शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
4
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
5
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
6
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
7
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
8
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
9
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
10
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
11
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
12
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
13
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
14
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
15
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
16
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
17
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
18
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
19
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
20
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर

मूर्तिजापूर तालुक्यावर पाणीटंचाईचे सावट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:19 IST

प्रस्तावित सात गावांत भीषण पाणीटंचाई असल्याचे कृती आराखड्यात नमूद आहे. परंतु, त्या गावांसाठी कुठलीही उपाययोजना करण्यात आली नसल्याने कृती ...

प्रस्तावित सात गावांत भीषण पाणीटंचाई असल्याचे कृती आराखड्यात नमूद आहे. परंतु, त्या गावांसाठी कुठलीही उपाययोजना करण्यात आली नसल्याने कृती आराखडा कागदावरच आहे.

तालुक्यातील पाणीटंचाई लक्षात घेता, संभाव्य उपाय योजना म्हणून ७५ गावांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. तालुक्यातील किनी, चिखली, सोनोरी (मूर्तिजापूर), जामठी (माटोळा ), कवठा (खोलापूर), बोरगाव (निंघोट), साखरी, निंभा या गावांत पाणी टंचाईचे सावट आहे. या गावांसाठी विहिरी अधिग्रहित करणे, नळ दुरुस्ती करणे, आदी उपाय योजना प्रस्तावित आहे. कृती आराखड्यानुसार ७५ गावांतील १० गावांच्या उपाय योजनेसाठी पाणीटंचाई उपाय योजना, १७ विहिरी अधिग्रहित, १३ विहिरीतील गाळ काढणे, ६ नळ योजना दुरुस्ती, ४० विंधन विहिरी व ११ कूपनलिका पाणी टंचाई उपाय योजना आराखड्यात मंजूर करण्यात आल्या आहेत. मागील वर्षी पावसाळ्यात ७११.२० मिलिमीटर एवढी पावसाची नोंद झाली आहे. पाऊस गतवर्षीच्या तुलनेत अधिक प्रमाणात असला तरी विहिरी, विंधन विहिरींतील पाण्याची पातळी खालावली आहे. नद्या, बॅरेजेसमध्ये ठणठणाट असल्याने संपूर्ण तालुक्यात पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे.

फोटो:

३७ गावांचा पाणीपुरवठा केला खंडित!

संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता तालुका शासकीय स्तरावर पूरक कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. तालुक्यात उमा प्रकल्पावर कार्यान्वित असलेली एकमेव लंघापूर ५७ खेडी पाणीपुरवठा योजना असून, उमा प्रकल्प तुडुंब भरलेला असल्याने ही योजना तालुक्यासाठी जल संजीवनी ठरणार असली तरी ग्राहकांनी देयके न भरल्याने जीवन प्राधिकरण विभागाने ३७ गावचा पाणीपुरवठा खंडित केल्याने या गावांना कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे, तर यावर्षीपासून यातील हातगाव, सोनोरी (मूर्तिजापूर) व हेंडज तंत्रनिकेतन महाविद्यालय यांना करार तत्त्वावर पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती जीवन प्राधिकरणकडून प्राप्त झाली आहे.

कृती आराखड्यात नदीकाठची गावे

कृती आराखड्यात विशेषतः निम्म्याहून अधिक नदीकाठचे मुंगशी, शेलू नजीक, वाघजाळी, ताकवाडा, दापुरा, शिरताळा, बपोरी, सोनोरी, शेलू बाजार, सांगवी, रोहणा, बोर्टा, लंघापूर, आदी गावांचा समावेश आहे. यावरून तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईचे चित्र स्पष्ट होते.

रोहणा, काटेपूर्णा बॅरेजचे काम रखडले

विहिरींमधील पाण्याची पातळी खोल गेली आहे. बॅरेज कोरडे पडले आहेत. तालुक्यात तीन नवीन बॅरेजची निर्मिती करण्यात आली असली तरी रोहणा व काटेपूर्णा बॅरेजचे काम निधीअभावी रखडले आहे, तर घुंगशी बॅरेज पूर्णत्वास गेला आहे. परंतु त्यात पिण्यायोग्य पाणी नसल्याने परिसरातील गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

या गावांमध्ये पाणीटंचाई

किनी, चिखली, सोनोरी (मूर्तिजापूर) , जामठी (माटोळा), कवठा (खोलापूर) बोरगाव (निंघोट), साखरी, निंभा या सात गावांत भीषण पाणीटंचाई असून, येथे नळयोजना दुरुस्ती व इतर उपाय योजना आराखड्यात प्रस्तावित आहे. परंतु, त्या योजना केवळ कागदावरच असल्याची माहिती आहे.

या गावांना करावा लागणार पाणीटंचाईचा सामना

मुंगशी, शेलू नजीक, टिपटाळा, वाघजाळी, ताकवाडा, दापुरा, गुंजवाळा, शिरताळा, राजुरा सरोदे, बपोरी, खोडद, पिंगळा, रेपाडखेड, सोनोरी बपोरी, शेलू बाजार, सांगवी, लंघापूर, रोहणा, बोर्टा, धानोरा वैद्य, किन्ही, भटोरी, ऐंडली, दुर्गवाडा, सैदापूर, खांदला, राजुरा घाटे, बोरगाव निंघोट, हिरपूर, माना, अदालतपूर, शेरवाडी, सुलतानपूर, सालतवाडा, चिखली.

धोत्रा (शिंदे), जामठी (माटोळा ), किनी, बोर्टा, कवठा (खोलापूर ) या पाच गावांत विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. टँकरचा कोणत्याही गावाचा प्रस्ताव प्राप्त झालेला नाही. पाणीपुरवठा विभागामार्फत किरकोळ दुरुस्तीची कामे सुरू आहेत.

- प्रदीप पवार

तहसीलदार, मूर्तिजापूर