शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

पाणीटंचाई निवारणाचा आराखडा कागदावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:19 IST

संतोष येलकर अकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा मंजूर होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला; मात्र आराखड्यात प्रस्तावित ...

संतोष येलकर

अकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा मंजूर होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला; मात्र आराखड्यात प्रस्तावित ७१२ उपाययोजनांपैकी १९ एप्रिलपर्यंत केवळ २३ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, ६८९ उपाययोजनांची कामे अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाइ निवारणाचा कृती आराखडा कागदावरच असल्याचे वास्तव आहे.

वाढत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील विविध भागांत पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले असून, टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर जानेवारी ते जूनअखेरपर्यंतच्या कालावधीकरिता जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी १२ कोटी ८५ लाख ७९ हजार रुपये खर्चाच्या कृती आराखड्यास जिल्हाधिकाऱ्यांनी गत ८ मार्च रोजी मंजुरी दिली. मंजूर कृती आराखड्यात जिल्ह्यातील ४९७ गावांसाठी पाणीटंचाई निवारणाकरिता विविध ७१२ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या. कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांपैकी १९ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात केवळ २३ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित ६८९ उपाययोजनांची कामे अद्याप सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा कागदावरच असून, पाणीटंचाई निवारणासाठी प्रस्तावित उपाययोजनांची कामे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत केव्हा सुरू करण्यात येणार आणि टंचाईग्रस्त गावांमध्ये ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची समस्या केव्हा संपणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

कृती आराखड्यात प्रस्तावित अशा आहेत उपाययोजना!

तालुका गावे उपाययोजना

अकोला ८० ९५

बार्शीटाकळी १५ ३०

बाळापूर २२ ५१

पातूर ४७ ५९

मूर्तिजापूर ६२ ७३

अकोट ७५ ६७

तेल्हारा ३८ ७२

पूर्ण केलेल्या उपाययोजनांची

अशी आहेत कामे!

जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखड्यात ७१२ उपाययोजनांची कामे प्रस्तावित आहेत. त्यामध्ये विहिरी खोल करणे व गाळ काढणे ३६, विहिरींचे अधिग्रहण करणे २००, टँकरद्वारे पाणीपुरवठा १०, नळ योजनांची विशेष दुरुस्ती ७०, तात्पुरत्या पूरक नळ योजना ११, नवीन विंधन विहीर १८७ व नवीन कूपनलिका १४९ इत्यादी उपाययोजनांचा समावेश आहे. त्यापैकी केवळ २३ उपाययोजनांची कामे आतापर्यंत पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामध्ये १४ विहिरींचे अधिग्रहण व ९ कूपनलिकांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

७७ उपाययोजनांच्या कामांना मान्यता!

पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार ७७ उपाययोजनांच्या कामांना जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी केवळ १४ विहिरींचे अधिग्रहण आणि ९ कूपनलिकांची कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित कामे अद्यापही सुरु करण्यात आली नसल्याचे वास्तव आहे.