे पाच वर्षापेक्षाही अधिक काळापासून अर्धवट आहेत. विशेष म्हणजे, अंमलबजावणी यंत्रणा जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभाग असताना मुदतीत कामे पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर कोणती कारवाई करण्यात आली. ही बाब सत्ताधारी किंवा अधिकाऱ्यांनीही गांभीर्याने घेतलेली नाही. त्यामुळे या गावांमध्ये पाण्यासाठी ग्रामस्थांना प्रतीक्षाच आहे.ग्रामीण भागात पाणी पुरवठा व स्वच्छता समितीकडून गेल्या दहा ते बारा वर्षात शेकडो योजनांची कामे सुरू झाली. राष्ट्रीय पेयजल योजना, भारत निर्माण योजना, ग्रामीण पेयजल योजनांसाठी शासनाने २००८ पासून कोट्यवधींचा निधी दिला. त्या योजनांच्या कामात कोट्यवधींच्या अपहाराचीच प्रकरणे पुढे आली. त्यामुळे ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे अधिकार काढून घेण्याचा निर्णय शासनाने घेतला. ठरलेल्या काळात पूर्ण न झालेल्या तसेच तीन वर्षांपासून प्रलंबित योजना शिल्लक निधीसह जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने जिल्ह्यातील शाखा अभियंत्यांना योजनेचे काम तपासण्याचे उद्दिष्ट दिले. अपूर्ण कामांचे मूल्यांकन करून उर्वरित निधी जिल्हा परिषदेला हस्तांतरित करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर देण्यात आली. त्याचा आढावा दर पंधरवड्यात घेण्याचेही निर्देश देण्यात आले. जिल्ह्यांमध्ये असलेल्या योजनांची कामे, अपूर्ण कामे, खर्च, शिल्लक निधी, वसूलपात्र रकमेचा शोध घेऊन तातडीने योजना हस्तांतरण करण्याचे निर्देश देण्यात आले, तर अपहारित रकमेची वसुली ३१ मार्च २०१९ पर्यंत करण्याचेही बजावण्यात आले. योजनांचा आढावा घेतला असता जिल्ह्यातील सात योजनांची कामे कंत्राटदारांच्या मनमानीपणामुळे अपूर्ण आहेत. त्यांच्या मनमानीचा फटका गावातील ग्रामस्थांना बसत आहे.विशेष म्हणजे, निधी देणारी तसेच नियंत्रण ठेवणारी यंत्रणा जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभाग आहे. या विभागाने संबंधित कंत्राटदारांवर कोणती कारवाई केली, ही बाब अद्याप पुढे आलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करण्याचीही वेळ आली आहे. 

 

टॅग्स :Akolaअकोलाwater transportजलवाहतूकAkola ZPअकोला जिल्हा परिषद