शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

पाणीटंचाई निवारण आराखडा कागदावरच!

By admin | Updated: February 26, 2015 01:28 IST

अकोला जिल्ह्यातील ५८२ उपाययोजनांची कामे रखडली.

संतोष येलकर / अकोला: जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी ४५८ गावांमध्ये ५८२ उपाययोजनांच्या कामांचा कृती आराखडा मंजूर असला तरी; ५८0 उपाययोजनांच्या कामांचे प्रस्ताव अद्यापही जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात आले नाही. कृती आराखड्यातील एकाही उपाययोजनेचे काम सुरू झाले नसल्याच्या स्थितीत जिल्ह्यातील पाणीटंचाई कृती आराखडा कागदावरच असल्याने, जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणी केव्हा पाजले जाणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, जिल्ह्यातील धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये हिवाळ्यापासूनच पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची पायपीट सुरू आहे. येत्या काही दिवसात जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ४५८ गावांमध्ये ५८२ उपाययोजनांच्या कामांचा पाणीटंचाई निवारण कृती आराखडा जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत तयार करण्यात आला. ११ कोटी ८३ लाख ३२ हजार रुपये खर्च अपेक्षित असलेल्या या कृती आराखड्याला गत १८ डिसेंबर २0१४ रोजी जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी मंजुरी दिली. कृती आराखडा मंजूर होऊन तीन महिन्यांचा कालावधी होत असला तरी, पाणीटंचाई निवारणाच्या ५८२ उपाययोजनांच्या कामांपैकी बोरगावमंजू येथे तात्पुरती पुरक नळ योजना व खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत तात्पुरती पुरक नळ योजना या दोन उपाययोजनांच्याच कामांना आतापर्यंत मंजुरी मिळाली. प्रस्तावित उपाययोजनांपैकी एकाही उपाययोजनेचे काम अद्याप सुरू करण्यात आले नसून, ५८0 उपाययोजनांच्या कामांचे प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आले नाही. त्यामुळे विविध उपायोजनांचा पाणीटंचाई कृती आराखडा मंजूर असला तरी, प्रस्तांवाविना जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणाची कामे रखडली आहेत. त्यानुषंगाने पाणीटंचाईग्रस्त गावांमधील ग्रामस्थांना पाणी पाजण्याच्या उपाययोजनांची कामे केव्हा मार्गी लागणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.