शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

व-हाडातील टंचाईग्रस्त गावांतील जलस्रोत विकास होणार!

By admin | Updated: February 24, 2015 00:26 IST

विदर्भाला मिळाले १८ कोटी.

अकोला : विदर्भातील टंचाईग्रस्त जिल्ह्यांतील जलस्रोतांच्या विकासासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना (आरकेव्हीवाय) तसेच महात्मा फुले जल, भूमी संधारण अभियानातून विदर्भासाठी १८ कोटीपेक्षा जास्त रुपयांचा निधी शनिवारी उपलब्ध झाला. अकोला जिल्ह्याला १.९५ कोटी रूपये प्राप्त झाले असून, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामावर कृषी विभागाकडून हा निधी खर्च केला जाणार आहे. महसूल विभागाने ५0 टक्क्य़ांपेक्षा कमी पैसेवारी जाहीर केलेल्या टंचाईग्रस्त गावांमध्ये जलस्रोत विकसित करण्यात येणार आहेत. याकरिता शासनाने विदर्भाला १८ कोटींहून अधिक निधी दिला असून, यात अकोला जिल्हा १ कोटी ९५ हजार, बुलडाणा २ कोटी २३ लाख ९९ हजार, वाशिम १ कोटी २१ लाख ५0 हजार, अमरावती २ कोटी ८२ लाख २८ हजार, यवतमाळ ३ कोटी १ लाख ६६ हजार, वर्धा १ कोटी ८४ लाख ९३ हजार, नागपूर २ कोटी ६७ लाख १५ हजार, भंडारा ६९ लाख ६३ हजार, गोंदिया ६0 लाख ९८ हजार, चंद्रपूर २ कोटी २७ लाख ३८ हजार आणि गडचिरोली जिल्ह्याला ९९ लाख ३४ हजार रुपये मंजूर झाले आहेत. या अभियानांतर्गत पाझर तलाव, माती नालाबांध, सिमेंट नालाबांध, गावतलाव, शिवकालीन तलाव, डोह आदी स्रोतांचा विकास केला जाणार असून, विहीर पुनर्भरण, विहीर व जलस्रोत खोल करू न सलग समतल चर या कामांवर भर दिला जाणार आहे. टंचाईग्रस्त गावांतील पाझर, गाव व साठवण तलाव, शिवकालीन, ब्रिटिशकालीन, निजामकालीन तलावांतील गाळ काढला जाणार आहे. ही कामे करताना जिथे लोकसहभाग मिळणार नाही, तिथे यंत्राने कामे केली जातील. त्याकरिता केवळ डिझेलसाठी निधी देण्यात येईल. जलस्रोतील गाळ लोकसहभागातून काढल्यानंतर त्या जलस्रोत विकासासाठी निधी दिला जाईल. जिथे पाणलोट क्षेत्रात जलस्रोत नसेल, तिथे डोंगर उतारावर सलग समतल चर काढले जातील. शेतातील माती वाहून जाऊ नये, याकरिता शेतकर्‍यांना नव्याने मार्गदर्शन केले जाणार असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक प्रमोद लहाळे यांनी सांगीतले. अकोला जिल्ह्याला १ कोटी ९५ लाख मंजूर झाले असूून, या निधीतून जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलस्रोत विकासकामांना सुरुवात होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.