शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वर्‍हाडातील धरणातील पाणी पिण्यासाठी होणार आरक्षित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 01:42 IST

अकोला : यावर्षी अद्याप दमदार सार्वत्रिक पाऊस झाला नसल्याने पश्‍चिम विदर्भातील धरणांचे पाणलोट क्षेत्र कोरडेच असून, आजमितीस या धरणामध्ये केवळ ३३.४८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. अकोलेकरांची तहान भागविणार्‍या काटेपूर्णा धरणात १६.४९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. दगडपारवा आणि खडकपूर्णा धरणातील जलसाठा शून्यावर असून, चार धरणात १0 टक्क्याच्या आत जलसाठा शिल्लक असल्याने वर्‍हाडावरील जलसंकट गडद झाले आहे. या सर्व परिस्थितीच्या अनुषंगाने धरणातील पाणी पिण्यासाठीच आरक्षित होणार आहे.

ठळक मुद्देखडकपूर्णा, दगडपारवा धरणात शून्य टक्के साठा

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : यावर्षी अद्याप दमदार सार्वत्रिक पाऊस झाला नसल्याने पश्‍चिम विदर्भातील धरणांचे पाणलोट क्षेत्र कोरडेच असून, आजमितीस या धरणामध्ये केवळ ३३.४८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. अकोलेकरांची तहान भागविणार्‍या काटेपूर्णा धरणात १६.४९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. दगडपारवा आणि खडकपूर्णा धरणातील जलसाठा शून्यावर असून, चार धरणात १0 टक्क्याच्या आत जलसाठा शिल्लक असल्याने वर्‍हाडावरील जलसंकट गडद झाले आहे. या सर्व परिस्थितीच्या अनुषंगाने धरणातील पाणी पिण्यासाठीच आरक्षित होणार आहे.पावसाळा संपत आला; पण दमदार पाऊस झाला नसल्याने वर्‍हाडातील (पश्‍चिम विदर्भ) धरणांतील जलसाठय़ाची टक्केवारी यावर्षी पुढे सरकलीच नाही. अकोला, बुलडाणा, वाशिम जिल्हय़ात सातत्याने पावसाची अनिश्‍चितता असते; पण गतवर्षी पावसाने बर्‍यापैकी हजेरी लावली असली तरी अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हय़ांतील धरणे शंभर टक्क्याच्या आतच होती. यावर्षी पावसाने दडी मारली आहे. ११ सप्टेंबर रोजी अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा धरणात १६.८४ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. याच जिल्हय़ातील मोर्णा मध्यम प्रकल्पात १७.५३, निर्गुणा ३७.३0, उमा धरणात तर 0.४३ टक्के जलसाठा शिल्लक असून, दगडपारवा धरण शून्य टक्के आहे. अकोला, बुलडाणा आणि अमरावती या तीन जिल्हय़ांच्या सीमेवर असलेल्या वान धरणात सध्या  ६७.९९ टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्हय़ातील नळगंगा धरणात १४.९८ टक्के जलसाठा असून, खडकपूर्णा धरणाची पातळी शून्य टक्के आहे. पेनटाक ळी धरणात ७.१0 टक्के जलसाठा आहे. ज्ञानगंगामध्ये २0.९३, मसमध्ये १५.६३ टक्के, कोराडी १0.७८, पलढग ४0.७५, मन ९.३७, तोरणा ६.४६ टक्के, तर उतावळी धरणात १८.२४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्हय़ातील अडाण धरणात २९.0६ टक्के, सोनल १.९८ टक्के, तर एकबुर्जी धरणात १५.८७ टक्केच जलसाठा शिल्लक आहे.

अमरावती विभागात ३३.४८ टक्के जलसाठा!अमरावती विभाग म्हणजेच वर्‍हाडातील एकूण मोठय़ा आणि मध्यम प्रकल्पात आजमितीस केवळ ३३.४८ टक्के जलसाठा शिल्लक असून, सर्वाधिक कमी जलसाठा बुलडाणा जिल्हय़ात ११.८0 टक्के आहे. वाशिम जिल्हय़ात १९.८२ टक्के, अकोला २८.६६ टक्के, यवतमाळ जिल्हय़ात ३२.११ टक्के तर अमरावती जिल्ह्यात ५५.८४ टक्के एवढा साठा शिल्लक आहे.

सध्याची धरणातील जलसाठय़ाची स्थिती बघता यापुढे धरणातील पाण्याचे आरक्षण केवळ पिण्यासाठीच राहील. त्यामुळे प्रत्येकाने पाण्याचा वापर काटेकोरपणे करणे आवश्यक आहे. पावसाळा अद्याप संपला नसल्याने दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.- अंकुर देसाई, अधीक्षक अभियंता, पाटबंधारे मंडळ, अकोला.