शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून गोरव्हा गावाने घडविली जलक्रांती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:24 IST

विझोरा : ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ या म्हणीप्रमाणे एकमेकांच्या मदतीने अनेक कामे उभी राहतात. गोरव्हा गावात ...

विझोरा : ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ या म्हणीप्रमाणे एकमेकांच्या मदतीने अनेक कामे उभी राहतात. गोरव्हा गावात राबविण्यात आलेला जलसंधारणाचा पॅटर्न आदर्श उदाहरण आहे. वर्षानुवर्षे दुष्काळाने होरपळलेल्या गोरव्हा गावाने जलक्रांती घडवून आणली आहे. त्यामुळे गाव परिसर हा पूर्णपणे दुष्काळमुक्त होऊन गावाचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला आहे. जलसंधारणचा गोरव्हा पॅटर्न सध्या जिल्ह्यात नावाजत आहे.

बार्शी-टाकळी तालुक्यातील गोरव्हा गाव आहे. गावाची लोकसंख्या १२४५ आहे. शासकीय गाव नमुना १ नुसार ५०७.८४ हेक्टर आर जमीन आहे. त्यापैकी लागवडीयोग्य जमीन ४२६.३८ हेक्टर आर आहे. बिगर लागवडी क्षेत्र व सार्वजनिक वापरासाठी इतर क्षेत्र ८१.४६ हेक्टर आर आहे.

वरील सर्व क्षेत्रामध्ये गावाच्या भविष्यातील गरजेनुसार व ग्रामस्थांच्या सहकार्याने जलव्यवस्थापन व जलसंवर्धनाची कामे करण्यात आली आहेत. सकारात्मक बदल घडविण्यासाठी गावाचा सहभाग उल्लेखनीय आहे. त्यामुळे गावातील शासकीय जमीन, वैयक्तिक शेत जमीन, शेत शिवार, पाणंद रस्ते, नाले, गाव तलाव, छोट्या ओढ्यांच्या लोकसहभागातून जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यात आली.

गावातील सर्व शेती नैसर्गिक पावसाच्या भरवशावर अवलंबून होती. केवळ पाच हेक्टर शेती हंगामी ओलिताखाली होती. गावात केवळ पिण्यापुरते पाणी उपलब्ध होते. खरीप सोयाबीन पीक घेतल्यानंतर गावात पाणीच नसल्याने रोजगारासाठी ८० टक्के मजूर महानगरांमध्ये स्थलांतरित होत होते. अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये लोकांना जलसंधारणाच्या कामाचे महत्त्व आणि गरज समजली. जलसंधारणाच्या कामांमुळे गावातील पाणी स्रोतांच्या पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ झाली.

फोटो:

सतत ५० दिवस श्रमदान मोहीम

गावातील लोक एकत्र आले. परिस्थिती व उपलब्ध जागेनुसार जलसंधारणाची कामे करण्याचे नियोजन करण्यात आले. सतत ५० दिवस श्रमदान मोहीम राबवून विविध कामे करण्यात आली. त्यामुळे पाणी पातळी वाढली. सिंचन क्षमता वाढली. पाच हेक्टरवरून १३५ हेक्टरपर्यंत जमीन सिंचनाखाली आली.

रोजगार उपलब्ध झाला. गावामध्येच रोजगार मिळाल्याने स्थलांतरण कमी झाले.

भारतीय जैन संघटनेचे सहकार्य

भारतीय जैन संघटनेमार्फत मिळालेल्या जेसीबी व पोकलेन मशिनचा पुरेपूर वापर करीत ग्रामस्थांनी डिझेलसाठी जवळपास सहा लाख रुपये गोळा करून, लोणार नाल्याचे खोलीकरण केले. कधीकाळी कोरडा पडणारा नाला आता बारमाही वाहतो आहे. गावातील शेतशिवारातील ४२ विहिरींची पाणी पातळी २० फुटापर्यंत आली आहे. गावाच्या भौगोलिक क्षेत्रातील जमिनीची पाणी साठवण क्षमता कमालीची वाढली आहे.

९० शेतकऱ्यांच्या शेतात ढाळीचे बांध

९० शेतकऱ्यांच्या शेतात ढाळीचे बांध कंपार्टमेंट बंडींग करण्यात आले. यासाठी भारतीय जैन संघटनेने गावकऱ्यांना दोन जेसीबी उपलब्ध करून दिले. सतत १२० दिवस खोदकाम केले. कोरोना काळातही गावातील जलसंधारणाची कामे थांबली नाहीत. गोरव्हासारख्या दुष्काळी यातना भोगलेल्या गावात जलसंधारणामुळे जलसमृध्दी झाली आहे.

यांच्या प्रयत्नांमुळे गाव झाले पाणीदार

गावातील पाणीटंचाई सदृश परिस्थिती निवारण्यासाठी सरपंच राजेश पाटील खांबलकर, सचिव ज्ञानेश्वर बिचारे यांच्या पुढाकारातून गावातील लोकप्रतिनिधींनी माॅडेल व्हिलेज हिवरे बाजार, राळेगणसिद्धी व पाटोदा या आदर्श गावांना भेटी दिल्या. जलसंधारणाचे महत्त्व पटल्याने ग्रामस्थांनी बैठकी घेतल्या. विचार मंथनातून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे जलसंधारण व जलव्यवस्थापन संदर्भात मार्गदर्शन घेतले.