शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
2
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
3
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
4
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
5
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
6
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
7
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
8
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
9
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
10
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
11
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
12
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
13
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
14
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
15
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
16
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
17
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
18
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
19
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
20
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान

वर्‍हाडातील धरणातील पाणी पिण्यासाठी होणार आरक्षित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 01:42 IST

अकोला : यावर्षी अद्याप दमदार सार्वत्रिक पाऊस झाला नसल्याने पश्‍चिम विदर्भातील धरणांचे पाणलोट क्षेत्र कोरडेच असून, आजमितीस या धरणामध्ये केवळ ३३.४८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. अकोलेकरांची तहान भागविणार्‍या काटेपूर्णा धरणात १६.४९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. दगडपारवा आणि खडकपूर्णा धरणातील जलसाठा शून्यावर असून, चार धरणात १0 टक्क्याच्या आत जलसाठा शिल्लक असल्याने वर्‍हाडावरील जलसंकट गडद झाले आहे. या सर्व परिस्थितीच्या अनुषंगाने धरणातील पाणी पिण्यासाठीच आरक्षित होणार आहे.

ठळक मुद्देखडकपूर्णा, दगडपारवा धरणात शून्य टक्के साठा

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : यावर्षी अद्याप दमदार सार्वत्रिक पाऊस झाला नसल्याने पश्‍चिम विदर्भातील धरणांचे पाणलोट क्षेत्र कोरडेच असून, आजमितीस या धरणामध्ये केवळ ३३.४८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. अकोलेकरांची तहान भागविणार्‍या काटेपूर्णा धरणात १६.४९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. दगडपारवा आणि खडकपूर्णा धरणातील जलसाठा शून्यावर असून, चार धरणात १0 टक्क्याच्या आत जलसाठा शिल्लक असल्याने वर्‍हाडावरील जलसंकट गडद झाले आहे. या सर्व परिस्थितीच्या अनुषंगाने धरणातील पाणी पिण्यासाठीच आरक्षित होणार आहे.पावसाळा संपत आला; पण दमदार पाऊस झाला नसल्याने वर्‍हाडातील (पश्‍चिम विदर्भ) धरणांतील जलसाठय़ाची टक्केवारी यावर्षी पुढे सरकलीच नाही. अकोला, बुलडाणा, वाशिम जिल्हय़ात सातत्याने पावसाची अनिश्‍चितता असते; पण गतवर्षी पावसाने बर्‍यापैकी हजेरी लावली असली तरी अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हय़ांतील धरणे शंभर टक्क्याच्या आतच होती. यावर्षी पावसाने दडी मारली आहे. ११ सप्टेंबर रोजी अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा धरणात १६.८४ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. याच जिल्हय़ातील मोर्णा मध्यम प्रकल्पात १७.५३, निर्गुणा ३७.३0, उमा धरणात तर 0.४३ टक्के जलसाठा शिल्लक असून, दगडपारवा धरण शून्य टक्के आहे. अकोला, बुलडाणा आणि अमरावती या तीन जिल्हय़ांच्या सीमेवर असलेल्या वान धरणात सध्या  ६७.९९ टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्हय़ातील नळगंगा धरणात १४.९८ टक्के जलसाठा असून, खडकपूर्णा धरणाची पातळी शून्य टक्के आहे. पेनटाक ळी धरणात ७.१0 टक्के जलसाठा आहे. ज्ञानगंगामध्ये २0.९३, मसमध्ये १५.६३ टक्के, कोराडी १0.७८, पलढग ४0.७५, मन ९.३७, तोरणा ६.४६ टक्के, तर उतावळी धरणात १८.२४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्हय़ातील अडाण धरणात २९.0६ टक्के, सोनल १.९८ टक्के, तर एकबुर्जी धरणात १५.८७ टक्केच जलसाठा शिल्लक आहे.

अमरावती विभागात ३३.४८ टक्के जलसाठा!अमरावती विभाग म्हणजेच वर्‍हाडातील एकूण मोठय़ा आणि मध्यम प्रकल्पात आजमितीस केवळ ३३.४८ टक्के जलसाठा शिल्लक असून, सर्वाधिक कमी जलसाठा बुलडाणा जिल्हय़ात ११.८0 टक्के आहे. वाशिम जिल्हय़ात १९.८२ टक्के, अकोला २८.६६ टक्के, यवतमाळ जिल्हय़ात ३२.११ टक्के तर अमरावती जिल्ह्यात ५५.८४ टक्के एवढा साठा शिल्लक आहे.

सध्याची धरणातील जलसाठय़ाची स्थिती बघता यापुढे धरणातील पाण्याचे आरक्षण केवळ पिण्यासाठीच राहील. त्यामुळे प्रत्येकाने पाण्याचा वापर काटेकोरपणे करणे आवश्यक आहे. पावसाळा अद्याप संपला नसल्याने दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.- अंकुर देसाई, अधीक्षक अभियंता, पाटबंधारे मंडळ, अकोला.